शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

ग्राहक सेवा केंद्राचा नंबर इंटरनेटवर शोधत असाल, तर सावधान! तुमची फसवणूक होण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 12:01 IST

तुमच्या अकाऊंटमधील पैसे न कळत गायब होतील...

ठळक मुद्दे ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनद्वारे फसवणूक होत असल्याची बाब उघड

योगेश्वर माडगूळकर-पिंपरी : ऑनलाइन पेमेंट फेल गेले तर संबधित अ‍ॅपच्या ग्राहक सेवा केंद्राचा नंबर इंटरनेटच्या माध्यमातून शोधत असाल, तर सावधान. त्यामुळे तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे.तुमच्या अकाऊंटमधील पैसे न कळत गायब होतील. असाच प्रकार निगडी-प्राधिकरण येथील उच्चशिक्षित महिलेच्या बाबतीत घडला आहे. त्यानंतर ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनद्वारे फसवणूक होत असल्याची बाब उघड झाली आहे. 

फसणूक झालेल्या महिलेचे ४३८ रुपयांचे ट्रांझेक्शन एका अ‍ॅपद्वारे फेल गेले होते. त्यांनी इंटरनेटद्वारे ग्राहक सेवा केंद्राचा शोध घेतला. ग्राहक सेवा केंद्राचा क्रमांक मिळाला. ट्रांझेक्शन फेल गेल्याचे संबंधित महिलेने ग्राहक सेवा केंद्राच्या प्रतिनिधीस सांगितले. संबंधिताने महिलेस पैसे दोन तास परत करतो; पण अकाऊंट नंबर डिटेल सांगण्यासाठी एक ट्रांझेक्शन फेल करावे लागेल, असे सांगितले. तसेच त्याने संबंधित खात्यावरील शिल्लक रक्कमही विचारली. महिलेने संबंधित अ‍ॅप उघडला. त्यावर ग्राहक सेवा केंद्राच्या प्रतिनिधीने सांगितलेला कोड टाकला. तो चार अंकी होता. त्याखाली त्यांने रिफंड असे लिहण्यास सांगितले. त्यानंतर कोड टाकण्यास सांगितले. टाकलेला कोड म्हणजे अकाऊंटमधील तेवढे पैसे गायब झाल्याचे त्या महिलेचे लक्षात आले. खात्यावरील चार हजार गायब झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्या महिलेने फोन चालू ठेवला. संबधित अकाऊंटवरील पैसे दुसऱ्या खात्यावर वळविले. हा नंबर बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर ग्राहक प्रतिनिधीने एटीएम कार्डचे डिटेल मागितले. ते डिटेलही त्याला दिले. त्यानंतर ओटीपी विचारून दुसऱ्या खात्यातील रक्कम पळविण्याचा प्रयत्न करत होता. पण संबधित महिलेने त्याला ओटीपी सांगितला नाही. त्यामुळे संबंधिताला दुसऱ्यांदा फसवणूक करता आला नाही.  

लोकप्रतिनिधी आणि बनावट ग्राहक सेवा केंद्राच्या प्रतिनिधीशी झालेला संवाद संबधित बनावट ग्राहक सेवा केंद्राच्या प्रतिनिधीशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला. त्यावेळी बनावट ग्राहक सेवा केंदातून ‘लोकमत’ प्रतिनिधीला मोबाईल नंबर विचारला. तसेच अकाऊंटचा बॅलन्स विचारला. प्रतिनिधीने फोन कट केला. त्यानंतर ग्राहक सेवा केंद्रातून पुन्हा फोन आला. पण लोकमत प्रतिनिधीने माझे पैसे परत मिळाले आहेत, असे सांगतिले. त्यानंतर त्याने फोन कट केला.

....................................

काय काळजी घ्यावी१) नेटवरून कोणत्याही अ‍ॅपचा ग्राहक क्रमांक शोधू नये.२) अ‍ॅपचे प्रतिनिधी कधीही बँकेचा अंकाऊट नंबर विचारत नाहीत. त्यामुळे हा नंबर कोणालाही सांगू नये.३) खात्यातील शिल्लक रक्कम विचारत नाहीत. तेही कोणालाही सांगू नये.४) प्रत्येक अ‍ॅपने तक्रार देण्यासाठी मदत केंद्राची सोय केली आहे. त्यावर संपर्क साधावा.५) एटीएम कार्डची माहिती कोणीही विचारत नाही. त्यामुळे त्याची माहिती देऊ नये.६) ओटीपी कोणालाही शेअर करू नये.७) अधिकृत प्रतिनिधी कधीही सेल्फी मागत नाहीत. त्यामुळे सेल्फी देऊ नये८) सेल्फी दिल्यास सोशल मीडियावर बदनामी होण्याची शक्यता आहे.

........................

निर्ढावलेले गुन्हेगारहे प्रकार झारखंड परिसरातील जमताडा परिसरातून सुरू आहेत. त्या गुन्हेगारांना आपण महाराष्ट्रातील नागरिकांची फसवणूक करत आहोत, हे माहीत आहे. याठिकाणी पोलीस सहजासहजी पोहचू शकणार नाहीत. त्यामुळे हे प्रकार सुरू आहेत. तक्रार करूनही पैसे परत मिळणार नाहीत. फुकट मनस्ताप नको, म्हणून अनेक नागरिक तक्रारही करत नाहीत. अनेक वेळा सेल्फी मागवून घेतला जातो. त्याद्वारे सोशल मीडियावर बदनामी करण्याचा डाव रचले जाते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfraudधोकेबाजीInternetइंटरनेट