शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

नोटबंदीच्या चुकीच्या निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था ढासळली : रत्नाकर महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 14:28 IST

नोटबंदीच्या निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था ढासळली, सामान्य नागरिकांचे जीवन त्रस्त केले आहे, त्यामुळे काँग्रेसतर्फे ८ नोव्हेंबर हा काळा दिन पाळला जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी दिली.

ठळक मुद्देयूपीए सरकारच्या काळात सर्वात अधिक काळा पैसा बाहेर : रत्नाकर महाजनकाँग्रेसच्या जनआक्रोश मोर्चाचा समारोप बुधवारी होणार सांगलीत

पिंपरी : आपल्याच मंत्री मंडळाला खोलीत कोंडून नोटबंदीचा निर्णय गत वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. या निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था ढासळली, सामान्य नागरिकांचे जीवन त्रस्त केले आहे, त्यामुळे काँग्रेसतर्फे ८ नोव्हेंबर हा काळा दिन पाळला जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत दिली.देशातील काळा पैसा बाहेर काढणार, कॅशलेस व्यवहारामुळे पारदर्शकता येईल, असे भाजपाने भासवले. कॅशलेससाठी नोटाबंदी केली. १००० रुपयांच्या नोटा रद्द करून २००० च्या नोटा कशासाठी काढल्या, याचे उत्तर या सरकारने दिलेले नाही. यूपीए सरकारच्या काळात सर्वात अधिक काळा पैसा बाहेर काढला होता.नोटबंदीनंतर २ लाख कंपन्यांना टाळे लावले आहे, असे भाजपाने सांगितले. सरकारच्या वेबसाईटवर मात्र कंपन्यांची यादी टाकू शकले नाही, याचाच अर्थ त्यांची आकडेवारी फसवी आहे, शेतकर्‍यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले, प्रत्यक्ष शेतकर्‍यांना त्याचा किती लाभ मिळाला, हे देशातील जनतेने पाहिले. शेतकरी, सामान्य जनता, उद्योजक, व्यापारी सर्वच या सरकारच्या कारभाराने त्रस्त आहेत. त्यामुळे काँग्रेसने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. बुधवारी सांगलीत या आंदोलनाचा समारोप होणार आहे.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसagitationआंदोलनBJPभाजपा