शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

मी आवाज नाही स्वर लावते : देवकी पंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 03:00 IST

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये ख्यातनाम कलाकारांबरोबरचा संवादात्मक कार्यक्रम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘अंतरंग’ या कार्यक्रमामध्ये महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आरती अंकलीकर यांनी देवकी पंडित यांची मुलाखत घेतली.

पुणे : चुकीच्या आणि रियाजाच्या अतिताणामुळे माझा आवाज गेला वर्षभर बोलू शकले नाही. गळा गाता करण्यासाठी दोन वर्षे लागली. माझा आवाज कुठला आणि तो कसा गेला, हे मला आत्मचिंतनातून उमजले, अशा अनुभवी बोलातून प्रसिद्ध गायिका देवकी पंडित यांनी सुराला सूर लावला म्हणजे स्वर जुळला असे होत नाही. मी आवाज नाही पण स्वर लावते याकडे लक्ष वेधले.सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये ख्यातनाम कलाकारांबरोबरचा संवादात्मक कार्यक्रम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘अंतरंग’ या कार्यक्रमामध्ये महोत्सवाच्या तिसºया दिवशी आरती अंकलीकर या देवकी पंडित यांची मुलाखत घेणार होत्या; पण प्रत्यक्षात दोघींनी एकमेकांशी गप्पाच मारत श्रोत्यांना सुरेल शब्द मैफिलीचा अनुभव दिला. शिवाजीनगर येथील सवाई गंधर्व स्मारकामध्ये सकाळी झालेल्या या कार्यक्रमाला आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, गायक आनंद भाटे उपस्थित होते. लहानपणापासून मैत्रिणी असलेल्या, या दोन्हीही गायिका अगोदर पंडित वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे आणि पुढे किशोरीताई आमोणकर यांच्याकडे शिकल्या. एकमेकींच्या फिरक्या घेत, पंडित वसंतराव कुलकर्णी आणि किशोरीताई यांच्यासह माणिक वर्मा यांचा साधेपणा, पं. जितेंद्र अभिषेकी, बबनराव हळदणकर, मोगुबाई कुर्डीकर, वीणाताई सहस्रबुद्धे, आशा भासले, लता मंगेशकर आणि पंडित भीमसेन जोशी अशा अनेक महान गायकांच्या आठवणी दोघींनी उलगडून दाखवल्या. देवकी घरी थालीपीठ खायला येणार असल्याने इथे यायला उशीर झाला असे सुरूवातीलाच आरती अंकलीकर यांनी मिश्किलपणे सांगताच ‘उशीर झाला की माझ्यावर ढकलायचं ही तुझी नेहमीची सवय आहे, अशा लडिवाळ स्वरात देवकी पंडित यांनी प्रत्युत्तर दिले. या वेळी ‘षड्ज’ या कार्यक्रमात ‘जमुना के तीर’ हा अब्दुल करीम खॉँ यांच्यावरील लघुपट दाखविण्यात आला.गायकीचा स्वभावाशी संबंध असतो. राग म्हणून विचार मांडतो. हळुवारपणे उलगडणं म्हणजे गाणं सूर, बंदिश, वादी-संवादी नाही तर त्यापलीकडे जाऊन आपण यमन होणं म्हणजे गाणं असतं. त्यासाठी रियाज, गाणं आहे हे किशोरीताईंनी सांगितले. ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. मी बुवांच्या अंगाखांद्यावर खेळले आहे ‘ही माझी मुलगी आणि शौनक दुसरा’, असेच ते सगळ्यांना सांगायचे. मला परत त्यांनी गाण्यात आणलं. गुरूंनी जे शिकवले ते जपून ठेव असे त्यांनी सांगितले.- देवकी पंडितकिशोरीताई म्हणजे गाणे देणाºया गुरू आहेत. किशोरीतार्इंनी जयपूर घराण्याचे गाणे पचवून त्यातील भावतत्व घेऊन स्वत:चे गाणे, स्वत:चे घराणे निर्माण केले. त्यांचे गाणे आता तीन पिढ्या गायले जात आहे. त्यांनी राग व्हायला आणि दुस-यांनाही राग करायला शिकवले. शरीर, मन, मेंदू, आत्मा यांचा विलक्षण संगम म्हणजे किशोरीताई यांचे गाणे.- आरती अंकलीकर

टॅग्स :musicसंगीत