शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

पाण्याचे आॅडिट करा

By admin | Updated: April 16, 2017 04:03 IST

पिंपरी-चिंचवड शहराला दररोज होणारा पाणीपुरवठा आणि प्रत्यक्षातील मागणीत मोठ्या प्रमाणात तफावत आहे. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला दररोज होणारा पाणीपुरवठा आणि प्रत्यक्षातील मागणीत मोठ्या प्रमाणात तफावत आहे. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निगडी सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्राला शुक्रवारी भेट दिली. त्यांनी योजनांच्या सद्य:स्थितीची माहिती घेतली. पाणीबचत ही काळाची गरज असून, महापालिकेने स्वत:पासून सुरुवात करावी, मुख्यालय, वायसीएम रुग्णालय, काही सोसायट्यांचे वॉटर आॅडिट करावे. त्याच्या आधारे पाणी बचतीच्या उपाययोजनेच्या शिफारसी स्थायी समितीला सादर कराव्यात, असे आदेशही दिले. स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांच्यासोबत पाणीपुरवठा विभागाचे अभियंता रामदास तांबे, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, प्रमोद ओंबासे उपस्थित होते. पाण्याचे पर्यायी स्त्रोत उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत नागरिकांनीच स्वत:हून पाण्याची बचत करण्याची आवश्यकता असल्याचे अधिकाऱ्यानी सांगितले. त्यानंतर अध्यक्षा सावळे म्हणाल्या, ‘‘नागरिकांना पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी आधी महापालिकेने स्वत: पासून सुरुवात करण्याची गरज आहे. शहरातील पालिकेच्या आणि शासकीय इमारतींना करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याचा हिशेब ठेवला जात नाही. त्यामुळे अशा इमारतींना पाण्याचा किती पुरवठा होतो, हे समजणे आवश्यक आहे. त्यासाठी पालिका मुख्यालय आणि वायसीएम रुग्णालय आणि काही मोजक्या सोसायट्यांचे वॉटर आॅडिट करावे. या वॉटर आॅडिटमधून महापालिका मुख्यालय, वायसीएम रुग्णालय आणि संबंधित सोसायट्यांना पाण्याचा किती पुरवठा होतो आणि प्रत्यक्षात आवश्यकता किती आहे, याची माहिती समोर येईल. पाणीबचत आणि काटकसर करण्यासाठी काय उपाययोजना राबविता येतील, याच्या शिफारसी तयार कराव्यात.’’ मावळ तालुक्यामध्ये काही गावामध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे मावळवासीयांची अवस्था धरणे उशाला आणि कोरड घशाला, अशी झाली आहे. शहर परिसरामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत आहे. तसेच वॉशिंग सेंटर, वॉटर पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. तसेच बांधकामासाठीही मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जात आहे. ते बंद करावे, अशी मागणी होत आहे.(प्रतिनिधी)पाणीटंचाई : पर्यायी स्रोत उपलब्ध नाहीशहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्यमुळे दिवसेंदिवस पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहेत. उन्हाळ्यात काही भागाला पाणीपुरवठा होतो, तर काही भागाला होत नाही, अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थिती पाण्याचे पर्यायी स्त्रोत उपलब्ध होत नाहीत. शहरासाठी पवना धरणातून दररोज किती पाणी उचलावे, ते निश्चित झाले आहे; परंतु निश्चित झालेल्या पाण्यापेक्षा दररोज १०० दशलक्ष घनमीटर पाणी जास्त उचलतो. त्यासाठी महापालिका महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दंडही भरते. एवढे करूनही शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत दररोज दिले जाणारे पाणी अपुरेच आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला कायद्याने ठरलेले दरडोई पाणी देणे महापालिकेला शक्य होत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.