शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीच्या मोबाइल मार्केटमध्ये गोलमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 02:44 IST

अ‍ॅक्सेसरीजमध्ये ग्राहकांची फसवणूक; जीएसटी बिलाशिवाय राजरोस होतेय विक्री

- प्रकाश गायकर पिंपरी : मोबाइल ही जीवनावश्यक बाब बनली आहे. मोबाइल घ्यायचा असो किंवा चार्जर; आठवण होते ती पिंपरीतील मोबाइल मार्केटची. कोणत्याही कंपनीचा मोबाइल व अ‍ॅक्सेसरीज मिळण्याचे शहरातले एकमेव हक्काचे ठिकाण म्हणजे पिंपरी मार्केट. परंतु या मार्केटमध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याचे धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ प्रतिनिधीने उजेडात आणला आहे.मोबाइल किंवा मोबाइलशी निगडित इतर साहित्य घेण्यासाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर येथे गर्दी असते. महागडे मोबाइल, तसेच मोबाइलची बॅटरी, हेडफोन, चार्जर, ब्ल्यू टूथ हेडफोन येथे मिळतात. मात्र सामान्य ग्राहकांची दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात लूट केली जाते. मोबाइलचे साहित्य विकून किमतीमध्ये व वॉरंटीमध्ये फिरवाफिरवी केली जाते. ठरावीक कंपनीच्या मोबाइलची बॅटरी विकताना ग्राहकाला सहा महिन्यांची वॉरंटी दिली जाते. वॉरंटीची वस्तू खरेदी केल्यानंतर जीएसटी बिल देणे अपेक्षित आहे. मात्र ग्राहकांना साधे लेखी बिल दिले जाते. त्यावर जीएसटी नंबर नमूद नसतो. सहा महिन्यांच्या आत बॅटरी खराब झाल्यानंतर ग्राहक बॅटरी बदलून घेण्यासाठी दुकानात जातो. त्या वेळी त्याला कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये पाठवण्यात येते. मात्र तेथे गेल्यानंतर ग्राहकांना नियमांचा पाढा वाचून दाखवला जातो. त्यानंतर ग्राहकाला आपली फसवणूक झाल्याचे समजते.सर्व्हिस सेंटरमधून बॅटरी बदलून घेण्यासाठी जीएसटी बिलाची आवश्यकता असते. तसेच बॅटरीची वॉरंटीही तीनच महिन्यांची असते. त्यामुळे बॅटरी बदलून देऊ शकत नाही, असे सांगण्यात येते. तसेच एकाच कंपनीच्या बॅटऱ्या चार प्रकारांत उपलब्ध असतात. साधी बॅटरीही ओरिजिनल बॅटरीप्रमाणेच बॉक्समध्ये ठेवलेली असते. ती साधी बॅटरी ओरिजनल असल्याचे भासवून विक्री करण्यात येते. वास्तविक साध्या बॅटरीच्या बॉक्सवरील माहिती मोठ्या अक्षरात असते, तर ओरिजिनल बॅटरीच्या बॉक्सवरील माहिती ही अतिशय लहान अक्षरांमध्ये नमूद केलेली असते. मात्र याबाबत ग्राहकांना काहीच माहिती नसल्याने डुप्लीकेट बॅटºया वॉरंटी काळ देऊन अव्वाच्या सव्वा दराने विकल्या जातात. ग्राहक पाहून २५० रुपयांपासून ते १६०० रुपयांपर्यंत बॅटरीची किंमत सांगितली जाते. हे झाले बॅटरीचे उदाहरण मात्र इतर साहित्याबाबतही अशीच बनवाबनवी केल्याचे समोर आले आहे.मोबाइल हा सामान्य नागरिकांपासून ते श्रीमंतापर्यंतचा जिव्हाळ्याचा विषय आहे. एखाद्या व्यावसायिकांपासून ते गृहीणीपर्यंत सर्वांनाच मोबाइलची आवश्यकता आहे. त्यामुळे मोबाइलच्या साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची येथे गर्दी असते. याच संधीचा विक्रेते फायदा घेतात. चार रुपयांची वस्तू ४० रुपयांना विकून विके्रते गलेलठ्ठ नफा कमावतात. त्याचवेळी ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागत आहे.ग्राहकांना घाबरवण्याचा प्रयत्नमोबाइल दुरुस्तीत येथे असणारे कारागिर एखाद्या डॉक्टरपेक्षा कमी नाहीत. डॉक्टरकडे गेल्यावर ज्याप्रमाणे डॉक्टर आजारांची माहितीदेऊन पैैसे उकळतात. तशाच प्रकारे मोबाइल दुरुस्ती करण्यासाठी गेल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी सांगून ग्राहकांना घाबरवण्याचा प्रयत्नकेला जातो. आपला मोबाइल खराब होऊ नये यासाठी ग्राहकही ते सांगतील त्यावर विश्वास ठेवून पैैसे खर्च करतात. त्याचाच फायदा घेत मोबाइलचा एक पार्ट खराब झाला असेल तर दहा पार्ट खराब झाल्याचे सांगून पैैसे उकळतात.मोबाइलचे कोणतेही साहित्य घेतले, तरी त्यावर पक्के बिल दिले जात नाही. त्याचप्रमाणे वस्तूचे भावही काहीही सांगितले जातात. मोबाइलचे मोठे मार्केट म्हणून याची ओळख आहे. कोणतीही वस्तू चांगल्या भावामध्ये मिळण्याचे ठिकाण म्हणून ग्राहकांची पसंती असते. मात्र, याचा गैरफायदा घेऊन काही विक्रेते अव्वाच्या सव्वा दराने विक्री करतात. त्यामुळे मार्केटची नावाजलेली ओळख पुसण्याची शक्यता आहे. - माधव दळवी, ग्राहकअ‍ॅक्सेसरीजची नोंद सॉफ्टवेअरमध्ये केली जात नाही. त्यामुळे बिल बनवता येत नाही. परिणामी ग्राहकांना आम्ही जीएसटीचे बिल देऊ शकत नाही. - सचिन चिन्नापुरे, विक्रेते

टॅग्स :Mobileमोबाइलpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGSTजीएसटी