शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अभिजात संगीत जगण्याला देते बळ - राजेश ढाबरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 02:41 IST

संगीत माणसाला ताजेतवाने ठेवते. बालपणापासूनच संगीताची आवड असल्यामुळे तथागत बुद्धांच्या जीवनावरील गाण्यांची हिंदी भाषेत निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. पहिलाच अल्बम जनतेने डोक्यावर घेतल्याने नवनिर्मितीला बळ मिळाले. मोठमोठ्या गायकांनी गाणी गायली. आईच्या प्रेरणेमुळेच हे शक्य झाले.

संगीत माणसाला ताजेतवाने ठेवते. बालपणापासूनच संगीताची आवड असल्यामुळे तथागत बुद्धांच्या जीवनावरील गाण्यांचीहिंदी भाषेत निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. पहिलाच अल्बम जनतेने डोक्यावर घेतल्याने नवनिर्मितीला बळ मिळाले. मोठमोठ्या गायकांनी गाणी गायली. आईच्या प्रेरणेमुळेच हे शक्य झाले. संगीत जगण्याला बळ देते. एक तरी कला प्रत्येकाने जपली पाहिजे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक राजेश ढाबरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.आई रेडिओ ऐकायची तेव्हा आईमुळे माझ्याही कानांवर संगीताचे सूर पडायचे; पण तेव्हा त्याचा अर्थबोध व्हायचा नाही. तरीही सूर निरागस असल्यामुळे ते अलगदपणे माझ्यावर परिणाम करून गेले. आईच्या प्रेरणेमुळेच मी गायक-संगीतकार झालो, असे सांगत प्रशासकीय अधिकारी राजेश ढाबरे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना आयुष्यातील जीवनगाणी कशा पाऊलवाटा बनल्या तो प्रवास उलगडला. बाल्यावस्थेत असतानाच चित्रपट पाहण्याची आवड जडली. वाटेल ते करून चित्रपट पाहायचो. केवळ चित्रपटातील गाणी दृश्य स्वरूपात बघावीत, म्हणून हा खटाटोप असायचा. आम्ही जिथे राहत होतो, तिथे कोष्टी समूह बांधवांचे भजनांचे कार्यक्रम ऐकायला जात होतो. तिथे कधी-कधी गाण्याची संधी मिळायची. भजन गायला लागलो. १९७५-७६चा काळ असेल, तेव्हा भजनांची गोडी लागली. सूर तिथेच गवसला. त्या वेळी जोडले गेलेले बंध आजही मैत्रीच्या स्वरूपात घट्ट आहेत.पं. बच्छराज व्यास विद्यालयात शिकत असताना माझी आवड ‘पॅशन’ बनू लागले. त्याचे कारण म्हणजे शाळेतील सर्व उपक्रमांमधील माझा पुढाकार आणि अभ्यासातील गतीमुळे शिक्षक माझ्यावर विशेष लक्ष द्यायचे. शाळेतच गायक-कलाकार अशी ओळख निर्माण झाली. विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस कधीच सोडले नाही. बक्षिसांतून प्रेरणा मिळत गेली. घरातील वातावरण शैक्षणिक, सांस्कृतिकही आहे. वर्गात पहिला असायचो. नागपूरला शिवाजी सायन्स कॉलेजमध्ये अकरावीला असताना सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अग्रस्थानी असायचो. ‘कोई नजराणा लेकर आया मै तेरा दिवाना...’ असे गीत तेव्हा सादर केले. कलेतून एक आत्मिक समाधान मिळते. माणूस फ्रेश राहतो. इंजिनिअरिंगला असताना रॅगिंग मोठ्या प्रमाणात चालायचे; पण आमचे सिनिअर गाणे म्हणायला सांगून मला सोडून द्यायचे. परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणून इथेच ओळख मिळाली. सोलो प्रोग्राम सुरू केले होते. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. त्यात यश मिळाल्यावर पहिली पोस्टिंग हैदराबादला होती. असिस्टंट कमिशनर म्हणून तिथे काम करीत असतानाही नाटक, पथनाट्य, संगीत यांत सहभाग असायचा. नाटकाला संगीत देणे, प्रत्यक्ष त्यात अभिनय करणे असे छोटे-मोठे प्रयोग सुरूच होते. आजही गाणे नेहमी माझ्यासोबत राहिले आहे. तथागत गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान जगापर्यंत पोहोचावे, यासाठी त्यांचा विचार गाण्यांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आणि पहिलाच अल्बम जगप्रसिद्ध झाला. लिरिक्स आणि म्युझिक दोन्ही एकाच वेळी करण्याचा एक यशस्वी प्रयोग मी केला. पत्नी भावना संगीत विशारद आहे. त्यामुळे माझा शास्त्रीयदृष्ट्या संगीताचा अभ्यास नसला, तरी ती ते सगळे जुळवून आणत होती. पहिल्या अल्बममध्ये ८ गीते, तर दुसºया अल्बममध्ये १० गीते आहेत. मेरिट आणि क्वॉलिटीबरोबरच बॉलिवूड टच असल्यानेच लता मंगेशकर यांनी ‘बुद्धं सरणं गच्छामि...’ हे गीत माझ्या अल्बममध्ये गायिले आहे. त्यांच्याबरोबरच सोनू निगम, शंकर महादेवन, सुरेश वाडकर, श्रेया घोषाल, अनुज अलोरा, आशा भोसले यांनी मी लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली गाणी गायली आहेत.

टॅग्स :Puneपुणे