शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

अकरावी प्रवेश : बावीस हजार विद्यार्थ्यांचा प्रवेशास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 02:26 IST

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील गुणवत्ता यादीत महाविद्यालय मिळालेल्या २२ हजार ४८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेता पुढच्या फेरीतील गुणवत्ता यादीची वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे  - अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील गुणवत्ता यादीत महाविद्यालय मिळालेल्या २२ हजार ४८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेता पुढच्या फेरीतील गुणवत्ता यादीची वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे. या फेरीत केवळ १७ हजार २११ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश घेतले.अकरावी प्रवेशासाठी ७५ हजार ९३९ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे, त्यापैकी ४१ हजार ९६१ विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये त्यांनी दिलेल्या १० पसंती क्रमानुसार महाविद्यालय मिळाले होते. मात्र या ४१ हजार ९६१ विद्यार्थ्यांपैकी केवळ १७ हजार २११ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. बायफोकलच्या २ हजार ६४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. २२ हजार ४८१ विद्यार्थ्यांना मात्र मिळालेले महाविद्यालय पसंत नसल्याने त्यांनी प्रवेश घेतलेला नाही. दरम्यान पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी एक दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. १० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.दुसऱ्या फेरीसाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम बदलण्याची विद्यार्थ्यांना संधी आहे. पहिल्या फेरीतील महाविद्यालयांचे कटआॅफ १० जुलैनंतर जाहीरकरण्यात येणार आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पसंतीक्रम बदलात येतील. दुसºया फेरीची गुणवत्ता यादी १३ जुलै रोजी जाहीर होणार आहे. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १७ हजार १८९ इतकी आहे. या १७ हजार १८९ विद्यार्थ्यांना सोमवारी प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे, अन्यथा त्यांना प्रवेशाच्या सर्व फेºया पूर्ण झाल्यानंतर प्रवेश दिला जाणार आहे.केंद्रीय आॅनलाइन प्रवेश नियंत्रण समितीतर्फे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या इयत्ता अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पहिल्या पसंती क्रमाव्यतिरिक्त अन्य २ ते १० पर्यंतच्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले असल्यास त्यांना प्रवेशासाठी पुढील फेºयांमध्ये संधी उपलब्ध असणार आहे. महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन रद्द केल्यास त्या विद्यार्थ्यांना ब्लॉक केले जाणार आहे.प्रवेशासाठी मंगळवारपर्यंत मुदतवाढअकरावीच्या पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी मंगळवार, दि. १० जुल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे काही कारणास्तव ज्यांना प्रवेश घेता आला नाही त्यांना मंगळवारी आणखी एक संधी आहे. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे बंधनकारक आहे, अन्यथा त्यांचा अर्ज प्रवेश प्रक्रियेतून बाद केला जाणार आहे. 

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी