शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

शिरूर लोकसभा निवडणुकीत महायुतीचाच उमेदवार विजयी होणार; अजित पवारांचा दावा

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: February 10, 2024 13:46 IST

सध्या देशात मोदींच्या नेतृत्वावर लोकांच्या प्रचंड विश्वास असून ते तिसऱ्यांदा पुन्हा पंतप्रधान होतील

पिंपरी : लोकशाही निवडणुकीमध्ये प्रत्येकाला उमेदवार देण्याचा हक्क असतो. त्यामुळे शिरूर लोकसभा निवडणुकीत देखील विरोधकांचा उमेदवार असणार आहे. मात्र, तिथे महायुतीचाच उमेदवार विजयी होणार आहे. सध्या देशात मोदींच्या नेतृत्वावर लोकांच्या प्रचंड विश्वास आहे आणि ते तिसऱ्यांदा पुन्हा पंतप्रधान होतील असा दावा अजित पवार यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन, भुमिपुजन व लोकार्पन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, भविष्यात नियोजित केलेली विकास काम जर आज कर्ज काढून कमी पैशात होत असतील तर ते करायला हरकत नाही. राज्य सरकारनेदेखील समृद्धी महामार्ग कर्ज काढून तयार केला आणि आज त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. मुंबई - पुणे एक्सप्रेस वे देखील कर्ज काढून तयार झाला आणि त्याला बनवायला लागले त्याच्या कित्येक पटीने पैसे रिर्टन्स स्वरूपात मिळाले आहेत. मात्र, या मिळालेल्या पैशातून आम्ही दुसरे रस्ते बांधण्यात खर्च करत आहोत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका जर कर्ज घेत असेल तर ते नियमाला धरून असायला हवे. कर्जाचा ताण महापालिकेवर यायला नको. त्यासंबंधी नगर विकास खाते आणि तिथले अधिकारी योग्य ती काळजी घेतील, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

टीडीआरची किंमत काही वाढणार नाही

टीडीआर घोटाळावर बोलतांना अजित पवार म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या टीडीआर घोटाळ्यात बरीच अनियमितता होती. त्यामुळे मी आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या घोटाळ्याला स्थगिती दिली होती. टीडीआर घोटाळ्याला स्थगिती दिल्यामुळे त्या प्रकल्पाची किंमत काही वाढणार नाही, असा दावा देखील अजित पवार यांनी केला आहे.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारणElectionनिवडणूकlok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदी