शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

वाहनातून प्रवास करताना चालकाची मानसिक स्थिती कशी समजणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 13:34 IST

वाहन चालविणारा मानसिक अथवा शारीरिकदृष्ट्या अयोग्य असल्यास त्याचा इतरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो...

- नारायण बडगुजर 

पिंपरी : टाटा उद्योग समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. वाहन चालविणारा मानसिक अथवा शारीरिकदृष्ट्या अयोग्य असल्यास त्याचा इतरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वाहनातून प्रवास करताना चालकाची मानसिक स्थिती लक्षात येणे गरजेचे आहे. अन्यथा हा प्रवास आपल्यासह इतरांच्याही जीवावर बेतू शकतो. त्यादृष्टीने वाहनातील सहप्रवाशांनी चालकाच्या मानसिक स्थितीचा अंदाज घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात किरकोळ तसेच प्राणांतिक अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अपघात रोखण्यासाठी पोलिसांकडून कारवाईसह उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, याबाबत वाहनचालक तसेच नागरिकांनीही पुढाकार घेतला पाहिजे. आपल्यामुळे इतरांचा जीव जाऊ नये, यासाठी वाहन चालकाने काळजी घ्यावी. शारीरिक व मानसिकदृष्ट्या थकवा आला असल्यास किंवा राग, ताण-तणाव असेल तर वाहन चालवू नये. मानसिक अथवा शारीरिकदृष्ट्या वाहन चालविण्यास अयोग्य असलेल्या व्यक्तीने वाहन चालविल्यास एक ते दोन हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. मात्र, चालकाची मानसिकता पोलिसांना कशी समजणार हाही प्रश्‍न आहे. त्यामुळे सहप्रवाशांनीच चालकाची मानसिकता ओळखून प्रवास करणे गरजेचे आहे.  

चालकाची मानसिक, शारीरिक स्थिती अयोग्य असल्यास दंड

पहिल्यांदा अशाप्रकारे आढळल्यास संबंधित चालकावर एक हजार रुपये आणि असाच प्रकार दुसर्‍यांदा आढळल्यास दोन हजार रुपयांच्या दंडाची तरतूद कायद्यामध्ये आहे. मुळात चालकाची मानसिकता लक्षात येणे कठीण आहे. त्यामुळे असा दंड कसा करावा किंवा संबंधित चालक ‘त्या’ अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले तरच दंड लावता येऊ शकतो.  

मानसिक स्थिती समजणे कठीणच

चालकाची मानसिक स्थिती ही केवळ वाहनात सहप्रवाशांना समजू शकते. तसेच चालकाच्या घरातील सदस्यांना याबाबत माहिती असू शकते. मानसिक स्थिती अयोग्य असल्यास चालकाला वाहन चालविण्यास देऊ नये, हा नियम कटाक्षाने पाळला पाहिजे.

कुटुंबातील सदस्यांना आपल्या घरातील व्यक्‍तीची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. विशेषत: वाहन चालविण्यापूर्वी कोणताही ताणतणाव वाहन चालकावर नसावा तसेच संबंधित विभागांनी केवळ वैद्यकीय परीक्षा न घेता त्याबाबत मानसिकदृष्ट्या चालक संतुलित आहे की नाही, याचीही तपासणी करावी. पुरेशी झोप झाल्याशिवाय वाहन चालवू नये.  

- डॉ. मनजित संत्रे, मानसोपचार तज्ज्ञ  

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड