शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आवक वाढल्याने ‘हापूस’ आवाक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:24 IST

पिंपरी बाजारपेठ : पायरी, लालबाग आंबा झाला दाखल

पिंपरी : शहरात दोन आठवड्यांपूर्वी हापूस आंबा दाखल झाला. मात्र अपेक्षित आवक नसल्याने हापूस आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. मात्र काही दिवसांपासून फळांचा राजा मानला जाणाऱ्या आंब्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दर स्थिरअसून, ठिकठिकाणी आंब्याचे स्टॉल दिसत आहेत.

शहरात उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच विविध प्रकारच्या आंब्याची आवक सुरू होते. कर्नाटकातील बदाम, लालबाग व पायरी यासह विविध जातींचे आंबे दाखल झाले होते. त्या वेळी काही ठिकाणच्या हापूस आंब्याची आवकही सुरू झाली होती. मात्र आवक कमी असल्याने दर अधिक होते. मागील आठवड्यापासून येथील बाजारपेठेत विविध प्रकारच्या आंब्याची आवक वाढू लागली आहे. सध्या बाजारात हापूस आंब्याला पाचशे ते एक हजार रुपये डझन असा भाव मिळत आहे. सुरुवातीला ३५० रुपये किलो असलेला बदाम आंबा ८० ते १२० रुपये किलोवर आला आहे. पायरी १६० व लालबाग आंब्याची ८० ते १०० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.सध्या हापूस आंब्याबरोबरच बदाम आंब्यालाही ग्राहकांकडून चांगली मागणी मिळत आहे. यावर्षी सुरुवातीच्या काळात बदाम आंब्याचा दरही ४०० रुपये किलो होता. मात्र आता कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील इतर भागांतून आंब्याची आवक झाल्याने आंब्याचे दर उतरले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना बदाम आंब्याची गोडी वाटत आहे.आंबे खरेदीकडे कल वाढला आहे. गुढीपाढव्यानंतर अधिक आवक सुरू होईल. त्यानंतर यापेक्षा दर कमी होतील. वातावरणामध्ये काही बदल झाला किंवा अवकाळी पाऊस झाला तर त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. तसे झाले तर पुन्हा आंब्याचे भाव वाढतील.- कुमार शिरसाट, फळविक्रेते. 

टॅग्स :MangoआंबाPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड