शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पिंपरी इथं भंगाराच्या गोदामांना आग, १५० गोदामे, दुकाने खाक; मोठी जीवितहानी टळली

By नारायण बडगुजर | Updated: April 6, 2024 21:16 IST

कुदळवाडीतील घटना, अग्निशामक दलाच्या १२ गाड्या, पुणे महापालिकेची एक, चाकण नगर परिषदेची एक, चाकण एमआयडीसीची एक, चिंचवड एमआयडीसीची एक व टँकर घटनास्थळी दाखल झाल्या.

पिंपरी : भंगार साहित्याच्या गोदामांना लागेल्या आगीत सुमारे १५० गोदामे व दुकाने जळून खाक झाली. चिखलीतील कुदळवाडी परिसरात शनिवारी (दि. ६) रात्री पावणेएकच्या सुमारास ही घटना घडली. आग लागलेल्या परिसरातील नागरिकांना वेळीच बाहेर काढल्याने जीवितहानी टळली. आगीचे कारण समजू शकले नाही.

अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, चिखलीतील कुदळवाडी येथील अनधिकृत भंगार गोदामाला आग लागल्याची माहिती शनिवारी रात्री पावणेएकच्या सुमारास मिळाली. त्यानंतर महापालिकेच्या अग्निशामक दलाचे बंब आणि जवान घटनास्थळी लागलीच दाखल झाले. गोदामांमध्ये प्लास्टिक, रबर, काच, कागद असे साहित्य असल्याने आगीने रौद्र रुप धारण केले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या १२ गाड्या, पुणे महापालिकेची एक, चाकण नगर परिषदेची एक, चाकण एमआयडीसीची एक, चिंचवड एमआयडीसीची एक व टँकर घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामकच्या ८० जवानांनी ७० ते ७२ बंबांच्या साह्याने सकाळी सहापर्यंत आग नियंत्रणात आणली. सात ते आठ एकरचा परिसर आगीने बाधीत झाला. 

प्रशासनाला माहिती मिळेना

चिखली कुदळवाडीतील अनधिकृत भंगार गोदामांचा प्रश्न अनेक वर्षांपासून आहे. महापालिकेने वेळोवेळी संबंधित व्यावसायिकांवर कारवाई केली आहे. व्यावसायिक नोटीसींना प्रतिसाद देत नाहीत. ना हरकत प्रमाणपत्र घेत नाहीत. योग्य त्या उपाययोजनांची पुर्तता करत नाहीत. आग नियंत्रणात आणण्याची त्यांच्याकडे कोणतीही यंत्रणा नाही. आगीच्या घटनेनंतर नुकसान झालेल्या गोदामांची व त्यांच्या मालकांची माहितीही दिली जात नसल्याचे अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले. 

पोलिसांचा फौजफाटा

आगीचे लोट पाहून नागरिकांनी परिसरात एकच गर्दी केली होती. दीड ते दोन हजार नागरिक तेथे जमा झाले होते. त्यामुळे स्थानिक पोलिसांसह इतर पोलिस ठाणे तसेच मुख्यालयाकडील फौजफाटा तैनात केला होता, तसेच पोलिस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

आगीत नुकसान झालेल्या गोदाम व दुकानांच्या मालकांची नावे व इतर माहिती कळू शकलेली नाही. उन्हाळ्यामुळे या भागात पुन्हा आग लागण्याचा धोका आहे. या गोदामांमुळे वारंवार आगीच्या घटना घडतात. व्यावसायिकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.  - मनोज लोणकर, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका   

आगीचे कारण समजू शकलेले नाही. अग्निशामक दलाच्या अहवालानंतर याबाबत गुन्हा दाखल करावा किंवा कसे याबाबत कार्यवाही होईल. - ज्ञानेश्वर काटकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चिखली

टॅग्स :fireआग