शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदारामुळे नागरिकांच्या घशाला कोरड

By admin | Updated: April 19, 2016 01:00 IST

पिंपरी-चिंचवड शहरात अगोदरच १५ टक्के कपात आहे. त्यातच दोन दिवसांपासून शहराच्या अनेक भागात पाणीच आले नसल्याने आणखीणच ओरड वाढली

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात अगोदरच १५ टक्के कपात आहे. त्यातच दोन दिवसांपासून शहराच्या अनेक भागात पाणीच आले नसल्याने आणखीणच ओरड वाढली. देहूरोड-कात्रज मार्गावरील नदीवर पूल बांधणाऱ्या ठेकेदाराने कोणाचीही परवानगी न घेता नदीत बांध टाकला. यामुळे पाणी अडल्याने रावेतमधील जलउपसा केंद्रापर्यंत पाणी पोहोचू शकले नाही. विशेष म्हणजे या बांधाबाबत पाटबंधारे विभागाला माहिती नव्हती, की महापालिकेला कल्पना नव्हती. त्यामुळे अगोदरच पाणीटंचाईचा सामना करावा लागणाऱ्या शहरवासीयांना गेले दोन दिवस पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली. पिंपरी-चिंचवड शहराला पवना नदीतून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी रावेत येथे बंधारा उभारण्यात आला आहे. या बंधाऱ्याजवळ महापालिकेने जलउपसा केंद्र उभारले आहे. बंधाऱ्यातून पाण्याचा उपसा केल्यानंतर निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर शहराच्या विविध भागात जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. (प्रतिनिधी)४शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात सध्या केवळ तीस टक्के पाणीसाठा आहे. यामुळे शहरात पंधरा टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. दिवसातून एक वेळ पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन करताना शहरवासीयांना कसरत करावी लागत आहे. अशातच शनिवार, रविवार आणि सोमवारी सकाळी एकवेळदेखील पाणीपुरवठा झाला नाही. संपूर्ण शहरात पाण्याबाबत ओरड सुरू झाली. नागरिक नगरसेवकांकडे विचारणा करीत होते. तर नगरसेवक अधिकाऱ्यांकडे विचारणा करीत होते. आमच्या भागात पाणी आले नाही, अशी तक्रार नगरसेवक अधिकाऱ्यांकडे करीत होते. ४याबाबत सोमवारी रावेत येथील जलउपसा केंद्र येथे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. पाणीटंचाई कशामुळे निर्माण झाली, यावर चर्चा करण्यात आली. जलउपसा केंद्रापर्यंत पाणी पोहोचत नसल्याने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात आली. त्यांच्याकडून नेहमीप्रमाणे पवना धरणातून पाणी सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर धरणातून पाणी सोडले असतानाही जलउपसा केंद्रापर्यंत पोहोचले नसल्याचे समोर आले. धरणातून सोडलेले पाणी बंधाऱ्यापर्यंत का येत नाही, याचा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध सुरू केला. रावेत येथील बंधाऱ्यापासून वरील बाजूस पाहणी केली. त्यामध्ये पुनावळेजवळील पुलाजवळ मातीचा बांध घातल्याचे निदर्शनास आले. पुलाच्या कामासाठी पुनावळेजवळील नदीपात्रात बांध घालून पाणी अडविण्याबाबतची कसलीही कल्पना महापालिका तसेच पाटबंधारे विभागाला देण्यात आली नव्हती. या बांधामुळे जलउपसा केंद्रापर्यंत पुरेसे पाणी पोहोचत नव्हते. त्यामुळे पाण्याचा उपसा कमी प्रमाणात होत होता. त्याचा परिणाम शहरातील पाणी वितरणावर झाला. आता हा बांध हटविण्यात आला असून, मंगळवार सकाळपासून सुरळीत पाणीपुरवठा होईल. - प्रवीण लडकत, कार्यकारी अभियंता, पिं.चिं. मनपा