शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

मांसाहारी जेवणावरून आईशी वाद घालणाऱ्या वडिलांचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 16:00 IST

कोरोना व्हायरस बाबतच्या मेसेज मुळे वाद?

ठळक मुद्देदेहू येथील घटना : देहूरोड पोलिसांनी केली मुलाला अटक

पिंपरी : मांसाहारी जेवण तयार करून देण्यासाठी नकार दिल्याने आई व दारु पिऊन आलेले वडील यांच्यात वाद झाला. यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या मुलाला वडिलांनी मारहाण केली. यात मुलाने लाकडी दांडक्याने डोक्यात मारल्याने वडिलांचा मूत्यू झाला. देहू येथील विठ्ठलवाडी येथे रविवारी (दि. १६) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. दारू पिऊन आईला त्रास देणाऱ्या वडिलांना मुलाने लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्याने वडिलांचा मृत्यू झाला. देहूगाव येथील विठ्ठलवाडी येथे रविवारी (दि. १६) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुलाला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. संतोष विठ्ठल येळवंडे (वय ४७) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. विराज संतोष येळवंडे (वय १९) असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे. तर त्याची आई कविता संतोष येळवंडे (वय ४०, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष येळवंडे त्यांची पत्नी फिर्यादी कविता यांना दारू पिऊन त्रास देत असत. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ते अशाच पद्धतीने दारू पिऊन आले. मांसाहारी जेवण तयार करून दे, असा आग्रह त्यांनी पत्नी कविता यांच्याकडे धरला. रोगराई पसत आहे, कशाला अशा मांसाहार घेता व आम्हालाही मांसाहार करायला सांगतात, असे फिर्यादी कविता पती संतोष यांना म्हणाल्या. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. यात संतोष यांनी पत्नी कविता यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांचा मुलगा विराज याने त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संतोष यांनी मुलगा विराज यालाही शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. या वादात मुलगा विराज याने लाकडी दांडक्याने वडील संतोष यांना मारहाण केली. यावेळी त्यांच्या डोक्याला जबर मार लागून ते गंभीर जखमी झाले. याबाबत शेजारील काही जणांना माहिती मिळाली. संतोष यांना पिंपरी येथील वायीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानुसार याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुलगा विराज याला पोलिसांनी अटक केली आहे. देहूरोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शाहीद पठाण तपास करीत आहेत.

कोरोना व्हायरस बाबतच्या मेसेज मुळे वाद?चीनमध्ये कोरोना व्हायरसने हजारो जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे जगभरात कोरोनाबाबत अनेक समज व गैरसमज आहेत. मांसाहरातून हा व्हायरस होत असल्याचा मेसेज तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. खातरजमा न करताच असे मेसेज फॉरवर्ड करण्यात येत आहेत. त्यामुळे मांसाहार धोकादायक असल्याचा बहुतांश जणांचा गैरसमज आहे. असाच समज झाल्याने कविता यांनी मांसाहारी जेवण तयार करण्यास नकार दिला. त्यामुळे पती संतोष येळवंडे यांनी कविता यांच्याशी वाद घातल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMurderखूनPoliceपोलिसcorona virusकोरोना