शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अकरावी प्रवेश : बावीस हजार विद्यार्थ्यांचा प्रवेशास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 02:26 IST

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील गुणवत्ता यादीत महाविद्यालय मिळालेल्या २२ हजार ४८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेता पुढच्या फेरीतील गुणवत्ता यादीची वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे  - अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील गुणवत्ता यादीत महाविद्यालय मिळालेल्या २२ हजार ४८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेता पुढच्या फेरीतील गुणवत्ता यादीची वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे. या फेरीत केवळ १७ हजार २११ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश घेतले.अकरावी प्रवेशासाठी ७५ हजार ९३९ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे, त्यापैकी ४१ हजार ९६१ विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये त्यांनी दिलेल्या १० पसंती क्रमानुसार महाविद्यालय मिळाले होते. मात्र या ४१ हजार ९६१ विद्यार्थ्यांपैकी केवळ १७ हजार २११ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. बायफोकलच्या २ हजार ६४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. २२ हजार ४८१ विद्यार्थ्यांना मात्र मिळालेले महाविद्यालय पसंत नसल्याने त्यांनी प्रवेश घेतलेला नाही. दरम्यान पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी एक दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. १० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.दुसऱ्या फेरीसाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम बदलण्याची विद्यार्थ्यांना संधी आहे. पहिल्या फेरीतील महाविद्यालयांचे कटआॅफ १० जुलैनंतर जाहीरकरण्यात येणार आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पसंतीक्रम बदलात येतील. दुसºया फेरीची गुणवत्ता यादी १३ जुलै रोजी जाहीर होणार आहे. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १७ हजार १८९ इतकी आहे. या १७ हजार १८९ विद्यार्थ्यांना सोमवारी प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे, अन्यथा त्यांना प्रवेशाच्या सर्व फेºया पूर्ण झाल्यानंतर प्रवेश दिला जाणार आहे.केंद्रीय आॅनलाइन प्रवेश नियंत्रण समितीतर्फे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या इयत्ता अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पहिल्या पसंती क्रमाव्यतिरिक्त अन्य २ ते १० पर्यंतच्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले असल्यास त्यांना प्रवेशासाठी पुढील फेºयांमध्ये संधी उपलब्ध असणार आहे. महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन रद्द केल्यास त्या विद्यार्थ्यांना ब्लॉक केले जाणार आहे.प्रवेशासाठी मंगळवारपर्यंत मुदतवाढअकरावीच्या पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी मंगळवार, दि. १० जुल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे काही कारणास्तव ज्यांना प्रवेश घेता आला नाही त्यांना मंगळवारी आणखी एक संधी आहे. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे बंधनकारक आहे, अन्यथा त्यांचा अर्ज प्रवेश प्रक्रियेतून बाद केला जाणार आहे. 

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी