शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अकरावी प्रवेश : बावीस हजार विद्यार्थ्यांचा प्रवेशास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 02:26 IST

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील गुणवत्ता यादीत महाविद्यालय मिळालेल्या २२ हजार ४८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेता पुढच्या फेरीतील गुणवत्ता यादीची वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे  - अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील गुणवत्ता यादीत महाविद्यालय मिळालेल्या २२ हजार ४८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेता पुढच्या फेरीतील गुणवत्ता यादीची वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे. या फेरीत केवळ १७ हजार २११ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश घेतले.अकरावी प्रवेशासाठी ७५ हजार ९३९ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे, त्यापैकी ४१ हजार ९६१ विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये त्यांनी दिलेल्या १० पसंती क्रमानुसार महाविद्यालय मिळाले होते. मात्र या ४१ हजार ९६१ विद्यार्थ्यांपैकी केवळ १७ हजार २११ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. बायफोकलच्या २ हजार ६४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. २२ हजार ४८१ विद्यार्थ्यांना मात्र मिळालेले महाविद्यालय पसंत नसल्याने त्यांनी प्रवेश घेतलेला नाही. दरम्यान पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी एक दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. १० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.दुसऱ्या फेरीसाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम बदलण्याची विद्यार्थ्यांना संधी आहे. पहिल्या फेरीतील महाविद्यालयांचे कटआॅफ १० जुलैनंतर जाहीरकरण्यात येणार आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पसंतीक्रम बदलात येतील. दुसºया फेरीची गुणवत्ता यादी १३ जुलै रोजी जाहीर होणार आहे. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १७ हजार १८९ इतकी आहे. या १७ हजार १८९ विद्यार्थ्यांना सोमवारी प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे, अन्यथा त्यांना प्रवेशाच्या सर्व फेºया पूर्ण झाल्यानंतर प्रवेश दिला जाणार आहे.केंद्रीय आॅनलाइन प्रवेश नियंत्रण समितीतर्फे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या इयत्ता अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पहिल्या पसंती क्रमाव्यतिरिक्त अन्य २ ते १० पर्यंतच्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले असल्यास त्यांना प्रवेशासाठी पुढील फेºयांमध्ये संधी उपलब्ध असणार आहे. महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन रद्द केल्यास त्या विद्यार्थ्यांना ब्लॉक केले जाणार आहे.प्रवेशासाठी मंगळवारपर्यंत मुदतवाढअकरावीच्या पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी मंगळवार, दि. १० जुल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे काही कारणास्तव ज्यांना प्रवेश घेता आला नाही त्यांना मंगळवारी आणखी एक संधी आहे. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे बंधनकारक आहे, अन्यथा त्यांचा अर्ज प्रवेश प्रक्रियेतून बाद केला जाणार आहे. 

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी