शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

शेतकऱ्यांकडून रस्त्यासाठी शेतजमिनीचे दान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 02:05 IST

नागरीकरण व वाढत्या लोकसंख्येमुळे सर्वत्र जमिनीला सोन्याचा भाव आला आहे.

- देवराम भेगडे देहूरोड : नागरीकरण व वाढत्या लोकसंख्येमुळे सर्वत्र जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. जमिनीवरून सख्खे भाऊ आणि बहिणी, भावकी व शेजारी यांचे वाद होत आहेत. विविध सरकारी प्रकल्प, रस्ते, नागरी भागातील विकास आराखड्यातील सुविधा विकसित करण्यासाठी मोबदला मिळणार असतानाही जमीन मालक व शेतकरी त्याकरिता जमीन देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महत्त्वाचे विकास प्रकल्प, रिंगरोड, आरक्षणे विकसनाची कामे होऊ शकलेली नाहीत. मात्र देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील किन्हई गावातील शेतकºयांनी कसलाही मोबादला न घेता अडीच किलोमीटर लांबीचा किन्हई ते शेलारवाडी दरम्यानचा सार्वजनिक रस्ता उभारण्यासाठी मोफत जमीन दाने केली आहे.शेतकºयांनी जमीन उपलब्ध करून दिल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सदस्या अ‍ॅड. अरुणा पिंजण यांच्या प्रयत्नातून कॅन्टोन्मेंटकडून यंत्रसामग्रीचे सहकार्य घेऊन १५ दिवसांत मुरूमाचा कायमस्वरूपी पक्का रस्ता तयार केला आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील किन्हई गावातील बहुतांशी शेतजमिनी विविध लष्करी प्रकल्पांसाठी सुरुवातीला ब्रिटिश सरकार व देश स्वतंत्र झाल्यानंतर भारत सरकारने संपादित केलेल्या आहेत. त्यामुळे बहुतांशी शेतकरी अल्पभूधारक झाले आहेत. त्यातच देहूरोड व इतर भागात ये-जा करण्यासाठी लष्करी भागातील त्यांच्या ताब्यातील एकाच रस्त्यावर अवलंबून राहावे लागत होते. शेलारवाडी, तळेगाव दाभाडे व मावळ भागात जाण्यासाठी नऊ- दहा किलोमीटरचा वळसा घालावा लागत होता. किन्हई तेशेलारवाडी रस्ता करण्याचीअनेकदा मागणी होत होती. २०१९ वर्षाच्या सुरुवातीच्या मुहूर्तावर काम सुरू झाले आहे.>शेतातील पिके काढून दिली जमीनअ‍ॅड. अरुणा पिंजण यांनी किन्हई -शेलारवाडी रस्ता करण्यासाठी गावातील ग्रामस्थ व शेतकरी यांची बैठक घेतली. संबंधित रस्ता तयार करण्यासाठी सरकारी पातळीवर नवीन रस्त्याची मागणी, सर्वेक्षण, भूसंपादन, संभाव्य अडचणी, जमीन मोबदला, नुकसान भरपाई, अंदाजपत्रक मंजुरी, रस्ता बांधकाम मंजुरी आदी सर्व सोपस्कार पूर्ण झाले तरच रस्त्याचे काम होऊ शकते. मात्र याकरिता मोठा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. तसेच शेतकºयांनी मोबदला न घेता रस्त्यासाठी जमीन उपलब्ध करून दिल्यास रस्ता तयार करणे शक्य असल्याचे या बैठकीत पिंजण यांनी सांगितले. पिंजण यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत किन्हईतील २२ शेतकºयांनी पिके काढून घेत रस्त्यासाठी जमीन दिली.१५ दिवसांत अडीच किलोमीटर रस्ताकॅन्टोन्मेंट बोर्डाने रस्त्याच्या कामासाठी लागणारी दोन यंत्रे व दोन डंफर अशी यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली. एका शेतकºयाने त्याच्या जमिनीतील मुरूम उपलब्ध करून दिला असून, अवघ्या १५ दिवसांत अडीच किलोमीटर लांब व १५ फूट रूंदीचा पक्का रस्ता सुमारे पाच लाख रुपये खर्चात तयार झाला असून, मावळचे आमदार बाळा भेगडे, सर्व बोर्ड सदस्य, उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत वाहतुकीसाठी समारंभपूर्वक खुला करण्यात आला आहे.>किन्हईतील शेतकºयांनी यापूर्वी संरक्षण विभागाच्या प्रकल्पां-साठी जमिनी दिलेल्या आहेत. असे असतानाही रस्त्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर पुन्हा रस्त्यासाठी मोफत जमीन देण्यास एकाच बैठकीत संमती दिली. रस्त्यासाठी सहकार्य करून वेगळा आदर्श या शेतकºयांनी ठेवला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन व पदाधिकाºयांनी सकारात्मक भूमिका घेत सहकार्य केल्याने रस्ता तयार झाला आहे.- अ‍ॅड. अरुणा पिंजण, सदस्या, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड