शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे अतिक्रमण

By admin | Updated: June 24, 2016 01:50 IST

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) पिंपरी, चिंचवड व भोसरी भागातील भूखंडांवर एमआयडीसीच्याच अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारीमुळे अतिक्रमण झाले आहेत

पिंपरी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) पिंपरी, चिंचवड व भोसरी भागातील भूखंडांवर एमआयडीसीच्याच अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारीमुळे अतिक्रमण झाले आहेत. एमआयडीसीच्या मुंबईतील मुख्यालयातून मुख्य अभियंत्यांनी पुण्यातील उपअभियंता, कार्यकारी अभियंता, विभागीय व्यवस्थापक यांना १६ जून २००९ रोजी अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना देऊन जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र, सात वर्षे उलटूनसुद्धा एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अतिक्रमणे वाढतच आहेत.एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या २५ मे २००९ला झालेल्या बैठकीत उपअभियंता, कार्यकारी अभियंता यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या होत्या. यानुसार १६ जून २००९ला अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, अजून कोणत्याही ठिकाणी कारवाई करण्यात आली नाही. अधिकारी अतिक्रमणे झालेल्या ठिकाणी फिरकलेच नाहीत. केवळ कागदोपत्री घोडे नाचवल्याने एमआयडीसीच्या भूखंडांवर अतिक्रमणे सुरूच आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनुसार उपअभियंता व कार्यकारी अभियंत्यांनी विभागीय व्यवस्थापक व प्रांत अधिकाऱ्यांकडून अतिक्रमणे हटविण्याचे काम करून घेणे अपेक्षित होते. कार्यालयाच्या अखत्यारित येणाऱ्या जागांवरील रस्ते, मोकळ्या जागा, सार्वजनिक सुविधांसाठी ठेवण्यात आलेले आरक्षित भूखंड आहेत का, हे पाहणे, कोणत्या जागेवर अतिक्रमण झाले आहे का, याचा शोध घेणे, हे विभागीय व्यवस्थापक व प्रांतिक अधिकारी यांचे प्राथमिक काम आहे. अतिक्रमणे झाल्यास त्याला उपअभियंता व कार्यकारी अभियंता जबाबदार राहतील, असे मुख्य कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या सूचनांमध्ये म्हटले आहे.एमआयडीसीच्या जागेभोवती सीमाभिंत बांधणे, कुंपन लावणे या कामासाठी किती खर्च आहे, ते तयार करून त्याची प्रशासकीय मान्यता घेणे व लवकरात लवकर काम करून घेणे. अतिक्रमण होत असल्याचे कळताच त्या भागातील विभागीय व्यवस्थापक व प्रांत अधिकारी यांनी कळवणे बंधनकारक आहे. तसेच अतिक्रमण हटवण्यापर्यंत त्या ठिकाणी स्वत: हजर राहावे, असेही यात नमूद करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)एमआयडीसीच्या कोणत्या भूखंडावर अतिक्रमणे होत असतील, तर त्याची एका महिन्याच्या आत यादी तयार करून तेथील बांधकामे हटविण्यासाठी काय करता येईल, याचा कृती आराखडा तयार करणे, तसेच फिल्ड आॅफिसरने अहवाल सादर करायचा व याची अंमलबजावणी होते का नाही, हे पाहणे. अशा सर्व सूचना एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना २००९लाच देण्यात आल्या होत्या. मात्र, या सूचना केवळ कागदोपत्रीच राहिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अतिक्रमणे वाढतच आहेत. उद्योगासाठी देण्यात येणाऱ्या जागांवर घरे, मंदिरे, हॉटेल अशी बांधकामे करण्यात आली. अनेक ठिकाणच्या जागा भाड्याने देण्यात आल्या आहेत. वर्षानुवर्षे एमआयडीसीचे अधिकारी फिरकत नसल्याने अतिक्रमणांमध्ये वाढ होत आहे. अधिकाऱ्यांनीच काही राजकीय पुढाऱ्यांशी हातमिळवणी केल्याने सरकारचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.