शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
6
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
7
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
8
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
9
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
10
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
11
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
12
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
13
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
14
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
15
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
16
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
17
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
18
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
19
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
20
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...

वाहनातून प्रवास करताना चालकाची मानसिक स्थिती कशी समजणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 13:34 IST

वाहन चालविणारा मानसिक अथवा शारीरिकदृष्ट्या अयोग्य असल्यास त्याचा इतरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो...

- नारायण बडगुजर 

पिंपरी : टाटा उद्योग समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. वाहन चालविणारा मानसिक अथवा शारीरिकदृष्ट्या अयोग्य असल्यास त्याचा इतरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वाहनातून प्रवास करताना चालकाची मानसिक स्थिती लक्षात येणे गरजेचे आहे. अन्यथा हा प्रवास आपल्यासह इतरांच्याही जीवावर बेतू शकतो. त्यादृष्टीने वाहनातील सहप्रवाशांनी चालकाच्या मानसिक स्थितीचा अंदाज घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात किरकोळ तसेच प्राणांतिक अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अपघात रोखण्यासाठी पोलिसांकडून कारवाईसह उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, याबाबत वाहनचालक तसेच नागरिकांनीही पुढाकार घेतला पाहिजे. आपल्यामुळे इतरांचा जीव जाऊ नये, यासाठी वाहन चालकाने काळजी घ्यावी. शारीरिक व मानसिकदृष्ट्या थकवा आला असल्यास किंवा राग, ताण-तणाव असेल तर वाहन चालवू नये. मानसिक अथवा शारीरिकदृष्ट्या वाहन चालविण्यास अयोग्य असलेल्या व्यक्तीने वाहन चालविल्यास एक ते दोन हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. मात्र, चालकाची मानसिकता पोलिसांना कशी समजणार हाही प्रश्‍न आहे. त्यामुळे सहप्रवाशांनीच चालकाची मानसिकता ओळखून प्रवास करणे गरजेचे आहे.  

चालकाची मानसिक, शारीरिक स्थिती अयोग्य असल्यास दंड

पहिल्यांदा अशाप्रकारे आढळल्यास संबंधित चालकावर एक हजार रुपये आणि असाच प्रकार दुसर्‍यांदा आढळल्यास दोन हजार रुपयांच्या दंडाची तरतूद कायद्यामध्ये आहे. मुळात चालकाची मानसिकता लक्षात येणे कठीण आहे. त्यामुळे असा दंड कसा करावा किंवा संबंधित चालक ‘त्या’ अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले तरच दंड लावता येऊ शकतो.  

मानसिक स्थिती समजणे कठीणच

चालकाची मानसिक स्थिती ही केवळ वाहनात सहप्रवाशांना समजू शकते. तसेच चालकाच्या घरातील सदस्यांना याबाबत माहिती असू शकते. मानसिक स्थिती अयोग्य असल्यास चालकाला वाहन चालविण्यास देऊ नये, हा नियम कटाक्षाने पाळला पाहिजे.

कुटुंबातील सदस्यांना आपल्या घरातील व्यक्‍तीची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. विशेषत: वाहन चालविण्यापूर्वी कोणताही ताणतणाव वाहन चालकावर नसावा तसेच संबंधित विभागांनी केवळ वैद्यकीय परीक्षा न घेता त्याबाबत मानसिकदृष्ट्या चालक संतुलित आहे की नाही, याचीही तपासणी करावी. पुरेशी झोप झाल्याशिवाय वाहन चालवू नये.  

- डॉ. मनजित संत्रे, मानसोपचार तज्ज्ञ  

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड