शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आगामी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा महापालिका कामकाजावर परिणाम  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 12:08 IST

सर्वसाधारण सभा आणि स्थायी समिती सभेला केवळ सहा अधिकारी आणि प्रमुख नगरसेवकांची हजेरी होती. यावेळी सत्तर टक्के नगरसेवक अनुपस्थित होते.

ठळक मुद्देमनोहर पर्रिकर, नगरसेविका सुलक्षणा धर यांच्या मुलाला सभेत श्रद्धांजली

पिंपरी : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कामकाजावर परिणाम पडला आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी नियुक्त केले आहे. याचा परिणाम सर्वसाधारण सभा आणि स्थायी समिती सभेत जाणवला. सर्वसाधारण सभेला केवळ सहा अधिकारी आणि प्रमुख नगरसेवकांची हजेरी होती. सत्तर टक्के नगरसेवक यावेळी अनुपस्थित होते. काहीनगरसेवकांनी केवळ हजेरी लावून पळ काढण्यात धन्यता मानली. महापालिका सभा पुढील महिन्यांच्या २० एप्रिलपर्यंत तहकूब केली आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेची मार्च महिन्याची सभा होती. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. गोव्याचे मुख्यमंत्री व माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा धर यांच्या मुलाला सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी महापौर राहुल जाधव म्हणाले, सर्वसामान्य कार्यकर्ता अशी शेवटपर्यंत मनोहर पर्रिकर यांची ओळख होती. मुख्यमंत्री, देशाचा संरक्षणमंत्री अशी मोठी पदे भुषविली. तरीही त्यांच्यातील कार्यकर्ता जिवंत होता. साध्या मानसांमध्ये मिसळण्याचा त्यांचा गुण कौतुकास्पद होता. साधी राहणी उच्च विचारसरणी याप्रमाणे ते राहिले. त्यांच्या जाण्याचे देशाचे मोठे नुकसान झाले आहे. कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व हरपले आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरातील रेडझोन, बोपखेल पुलासह संरक्षण विभागासंदर्भातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पर्रिकर यांनी प्रयत्न केले. राजकीय वलय असले तरी मनोहर पर्रिकर शेवटपर्यंत सामान्य कार्यकर्ता जगले. संरक्षणमंत्री असताना त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील पश्नांबाबत आग्रही भूमिका घेतली होती. पर्रिकर यांच्या जाण्याने चांगल्या राजकीय कार्यकर्त्यांची हानी झाली आहे. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, सामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री असे उत्तृंग यश मनोहर पर्रिकर यांनी मिळविले. मुख्यमंत्री असतानाही त्यांचे पाय जमिनीवर होते. प्रश्नांची जाणीव असणारा हा नेता होता. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपले साधेपणा सोडला नाही. कार्यकर्त्यांत मिळून मिसळून राहायला त्यांना आवडत असे. त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीकोन होता. अमेठीतील निवडणूकीत त्यांच्याबरोबर राहण्याचा प्रसंग आला. त्यांच्यातील साधेपणा हाच मला खूप भावला होता. कोणताही अभिनिवेष त्यांच्या ठायी दिसून आला नाही. माणुसपण जपणारा नेता होता. त्यांच्या जाण्याचे भाजपची हानी झाली आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड