शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

नोटबंदीच्या चुकीच्या निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था ढासळली : रत्नाकर महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 14:28 IST

नोटबंदीच्या निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था ढासळली, सामान्य नागरिकांचे जीवन त्रस्त केले आहे, त्यामुळे काँग्रेसतर्फे ८ नोव्हेंबर हा काळा दिन पाळला जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी दिली.

ठळक मुद्देयूपीए सरकारच्या काळात सर्वात अधिक काळा पैसा बाहेर : रत्नाकर महाजनकाँग्रेसच्या जनआक्रोश मोर्चाचा समारोप बुधवारी होणार सांगलीत

पिंपरी : आपल्याच मंत्री मंडळाला खोलीत कोंडून नोटबंदीचा निर्णय गत वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. या निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था ढासळली, सामान्य नागरिकांचे जीवन त्रस्त केले आहे, त्यामुळे काँग्रेसतर्फे ८ नोव्हेंबर हा काळा दिन पाळला जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत दिली.देशातील काळा पैसा बाहेर काढणार, कॅशलेस व्यवहारामुळे पारदर्शकता येईल, असे भाजपाने भासवले. कॅशलेससाठी नोटाबंदी केली. १००० रुपयांच्या नोटा रद्द करून २००० च्या नोटा कशासाठी काढल्या, याचे उत्तर या सरकारने दिलेले नाही. यूपीए सरकारच्या काळात सर्वात अधिक काळा पैसा बाहेर काढला होता.नोटबंदीनंतर २ लाख कंपन्यांना टाळे लावले आहे, असे भाजपाने सांगितले. सरकारच्या वेबसाईटवर मात्र कंपन्यांची यादी टाकू शकले नाही, याचाच अर्थ त्यांची आकडेवारी फसवी आहे, शेतकर्‍यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले, प्रत्यक्ष शेतकर्‍यांना त्याचा किती लाभ मिळाला, हे देशातील जनतेने पाहिले. शेतकरी, सामान्य जनता, उद्योजक, व्यापारी सर्वच या सरकारच्या कारभाराने त्रस्त आहेत. त्यामुळे काँग्रेसने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. बुधवारी सांगलीत या आंदोलनाचा समारोप होणार आहे.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसagitationआंदोलनBJPभाजपा