शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीच्या मोबाइल मार्केटमध्ये गोलमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 02:44 IST

अ‍ॅक्सेसरीजमध्ये ग्राहकांची फसवणूक; जीएसटी बिलाशिवाय राजरोस होतेय विक्री

- प्रकाश गायकर पिंपरी : मोबाइल ही जीवनावश्यक बाब बनली आहे. मोबाइल घ्यायचा असो किंवा चार्जर; आठवण होते ती पिंपरीतील मोबाइल मार्केटची. कोणत्याही कंपनीचा मोबाइल व अ‍ॅक्सेसरीज मिळण्याचे शहरातले एकमेव हक्काचे ठिकाण म्हणजे पिंपरी मार्केट. परंतु या मार्केटमध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याचे धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ प्रतिनिधीने उजेडात आणला आहे.मोबाइल किंवा मोबाइलशी निगडित इतर साहित्य घेण्यासाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर येथे गर्दी असते. महागडे मोबाइल, तसेच मोबाइलची बॅटरी, हेडफोन, चार्जर, ब्ल्यू टूथ हेडफोन येथे मिळतात. मात्र सामान्य ग्राहकांची दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात लूट केली जाते. मोबाइलचे साहित्य विकून किमतीमध्ये व वॉरंटीमध्ये फिरवाफिरवी केली जाते. ठरावीक कंपनीच्या मोबाइलची बॅटरी विकताना ग्राहकाला सहा महिन्यांची वॉरंटी दिली जाते. वॉरंटीची वस्तू खरेदी केल्यानंतर जीएसटी बिल देणे अपेक्षित आहे. मात्र ग्राहकांना साधे लेखी बिल दिले जाते. त्यावर जीएसटी नंबर नमूद नसतो. सहा महिन्यांच्या आत बॅटरी खराब झाल्यानंतर ग्राहक बॅटरी बदलून घेण्यासाठी दुकानात जातो. त्या वेळी त्याला कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये पाठवण्यात येते. मात्र तेथे गेल्यानंतर ग्राहकांना नियमांचा पाढा वाचून दाखवला जातो. त्यानंतर ग्राहकाला आपली फसवणूक झाल्याचे समजते.सर्व्हिस सेंटरमधून बॅटरी बदलून घेण्यासाठी जीएसटी बिलाची आवश्यकता असते. तसेच बॅटरीची वॉरंटीही तीनच महिन्यांची असते. त्यामुळे बॅटरी बदलून देऊ शकत नाही, असे सांगण्यात येते. तसेच एकाच कंपनीच्या बॅटऱ्या चार प्रकारांत उपलब्ध असतात. साधी बॅटरीही ओरिजिनल बॅटरीप्रमाणेच बॉक्समध्ये ठेवलेली असते. ती साधी बॅटरी ओरिजनल असल्याचे भासवून विक्री करण्यात येते. वास्तविक साध्या बॅटरीच्या बॉक्सवरील माहिती मोठ्या अक्षरात असते, तर ओरिजिनल बॅटरीच्या बॉक्सवरील माहिती ही अतिशय लहान अक्षरांमध्ये नमूद केलेली असते. मात्र याबाबत ग्राहकांना काहीच माहिती नसल्याने डुप्लीकेट बॅटºया वॉरंटी काळ देऊन अव्वाच्या सव्वा दराने विकल्या जातात. ग्राहक पाहून २५० रुपयांपासून ते १६०० रुपयांपर्यंत बॅटरीची किंमत सांगितली जाते. हे झाले बॅटरीचे उदाहरण मात्र इतर साहित्याबाबतही अशीच बनवाबनवी केल्याचे समोर आले आहे.मोबाइल हा सामान्य नागरिकांपासून ते श्रीमंतापर्यंतचा जिव्हाळ्याचा विषय आहे. एखाद्या व्यावसायिकांपासून ते गृहीणीपर्यंत सर्वांनाच मोबाइलची आवश्यकता आहे. त्यामुळे मोबाइलच्या साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची येथे गर्दी असते. याच संधीचा विक्रेते फायदा घेतात. चार रुपयांची वस्तू ४० रुपयांना विकून विके्रते गलेलठ्ठ नफा कमावतात. त्याचवेळी ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागत आहे.ग्राहकांना घाबरवण्याचा प्रयत्नमोबाइल दुरुस्तीत येथे असणारे कारागिर एखाद्या डॉक्टरपेक्षा कमी नाहीत. डॉक्टरकडे गेल्यावर ज्याप्रमाणे डॉक्टर आजारांची माहितीदेऊन पैैसे उकळतात. तशाच प्रकारे मोबाइल दुरुस्ती करण्यासाठी गेल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी सांगून ग्राहकांना घाबरवण्याचा प्रयत्नकेला जातो. आपला मोबाइल खराब होऊ नये यासाठी ग्राहकही ते सांगतील त्यावर विश्वास ठेवून पैैसे खर्च करतात. त्याचाच फायदा घेत मोबाइलचा एक पार्ट खराब झाला असेल तर दहा पार्ट खराब झाल्याचे सांगून पैैसे उकळतात.मोबाइलचे कोणतेही साहित्य घेतले, तरी त्यावर पक्के बिल दिले जात नाही. त्याचप्रमाणे वस्तूचे भावही काहीही सांगितले जातात. मोबाइलचे मोठे मार्केट म्हणून याची ओळख आहे. कोणतीही वस्तू चांगल्या भावामध्ये मिळण्याचे ठिकाण म्हणून ग्राहकांची पसंती असते. मात्र, याचा गैरफायदा घेऊन काही विक्रेते अव्वाच्या सव्वा दराने विक्री करतात. त्यामुळे मार्केटची नावाजलेली ओळख पुसण्याची शक्यता आहे. - माधव दळवी, ग्राहकअ‍ॅक्सेसरीजची नोंद सॉफ्टवेअरमध्ये केली जात नाही. त्यामुळे बिल बनवता येत नाही. परिणामी ग्राहकांना आम्ही जीएसटीचे बिल देऊ शकत नाही. - सचिन चिन्नापुरे, विक्रेते

टॅग्स :Mobileमोबाइलpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGSTजीएसटी