शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
3
काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
4
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
5
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
6
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
7
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
8
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
9
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
10
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
11
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
12
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
13
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
14
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
15
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
16
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
17
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
18
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
19
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
20
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी

पाण्यासाठी महिलांचा आयुक्तांना घेराव

By admin | Updated: January 25, 2016 00:55 IST

गेल्या आठवडाभरापासून आनंदनगर परिसरात पिण्याचे पाणी वेळेवर व पुरेसे येत नसल्यामुळे रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

पिंपरी : गेल्या आठवडाभरापासून आनंदनगर परिसरात पिण्याचे पाणी वेळेवर व पुरेसे येत नसल्यामुळे रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अधिकाऱ्यांना सांगूनही उपाययोजना केल्या जात नाहीत, असा आरोप करीत संतप्त झालेल्या रहिवासी महिलांनी महापालिका आयुक्त राजीव जाधव यांना घेराव घालून पाणीटंचाई सोडविण्याची मागणी केली. संतप्त झालेल्या रहिवाशांच्या समोरच आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून चांगलेच धारेवर धरले. त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा आदेश दिला. चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टी भागात वेळेवर पाणीपुरवठा होत नाही. उशिरा पाणीपुरवठा केला जात असून, तोही कमी दाबाने होत आहे. यामुळे रहिवाशांचा घरातील पिण्याचा व वापरण्याचाही साठा पूर्ण होत नाही. महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, वयोवृद्ध महिलांचे हाल होत आहेत. या संबंधी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे. तसेच या ठिकाणी वेळेवर गटारींची व शौचालयांची स्वच्छता केली जात नाही. वेळेवर कचरा उचलला जात नसल्यामुळे, दुर्गंधी निर्माण होऊन, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या तक्रारींची प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी. या मागणीसाठी परिसरातील सुशिला वरेकर, सुशिला म्हस्के, माधुरी गायकवाड, आम्रपाली आव्हाळ यांच्यासह सुमारे ५० ते ६० रहिवासी महिलांनी रविवारी दुपारी एकच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचे ठरवले. स्थानिक नगरसेवक यांनीही पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजीव जाधव यांना आनंदनगरातील पाणीटंचाईसह विविध समस्यांची माहिती देऊन, रविवार असूनसुद्धा प्रत्यक्ष पाहणीसाठी बोलावले. आयुक्त येत असल्याचे समजल्यावर संतप्त महिलांनी रास्ता रोको न करता आयुक्तांना घेराव घालविण्याचे ठरवले. दीडच्या सुमारास आयुक्त येताच महिलांनी घेराव घालून तक्रारी मांडायला सुरुवात केल्याने काही वेळ त्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (प्रतिनिधी)