शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

Pimpri Chinchwad| मराठा आरक्षणासाठी माजी सरपंचाची इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या

By नारायण बडगुजर | Updated: October 28, 2023 14:59 IST

आळंदी येथे शुक्रवारी (दि. २८) रात्री आठच्या सुमारास हा प्रकार समोर आला....

पिंपरी : मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी चिठ्ठी लिहून माजी सरपंच असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली. आळंदी येथे शुक्रवारी (दि. २८) रात्री आठच्या सुमारास हा प्रकार समोर आला.   

व्यंकट नरसिंग ढोपरे (६५) असे आत्महत्या केलेल्या माजी सरपंचांचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यंकट ढाेपरे हे लातूर जिल्ह्याच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उमरदरा या गावचे माजी सरपंच आहेत. नऱ्हे आंबेगाव येथे वास्तव्यास असलेला मुलगा संदीप ढोपरे याच्याकडे व्यंकट ढोपरे आले होते.  

दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपाषेण, आंदोलन, मोर्चे निघत असताना व्यंकट ढोपरे यांनी टोकाचे पाऊल उचचले. आळंदीला दर्शनासाठी जाऊन येतो, असे सांगून ढोपरे हे शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घरून निघाले. दुपारी तीनच्या सुमारास ढोपरे यांचे कपडे धुताना घरच्यांना चिठ्ठी सापडली. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यावेळी रात्री आठच्या सुमारास इंद्रायणी नदी घाटावर ढोपरे यांची पिशवी व इतर साहित्य मिळून आले. त्यामुळे अग्निशामक दलाने रात्रीच ढोपरे यांचा इंद्रायणी नदीपात्रात शोध सुरू केला. रात्रभर तसेच शनिवारी सकाळी देखील शोध सुरू असताना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास मृतदेह नदीत मिळाला. आळंदी पोलिस तपास करीत आहेत.  

काय आहे चिठ्ठीमध्ये?

मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे. खूपवेळा सरपंच या नात्याने माझ्या मिळवून देण्याचा प्रयत्न केला. माझ्या गावातील सर्व जातीधर्माच्या समाजाला घेऊन बऱ्याचवेळेस मोर्चामध्ये सहभाग घेऊन संघर्ष केला पण सरकारला त्याबद्दल आतापर्यंत दया आली नाही. 

माझ्या मुलाचा कृषीखात्यात २०१२ ला अनुकंपातत्वाखाली माझ्या पत्नीच्या वडिलांच्या जागी प्रस्ताव दाखल केला. त्यानंतर कागदपत्रे कृषी संचालक कार्यालयात जमा करा, असे पत्र देण्यात आले. त्यानुसार सर्व कागदपत्रांची पुर्तता केली. तरीसुद्धा आजीआजोबांच्या जागेवर नोकरी देता येत नाही, अशी पत्राव्दारे माहिती दिली. ती जागा आमच्या हक्काची असून त्याची पूर्ण फाइल माझ्यागावी घरी कपाटात आहे. अधिकाऱ्यांच्या अपेक्षेपोटी आम्ही डावलले गेलो. आमच्या पदरी निराशा टाकण्यात आली. आजरोजी माझा मुलगा बेकार फिरत आहे.    

मी सरपंच या नात्याने २०२१ ला २०२१ ला ६५ वर्षीय निराधार लोकांच्या पगारासाठी शिरूर अनंतपाळ तहसीलदारांकडे ५० ते ६० लोकांचे पेपर देऊन देखील त्या गरीब लोकांचे पगार शासन व प्रशासनाने केले नाहीत. हे शासन प्रशासन स्वत:ची खळगी भरण्यात व्यस्त आहेत. जनतेला न्याय भेटत नाही. या निराशेपोटी मी माझी आहुती देत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील