शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

जलवाहिनीच्या कामासाठी चांगल्या रस्त्याची केली खोदाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:49 IST

लोणावळा नगरपरिषदेचा कारभार : पैशाचा अपव्यय होत असल्याची नगरसेविकेची तक्रार

लोणावळा : जुना खंडाळ्यातील अंध वृद्धाश्रम परिसरात लाखो रुपये खर्च करून लोणावळा नगर परिषदेने जेमतेम महिनाभरापूर्वी बनविलेला डांबरी रस्ता जलवाहिनी व वीजवाहिनीच्या कामासाठी दुतर्फा खोदाई करून खराब करण्यात आल्याने नगर परिषदेच्या लाखो रुपयांचा येथे चुराडा झाला असल्याचा आरोप या प्रभागातील नगरसेविका अंजना कडू यांनी केला आहे.

कडू म्हणाल्या, ‘‘कामाचे कसलेही नियोजन न करता लोणावळा नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी जुना खंडाळा भागात पहिले रस्ते बनविले. आता जलवाहिनी व वीजवाहिनी टाकण्याकरिता पुन्हा हेच रस्ते दोन्ही बाजूंनी खोदाई काम चालू केले आहे. मागील आठवड्यातच या रस्त्यावर सफेद रंगाचे पट्टे मारण्यात आले होते. ३० लाख रुपये खर्च करून बनवलेला हा रस्ता नागरिकांकरता औटघटकेचा ठरला आहे. या भागात जलवाहिनी व वीजवाहिनी टाकण्याकरिता खोदाईकाम करायचेच होते, तर मग नवीन रस्ता बनविण्याची घाई का केली? कामाचे नियोजन करून प्रथम जलवाहिनी व वीजवाहिनीसाठी खोदकाम झाल्यानंतर हे रस्ते डांबरीकरण केले असते तर नागरिकांच्या लाखो रुपयांचा चुराडा झाला नसता. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जनतेच्या कररूपाने जमा झालेल्या पैशाच्या नुकसानीला जबाबदार असणाºयांवर कायदेशीर कारवाई करून तो खर्च त्यांच्याकडून वसुल करण्यात यावा अशी मागणी कडू यांनी केली आहे. अंजना कडू म्हणाल्या,‘‘ या रस्त्यासोबतच अपोलो गॅरेज रेल्वे गेट ते साधना कुटिर दरम्यान दोन कोटी रुपये खर्च करून मागील वर्षी रस्ता बनविण्यात आला. त्यावर नुकतेच विजेचे दिवे लावण्यात आले. आता त्याच ठिकाणाहून सदरची जलवाहिनी टाकली जाणार असल्याने त्या रस्त्याची वाट लागणार आहे. वर्षभरापासून लोणावळा शहरात अमृत योजनेमधून नवीन पाणी योजनेचे काम सुरु आहे. ज्या रस्त्याच्या बाजूने ही जलवाहिनी जाणार आहे. ते रस्ते जलवाहिनी टाकल्यानंतर बनविले असते, तर जनतेच्या पैशाची नासाडी झाली नसती. श् नुकसानीला जबाबदार असणाºयांवर कारवाई करत त्यांच्याकडून सदर रक्कम वसूल करावी, अशी मागणी पुणे जिल्हाधिकारी व महाराष्ट्र शासनाकडे करणार असल्याचे नगरसेविका कडू व बाळासाहेब कडू यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड