शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा मावळात धुमाकूळ, भातशेतीचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 01:25 IST

मावळ तालुक्यात गेल्या चार पाच दिवसांपासून अवकाळी पावसाची चिन्हे दिसत होती. काळे ढग, सोसाट्याचा वारा आदींमुळे नुकतेच कापणी केलेले भातपीक वाचवण्यात, तर काही शेतकऱ्यांची भात कापणीची लगबग सुरू असताना रविवारी दुपारनंतर अचानक आलेल्या अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटात मोठा धुमाकूळ घातला.

कामशेत : मावळ तालुक्यात गेल्या चार पाच दिवसांपासून अवकाळी पावसाची चिन्हे दिसत होती. काळे ढग, सोसाट्याचा वारा आदींमुळे नुकतेच कापणी केलेले भातपीक वाचवण्यात, तर काही शेतकऱ्यांची भात कापणीची लगबग सुरू असताना रविवारी दुपारनंतर अचानक आलेल्या अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटात मोठा धुमाकूळ घातला. यात अनेक शेतक-यांच्या भातशेतीचे नुकसान झाले. ऐन दिवाळीच्या सुरुवातीला झालेल्या नुकसानामुळे शेतकरी चिंतेत आहेत.परतीच्या पावसाने मावळात समाधानकारक हजेरी लावली नाही. त्यामुळे भात उत्पादनात मोठी घट झाल्याचे शेतकºयाकडून सांगण्यात येत आहे. त्यातच हाता-तोंडाशी आलेले पीक कापणी करून शेतात पडलेले, तर काहींची कापणी सुरू असताना रविवारी अवकाळी पाऊस आला. विजांच्या लखलखाटासह कोसळणाºया पावसाने अवघ्या काही तासांत शेतीचे मोठे नुकसान केले. आधीच पावसाने ओढ दिल्याने भातउत्पादक चिंतेत असताना मिळेल ते पीक पदरी पाडण्यासाठी जीवाचे रान करताना भातशेतीचे नुकसान झाले आहे. नाणे मावळ परिसरात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नाणे मावळ हा परिसर भात शेतीसाठी प्रसिद्ध आहे. आधीच परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे भाताचा उतारा कमी मिळून उत्पादनात मोठी घट होण्याची भीती आहे.युवा सेनेतर्फे मंडलाधिका-यांना निवेदनकार्ला : अवकाळी पावसाने मावळ तालुक्यातील भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कापणी करून शेतकºयांनी शेतात ठेवलेले भातपीक भिजले आहे. वर्षभर शेतात केलेले कष्ट वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. शेतकºयांनी झोडणी केली व जनावरांसाठी पेंढा रचून ठेवला. तो संपूर्ण पेंढा या अवकाळी पावसाने भिजला. भविष्यात चाºयाचा प्रश्नही उद्भवणार आहे. या संदर्भात शासनाने अशा भातपिकाची व चाºयाची पाहणी करून तातडीने पंचनामा करून शेतकºयांना तातडीने मदत मिळवून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मावळ विधानसभा युवासेना चिटणीस विशाल हुलावळे, भारतीय विद्यार्थी सेना वाकसई गण अध्यक्ष नितीन देशमुख, युवासैनिक शुभम गायकवाड, हिंदुराज कोंडभर, अक्षय हुलावळे, बंटी हुलावळे, आदित्य हुलावळे, शुभम मावकर, अमोल इंगवले, गिरीश हुलावळे, प्रतीक हुलावळे, सौरभ हुलावळे यांनी निवेदन दिले.नुकसानभरपाईची अपेक्षापावसामुळे हाती आलेल्या भाताच्या पिकाचे शेतातच भाताचे दाणे गळून पडणे, भात लाल पडणे, गिरणीत भरडायला घेऊन गेल्यावर भाताचा तुकडा पडणे आदी समस्या या अवकाळी पावसामुळे निर्माण झाल्या आहेत. त्यातच पेंढा भिजल्यामुळे शेतकºयांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. हा पेंढा शेतकरी वर्षभर साठवून जनावरांसाठी पुरवत असतो. अवकाळी पावसामुळे भाताचा पेंढा भिजल्यामुळे जनावरांच्या खाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.व्यावसायिक, ग्राहकांची तारांबळदिवाळीनिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी लगबग सुरू असताना पाऊस झाला. त्यामुळे बाजारातील पथारीवाले, हातगाडीवाले व ग्राहकांची मोठी धांदल उडाली. मावळातील प्रमुख बाजारपेठ म्हणून नावलौकिक असलेल्या कामशेत शहरामध्ये अनेक दुकाने, हातगाडीवाले, रस्त्याच्या कडेला छोटी दुकाने थाटून मातीच्या पणत्या, आकर्षक आकाशकंदील, रांगोळी, तयार किल्ले, किल्यांवरील खेळणी विक्री आणि खरेदीची लगबग सुरू होती.भातपिकाचे पंचनामे करावडगाव मावळ : अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त भातपिकांचे पंचनामे करावेत, अंगावर वीज पडून मृत्यू पावलेल्या व जखमी झालेल्या कुटुंबीयांना शासनाकडून भरीव मदत मिळावी, अशी मागणी मावळ तालुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, नगरसेवक किशोर भेगडे, सुनील दाभाडे, कैलास गायकवाड, नारायण ठाकर, चंद्रकांत दाभाडे, अंकुश आंबेकर, आशिष खांडगे, बाबाजी गायकवाड, भाऊ ढोरे, स्वामी गायकवाड, नामदेव शेलार, नामदेव शेलार व अन्य पदाधिकाºयांनी याबाबत निवेदन दिले आहे.तहसीलदार रणजीत देसाई यांना निवेदन देण्यात आले आहे. मावळ तालुक्यात अन्नदात्या शेतकºयांसाठी रविवारी झालेला अवकाळी पाऊस दुर्दैवी ठरला. वीज पडून शोभा शिरसट, खंडू शिरसट, सुनंदा कचरे असा तिघांचा मृत्यू झाला. तसेच भोईरे येथील भोईरकर यांना भातपिकांचे झालेले नुकसान पाहून हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. कोंडिवडे येथील प्रकाश काशिनाथ खरमारे हे विजेच्या धक्क्याने जखमी झाले. मृत्यू पावलेले चौघे व एक जखमी अशा सर्व कुटुंबीयांना भरीव मदत मिळावी. तसेच भातपीक परिपक्व होत असताना शेवटचा पाऊस न पडल्याने ६० ते ७० टक्के भातपिकांचे नुकसान झाले आहे. भातकापणीचे काम सुरू असताना रविवारी अचानक अवकाळी पाऊस पडल्याने उर्वरित ३० टक्के राहिलेले भातपिकाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. याबाबत त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊस