शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

ठेकेदारामुळे नागरिकांच्या घशाला कोरड

By admin | Updated: April 19, 2016 01:00 IST

पिंपरी-चिंचवड शहरात अगोदरच १५ टक्के कपात आहे. त्यातच दोन दिवसांपासून शहराच्या अनेक भागात पाणीच आले नसल्याने आणखीणच ओरड वाढली

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात अगोदरच १५ टक्के कपात आहे. त्यातच दोन दिवसांपासून शहराच्या अनेक भागात पाणीच आले नसल्याने आणखीणच ओरड वाढली. देहूरोड-कात्रज मार्गावरील नदीवर पूल बांधणाऱ्या ठेकेदाराने कोणाचीही परवानगी न घेता नदीत बांध टाकला. यामुळे पाणी अडल्याने रावेतमधील जलउपसा केंद्रापर्यंत पाणी पोहोचू शकले नाही. विशेष म्हणजे या बांधाबाबत पाटबंधारे विभागाला माहिती नव्हती, की महापालिकेला कल्पना नव्हती. त्यामुळे अगोदरच पाणीटंचाईचा सामना करावा लागणाऱ्या शहरवासीयांना गेले दोन दिवस पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली. पिंपरी-चिंचवड शहराला पवना नदीतून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी रावेत येथे बंधारा उभारण्यात आला आहे. या बंधाऱ्याजवळ महापालिकेने जलउपसा केंद्र उभारले आहे. बंधाऱ्यातून पाण्याचा उपसा केल्यानंतर निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर शहराच्या विविध भागात जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. (प्रतिनिधी)४शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात सध्या केवळ तीस टक्के पाणीसाठा आहे. यामुळे शहरात पंधरा टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. दिवसातून एक वेळ पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन करताना शहरवासीयांना कसरत करावी लागत आहे. अशातच शनिवार, रविवार आणि सोमवारी सकाळी एकवेळदेखील पाणीपुरवठा झाला नाही. संपूर्ण शहरात पाण्याबाबत ओरड सुरू झाली. नागरिक नगरसेवकांकडे विचारणा करीत होते. तर नगरसेवक अधिकाऱ्यांकडे विचारणा करीत होते. आमच्या भागात पाणी आले नाही, अशी तक्रार नगरसेवक अधिकाऱ्यांकडे करीत होते. ४याबाबत सोमवारी रावेत येथील जलउपसा केंद्र येथे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. पाणीटंचाई कशामुळे निर्माण झाली, यावर चर्चा करण्यात आली. जलउपसा केंद्रापर्यंत पाणी पोहोचत नसल्याने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात आली. त्यांच्याकडून नेहमीप्रमाणे पवना धरणातून पाणी सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर धरणातून पाणी सोडले असतानाही जलउपसा केंद्रापर्यंत पोहोचले नसल्याचे समोर आले. धरणातून सोडलेले पाणी बंधाऱ्यापर्यंत का येत नाही, याचा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध सुरू केला. रावेत येथील बंधाऱ्यापासून वरील बाजूस पाहणी केली. त्यामध्ये पुनावळेजवळील पुलाजवळ मातीचा बांध घातल्याचे निदर्शनास आले. पुलाच्या कामासाठी पुनावळेजवळील नदीपात्रात बांध घालून पाणी अडविण्याबाबतची कसलीही कल्पना महापालिका तसेच पाटबंधारे विभागाला देण्यात आली नव्हती. या बांधामुळे जलउपसा केंद्रापर्यंत पुरेसे पाणी पोहोचत नव्हते. त्यामुळे पाण्याचा उपसा कमी प्रमाणात होत होता. त्याचा परिणाम शहरातील पाणी वितरणावर झाला. आता हा बांध हटविण्यात आला असून, मंगळवार सकाळपासून सुरळीत पाणीपुरवठा होईल. - प्रवीण लडकत, कार्यकारी अभियंता, पिं.चिं. मनपा