शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

पिंपरी वायसीएममधील भोंगळ कारभार : डॉक्टरांच्या बेफिकीरीने त्याने गमावली पायाची बोटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 19:44 IST

किडनीला काहीही झाले नसताना, दोन आठवड्यांपूर्वी एका तरुणावर डायलिसीस केल्याचा धक्कादायक प्रकार वायसीएममध्ये घडला होता...

ठळक मुद्देतक्रारीनंतर होणार चौकशी 

पिंपरी : पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाचा भोंगळ कारभार अवघ्या दोन आठवड्यांत पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. किडनीला काहीही झाले नसताना, दोन आठवड्यांपूर्वी एका तरुणावर डायलिसीस केल्याचा धक्कादायक प्रकार वायसीएममध्ये घडला होता. त्यामुळे प्रशासनावर सर्वच स्तरातून जोरदार टीका झाली होती. आता पुन्हा एकदा पायाच्या बोटांना गंभीर दुखापत असूनही जखमेवर केवळ मलमपट्टी करून रुग्णाला घरी सोडण्यात आले. त्यांच्या बेपर्वाईमुळे रुग्णाला पायाची दोन बोटे गमावण्याची वेळ आली. आता प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी होणार आहे. अजंठानगर येथील रहिवासी अशोक रामभाऊ धेंडे (वय ५५) यांच्या डाव्या पायाच्या दोन बोटांना शनिवारी (दि.२०) रोजी अपघात झाल्याने गंभीर जखम झाली होती. त्यांच्या पायाची दोन बोटे अर्धी तुटली होती. त्यामुळे उपचारासाठी त्यांनी तत्काळ वायसीएम रुग्णालयामध्ये धाव घेतली होती. उपचार करतेवेळी अर्ध्या तुटलेल्या बोटांवर शस्त्रक्रिया अथवा अन्य तातडीक उपचार होणे अपेक्षित होते. मात्र गांभीयार्ने दखल न घेता, डॉक्टरांनी जखमेवर केवळ तात्पुरत्या स्वरुपाची मलमपट्टी करून रुग्णाला घरी सोडले. गंभीर स्वरूपाची दुखापत असूनही त्याला रुग्णालयात दाखल करून घेतले नाही. गंभीर जखम असताना केवळ मलमपट्टी करून घरी गेलेल्या रुग्णाच्या बोटातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. दुसºया दिवशीही रुग्णाच्या जखमेतून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यानंतर खासगी रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी दाखल झाला. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली असता, वेळीच उपचार न केल्यामुळे पायाची दोनही बोटे निकामी झाली असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. तातडीने उपचार केले असते तर रुग्णाच्या पायाची बोटे गमवावी लागली नसती. यामध्ये वायसीएमच्या डॉक्टरांनी उपचार करण्यात हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला आहे. --------------वायसीएम रुग्णालय हे गरीब आणि गरजू लोकांसाठी आहे. मात्र येथे गरीब रुग्णांना काहीच फायदा होत नाही. या रुग्णाला वायसीएमच्या डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्यामुळे दोन बोटे गमवावी लागली आहेत. रुग्णाचे नुकसान झाले, त्यामुळे वायसीएम प्रशासनाने त्यास भरपाई द्यावी. - राहुल चौधरी, सामाजिक कार्यकर्ते. ------------रुग्णाच्या नातेवाइकांनी लेखी स्वरुपामध्ये तक्रार दाखल केलेली नाही. तक्रार आल्यास चौकशी करून दोषी असलेल्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात येईल.- डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता वायसीएम रुग्णालय. ---------------

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल