शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेपेक्षा ग्रामपंचायतच सक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 02:49 IST

आयटी पार्क हिंजवडीचा भाग असलेल्या मारुंजी ग्रामस्थांनी तब्बल ३ वेळा ग्रामसभेत ठराव करून महापालिका समावेशाला केराची टोपली दाखवून सपशेल विरोध दर्शविला आहे.

वाकड : आयटी पार्क हिंजवडीचा भाग असलेल्या मारुंजी ग्रामस्थांनी तब्बल ३ वेळा ग्रामसभेत ठराव करून महापालिका समावेशाला केराची टोपली दाखवून सपशेल विरोध दर्शविला आहे. गुरुवारी (दि. २२) ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात पुन्हा याबाबत रणनीती ठरविण्यासाठी ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. एकंदरीत ‘गड्या आपला गाव बरा’, असे मत ग्रामस्थांचे आहे.प्रचंड मोठा डोंगर किनारा आणि निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या मारुंजी गावचे भौगौलिक क्षेत्रफळ ६५४ हेक्टर ९६. ३ आर एवढे असून मागील जनगननेनुसार ४८५३ एवढी लोकसंख्या होती मात्र तो आकडा आता दहा हजारांच्या पुढे गेला आहे. अशातही गावाने साडेचार एकरांचे गायरान शाबूत ठेवण्यात यश मिळविले आहे. महापालिका किंवा पीएमआरडीए या दोनही संस्थांपेक्षा आमची ग्रामपंचायत सक्षम असून यापूर्वी समाविष्ट केलेल्या गावांचा विकास साधण्यास महापालिका अपयशी ठरली असल्याचे कारण पुढे करीत महापालिका कशासाठी असे म्हणत ग्रामस्थ महापालिका समावेशाला कडाडून विरोध करीत आहेत. गाव पीएमआरडीएच्या कक्षेत येण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने महापालिका लगतच्या दहा किमी अंतरावरील गावांना टाऊन प्लॅनिंगच्या कक्षेत घेत बांधकामाबाबत जाचक अटी लादल्या बिल्डिंग बायलॉज ए (अ वर्ग महानगर पालिका अधिनियम) लागू केला यानंतर म्हणजेच २०१५ ला पीएमआरडीए लागू केल्यानंतर आजपर्यंतच्या कालखंडात म्हणजेच सुमारे तीन वर्षात पीएमआरडीएने आत्मीयतेने गावच्या विकासासाठी काहीच योजना आखली नाही. त्यामुळे पीएमआरडीए किंवा महापालिका दोनीही काही कामाच्या नाही, असा समज लोकांचा आहे. अशातही बहुतेकांचा विरोध तर काहींची सकारात्मक प्रतिक्रिया देखील ऐकायला मिळाली.हिंजवडीला लागूनच असलेल्या या गावात दोन तीन आयटी कंपन्या आहेत. ग्रामपंचायतीने रस्ते, शुद्ध फिल्टर पाणी, कचरा व्यवस्थापन, काँक्रीटचे पक्के रस्ते, आधुनिक ग्रामपंचायत कार्यालय, भूमगत गटारे, अशा भक्कम नागरी सुविधा पुरविल्या आहेत गावात माध्यमिक विद्यालय, क्रीडांगण आहे असे असताना तीन वर्षात पीएमआरडीएने गावच्या नियोजनबद्ध विकासासाठी कुठेही ठोस पाऊल उचलले नाही. याच्या उलट बांधकामाबाबत किचकट आणि जाचक अटी लागू केल्या त्यामुळे कायदेशीर मागार्ने बांधकाम करणाºयास अडथळे आणि अनधिकृत विनापरवाना बांधकाम करावे तर ते पाडण्याची भीती अशा द्विधा मन: स्थितीत ग्रामस्थ आहेत.आमचे गाव स्वयंपूर्ण आहे. महापालिका ज्या सुविधा पुरविणार आहे त्या सुविधा आम्ही पुरवितोच. उलट महापालिका प्रशासनच्या पुढे जाऊनही अनेक नागरी सुविधा आम्ही पुरविल्या आहेत. पूर्वी समाविष्ट केलेल्या गावांचे भिजत घोंगडे कायम आहे. या गावांची काय अवस्था आहे हे देखील महापालिकेने तपासणे गरजेचे आहे. केवळ गावांना समाविष्ट करून कराच्या बोजा नागरिकांवर लाडात महापालिका तिजोरी भरणार असेल, तर हा निर्णय चुकीचा आहे. विकास आरखडा आणि त्याची अंमलबजावणी करावी.- बायडाबाई बुचडे, सरपंच, मारुंजीमहापालिकेने गेल्या १०-१५ महापालिकेत समाविष्ट केलेल्या गावांची अवस्था काय आहे हे सर्वश्रुत आहे. महापालिकेत गाव जाऊन बकालपणा वाढणार असेल, तर हा समावेशाचा घाट कशासाठी, असा माझा प्रश्न आहे. पूर्वी समाविष्ठ झालेल्या गावांचा विकास आराखडा अद्याप विकसित नाही. आहे तेच महापालिकेला आवाक्याच्या बाहेर जात आहेत. त्यात आणखी भर कशासाठी आमची गावे समाविष्ट करावीत; मात्र दोन वर्षात विकास आराखडा मंजूर करून त्याची अंमलबजावणी करण्याचे लेखी आश्वासन महापालिकेने द्यावे, अन्यथा आमचा विरोध कायम आहे.- शिवाजी बुचडे पाटील, ग्रामस्थ