शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

अकरावी प्रवेश : प्राधान्य फेरी २५ आॅगस्टपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 02:03 IST

अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरी संपल्यानंतर आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर येत्या २५ आॅगस्टपासून पुढची प्रवेश फेरी सुरू होणार आहे.

पुणे : अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरी संपल्यानंतर आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर येत्या २५ आॅगस्टपासून पुढची प्रवेश फेरी सुरू होणार आहे. त्यासाठी ३ प्रवर्ग तयार करण्यात आले आहेत. पहिला प्रवर्ग ८० ते १०० टक्के, दुसरा प्रवर्ग ६० ते ८० टक्के व तिसरा प्रवर्ग ३५ ते ६० टक्के यानुसार प्रवेश दिले जाणार आहेत. या फेरीमध्ये प्रवेश घेऊन रदद् करणारे, प्रथम प्राधान्याचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेणारे, प्रवेश न मिळालेले अशा सर्व विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे.अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय पध्दतीने सुरू असलेल्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी ७५ हजार ९३९ अर्ज आले होते. त्यापैकी ७ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी अद्यापही प्रवेशापासून वंचित आहेत. येत्या २५ आॅगस्टपासून प्रथम येणाºया प्रथम प्राधान्य ही फेरी राबविली जाणार आहे.विशेष फेरीमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी बुधवार पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर सर्व महाविद्यालयांमधील रिक्त असलेल्या जागांचा तपशील २५ आॅगस्ट रोजी संकेतस्थळावर जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर २७ आॅगस्ट रोजी ८० ते १०० टक्के दरम्यान गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध असेल. यामध्ये रिक्त जागेवर सर्वात पहिल्यांदा क्लिक करणाºया विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित होत जातील. यानुसार प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी २७ ते २८ आॅगस्ट दरम्यान प्रवेश घ्यायचे आहेत. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांची यादी २८ आॅगस्ट रोजी जाहीर होईल. त्यानंतर दुसºया प्रवर्गातील ६० ते ८० टक्क्यांदरम्यान गुण असलेल्या विद्यार्थ्यांना २९ ते ३० आॅगस्ट दरम्यान प्रवेश घेण्यासाठी संधी असेल.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी