शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

‘त्यांना’ समस्या सोडवावी लागणे हे नोकरशाहीचे अपयश - महेश झगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 02:28 IST

नळ जोडणी करणे,गटारे साफ करणे, रस्त्याची दुरूस्ती करणे आदी कामे करून नागरिकांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी प्रशासकीय अधिका-यांची आहे. मात्र, अधिकारी या कामांकडे दुर्लक्ष करत असल्याने या प्रकारची विविध कामे खासदार, आमदार, नगरसेवक या लोकप्रतिनिधींना करावी लागत आहेत.

पुणे - नळ जोडणी करणे,गटारे साफ करणे, रस्त्याची दुरूस्ती करणे आदी कामे करून नागरिकांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी प्रशासकीय अधिका-यांची आहे. मात्र, अधिकारी या कामांकडे दुर्लक्ष करत असल्याने या प्रकारची विविध कामे खासदार, आमदार, नगरसेवक या लोकप्रतिनिधींना करावी लागत आहेत. मात्र, हे नोकरशाहीचे अपयश आहे, अशी खंत माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी मंगळवारी व्यक्त केली.अमृतवेल फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘गव्हर्नन्स संवाद अभियान’ कार्यक्रमात झगडे बोलत होते. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष धर्मेंद्र पवार उपस्थित होते.ते म्हणाले, की कायदे तयार करणे, धोरण आखणे, अंदाजपत्रकात तरतूद करणे ही लोकप्रतिनिधींची कामे असून या कामांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नोकरशाहीची आहे. मात्र, काही अधिकारी गेंड्याच्या कातडीचे आहेत.त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.संसद, विधिमंडळाने तयार केलेले कायदे, योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी होते की नाही, याचे लेखापरीक्षण झाले पाहिजे.शासनाने माहितीचा अधिकार, झिरो पेन्डन्सी, सेवा हमी असे अनेक कायदे आणले. मात्र, केवळ कायदे केल्यामुळे प्रश्न सुटत नाहीत. तर नोकरशाहीकडून कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे.तसेच प्रशासनातील शेवटच्या स्तरावरील यंत्रणेच्या कामावर लक्ष देण्याची गरज आहे. सध्या माहिती अधिकाराची सुमारे ३७ हजार प्रकरणे प्रलंबित आहेत.प्रशासनात पारदर्शकता असेल तर माहिती अधिकार कायद्याची गरजच भासणार नाही. प्रशासन सक्षम नसल्याने त्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.शहर नियोजन हा माझा आवडीचा विषय असल्याने मी पीएमआरडीएचा पदभार स्वीकारून विकास कामांना सुरूवात केली. बांधकाम परवाने आॅनलाइन देण्यासाठी व्हर्च्युअल आॅफिससह रोजगारनिर्मिती, स्थानिक लोकांच्या अर्थार्जनाच्या दृष्टीने मेगा सिटीचा रोडमॅप यावर भर दिला.मात्र, जसे माझे स्वप्न होते, तशा पद्धतीने सध्या काम होताना दिसत नाही. कदाचित भविष्यात ही कामे केली जातील.पालकमंत्र्यांना समजावून सांगण्यात कमी पडलोपीएमआरडीएतून झालेल्या बदलीबाबत बोलताना झगडे म्हणाले, ‘पालकमंत्री गिरीश बापट आणि माझे चांगले संबंध होते. मात्र, त्यांचे, माझे विचार वेगळे असल्याने काही ठिकाणी मतभिन्नता असू शकते, कदाचित त्यांना समजावून सांगण्यात मी कमी पडलो.तसेच निवृत्तीनंतर 'राजकारणात जाणार नाही,परंतु,माझ्या ज्ञानाचा व अनुभवाचा समाजाला फायदा करून देण्यासाठी कार्यरत राहणार आहे.केंद्र शासनाने यूपीएससीची परीक्षा न देता खासगी कंपन्यातील अधिका-यांना थेट सहसचिवपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र,या निर्णयावर चर्चा होण्याची गरज आहे. खासगी क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या ज्ञानाचा उपयोग प्रशासनात झाला पाहिजे. परंतु, त्यांचीही निवड यूपीएससीद्वारे होणार का?, संबंधित अधिकारी प्रशासनाशी एकनिष्ठ राहणार आहेत का? अशा अनेक शंका आहेत. त्यामुळे या निर्णयाचे विश्लेषण झाले पाहिजे, असे महेश झगडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाnewsबातम्या