शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

‘जार’मधील अशुद्ध पाणी शहरातील नागरिकांच्या माथी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 00:48 IST

शहरामध्ये एक दिवस पाणी कपात सुरू करण्यात आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे.

- प्रकाश गायकर पिंपरी : शहरामध्ये एक दिवस पाणी कपात सुरू करण्यात आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये पाण्याची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना ‘अच्छे दिन’ आल्याचे पाहायला मिळत आहे. मिनरल वॉटरच्या नावाखाली जारमधून अशुद्ध पाणीविक्रीचा गोरखधंदा शहरामध्ये जोरात सुरू आहे. यावर प्रशासनाचेही नियंत्रण नसल्याने शहराच्या गल्ली बोळामध्ये थंड पाण्याच्या जारची दुकाने थाटलेली दिसत आहेत.कमी खर्चामध्ये, कमी जागेमध्ये जास्त नफा कमावून देणारा व्यवसाय म्हणून पाणी विक्रीच्या व्यवसायाकडे पाहिले जाते. सुरुवातीला पाणी शुद्धीकरणाचे प्रकल्प रावबून व्यवसाय करणारे मोजकेच व्यावसायिक होते. नंतर या व्यवसायाने विशाल रूप धारण केले आणि त्यातील शुद्धता हरवली. आता भूगर्भातील पाणी उपसून थंड करून विकण्यास कमी खर्च लागत आहे. त्यामुळे गल्ली-बोळामध्ये असे व्यवसाय सुरू झाले आहेत. मात्र यामध्ये पाण्याच्या शुद्धतेबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नाही. तसेच, त्यावर कोणतीही माहिती देण्यात येत नाही.महापालिकेचा पाणीपुरवठा व बोअरवेलमधून पाण्याचा उपसा करून ते थंड केले जाते. ते पाणी जारमध्ये भरून त्याची ४० ते ५० रुपये दराने विक्री केली जात आहे. विविध सण, समारंभ, लग्न, पार्ट्या यासाठी नागरिक जारची मागणी करतात. तसेच अनेक नागरिक शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावे म्हणून दररोज घरामध्येही या जारची मागणी करतात. शासकीय कार्यालये, दुकाने यामध्येही जारच्या पाण्याला मागणी असल्याने विक्रेत्यांना चांगले दिवस आले आहेत. गल्लोगल्लीच्या या दुकानांमुळे ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच सावध होऊन या अशुद्ध पाणी विक्रीला आळा घालायला हवा. पाणीविक्री करणारे व्यावसायिक नियमांमधून पळवाट काढत आहेत. पाण्याच्या जारवर आपल्या कंपनीचे लेबल लावून पाणी विक्री केली जाते.>गल्लीबोळात अन् घरातच थाटले व्यवसायकोणताही व्यवसाय सुरू करण्याकरिता महापालिका प्रशासन व ग्रामीण भागामध्ये प्रशासकीय परवानगी आवश्यक असते. सोबतच व्यवसायाचा परवानाही लागतो. परंतु पाण्याचे जार विक्री करणाºया व्यावसायिकांना कुठलीही नियमावली नसल्याने पाणी विक्री करणाºयाचे फावले आहे. प्रशासनाची परवानगी न घेता घरीच एक खोली किंवा शेड टाकून पाण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.गुणवत्ता तपासणीची नाही यंत्रणाकडक उन्हाळा सुरू झाल्यावर नागरिकांकडून थंड पाण्याची मागणी वाढते. या पाण्याची चार पाच दिवसांनी आपोआप चव बदलत असल्याने या पाण्याची गुणवत्ता लक्षात येते. पाण्याच्या गुणवत्ते संदर्भात जारवर कुठलीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे जारच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी ग्राहकांवरच आहे. अन्यथा हे हवेसे वाटणारे थंड पाणी ग्राहकांच्या आरोग्याला बांधा निर्माण करू शकते.