शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राष्ट्रवादीचा तहसील कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 06:40 IST

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भाजप सरकारच्या विरोधात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

वडगाव मावळ : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भाजप सरकारच्या विरोधात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये सरकारने जाहीर केल्याप्रमाणे सर्व शेतकºयांची सरसकट कर्जमाफीची शंभर टक्के अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी. शेतकºयांच्या शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा मिळवून हमीभाव द्यावा. कृषी मालाची खरेदी करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, तसेच रब्बी हंगामासाठी शेतकºयांना पीककर्ज तातडीने देण्यात यावे़, आदी मागण्या या वेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या.पोटोबामहाराज मंदिरापासून सुरुवात झालेल्या मोर्चाला पंचायत समिती चौकामध्ये सभेचे स्वरूप आले़ यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टी व शिवसेना सत्तेत आल्यापासून गेल्या तीन वर्षांत राज्यांमधल्या शेतकºयांच्या प्रश्नावर प्रचंड आंदोलने होऊनसुद्धा भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या सरकारने याबाबत योग्य ती पावले उचललेली नाहीत़ राज्यात पंधरा हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्याने महाराष्ट्र हे सर्वाधिक आत्महत्या केलेले राज्य, अशी बदनामी आपल्या राज्याच्या वाटेला आलेली आहे, असे निवेदनात म्हटले आहे. शेतकºयांनी कर्जमाफी जाहीर केली ही कर्जमाफी ऐतिहासिक असून देशातील सर्वांत मोठी माफी आहे, असा ढोल बडवला. परंतु प्रत्यक्षात कर्जमाफीची अंमलबजावणी होणे अत्यंत कठीण होऊन बसले़ या बोलघेवड्या सरकारला हुसकावून लावण्याची वेळ आता आली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.या वेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश ढोरे, विठ्ठल शिंदे, सुरेश धोत्रे, किशोर भेगडे, गणेश काकडे, शोभा कदम, शुभांगी राक्षे, साहेबराव कारके, दत्ता शेवाळे, विक्रम कदम, सुनील ढोरे, सचिन घोटकुले, रूपाली दाभाडे आदी उपस्थित होते़

टॅग्स :National Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी