शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

पिंपरी वायसीएममधील भोंगळ कारभार : डॉक्टरांच्या बेफिकीरीने त्याने गमावली पायाची बोटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 19:44 IST

किडनीला काहीही झाले नसताना, दोन आठवड्यांपूर्वी एका तरुणावर डायलिसीस केल्याचा धक्कादायक प्रकार वायसीएममध्ये घडला होता...

ठळक मुद्देतक्रारीनंतर होणार चौकशी 

पिंपरी : पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाचा भोंगळ कारभार अवघ्या दोन आठवड्यांत पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. किडनीला काहीही झाले नसताना, दोन आठवड्यांपूर्वी एका तरुणावर डायलिसीस केल्याचा धक्कादायक प्रकार वायसीएममध्ये घडला होता. त्यामुळे प्रशासनावर सर्वच स्तरातून जोरदार टीका झाली होती. आता पुन्हा एकदा पायाच्या बोटांना गंभीर दुखापत असूनही जखमेवर केवळ मलमपट्टी करून रुग्णाला घरी सोडण्यात आले. त्यांच्या बेपर्वाईमुळे रुग्णाला पायाची दोन बोटे गमावण्याची वेळ आली. आता प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी होणार आहे. अजंठानगर येथील रहिवासी अशोक रामभाऊ धेंडे (वय ५५) यांच्या डाव्या पायाच्या दोन बोटांना शनिवारी (दि.२०) रोजी अपघात झाल्याने गंभीर जखम झाली होती. त्यांच्या पायाची दोन बोटे अर्धी तुटली होती. त्यामुळे उपचारासाठी त्यांनी तत्काळ वायसीएम रुग्णालयामध्ये धाव घेतली होती. उपचार करतेवेळी अर्ध्या तुटलेल्या बोटांवर शस्त्रक्रिया अथवा अन्य तातडीक उपचार होणे अपेक्षित होते. मात्र गांभीयार्ने दखल न घेता, डॉक्टरांनी जखमेवर केवळ तात्पुरत्या स्वरुपाची मलमपट्टी करून रुग्णाला घरी सोडले. गंभीर स्वरूपाची दुखापत असूनही त्याला रुग्णालयात दाखल करून घेतले नाही. गंभीर जखम असताना केवळ मलमपट्टी करून घरी गेलेल्या रुग्णाच्या बोटातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. दुसºया दिवशीही रुग्णाच्या जखमेतून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यानंतर खासगी रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी दाखल झाला. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली असता, वेळीच उपचार न केल्यामुळे पायाची दोनही बोटे निकामी झाली असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. तातडीने उपचार केले असते तर रुग्णाच्या पायाची बोटे गमवावी लागली नसती. यामध्ये वायसीएमच्या डॉक्टरांनी उपचार करण्यात हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला आहे. --------------वायसीएम रुग्णालय हे गरीब आणि गरजू लोकांसाठी आहे. मात्र येथे गरीब रुग्णांना काहीच फायदा होत नाही. या रुग्णाला वायसीएमच्या डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्यामुळे दोन बोटे गमवावी लागली आहेत. रुग्णाचे नुकसान झाले, त्यामुळे वायसीएम प्रशासनाने त्यास भरपाई द्यावी. - राहुल चौधरी, सामाजिक कार्यकर्ते. ------------रुग्णाच्या नातेवाइकांनी लेखी स्वरुपामध्ये तक्रार दाखल केलेली नाही. तक्रार आल्यास चौकशी करून दोषी असलेल्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात येईल.- डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता वायसीएम रुग्णालय. ---------------

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल