शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भाजपाला देशात हुकूमशाही वातावरण आणायचे का? आदित्य ठाकरे यांचा सवाल

By विश्वास मोरे | Updated: February 26, 2024 00:11 IST

ताथवडे येथे पत्रकारांशी बोलताना उपस्थित केले विविध प्रश्न

विश्वास मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: जालन्यातील लाठीचार्जचे आदेश कोणी दिले, गृहमंत्र्यांनी कि मुख्यमंत्र्यानी हे तपासायला हवे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे होते मग, लाठीचार्ज कशासाठी केला. आता दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरु आहे. शेतकरी सीमेवर आहेत. तर, मनोज जरांगे मुबंईला निघालेत. जे लोक आंदोलन करतात त्यांचे ऐकून तर घ्यायला हवे. भाजपाला देशात हुकूमशाही वातावरण आणण्याचे का? असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ताथवडे येथे पत्रकारांशी बोलताना केला.

 आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी शहरप्रमुख सचिन भोसले, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख तथा आमदार सचिन आहेर, संघटक संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, ज्येष्ठ नेते एकनाथ पवार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे उपस्थित होते. ...  महाराष्ट्राला मागे नेवून मिळवायचे काय? भाजपावर टीका करताना ठाकरे म्हणाले, 'भाजपने जाती- जातीत आणि धर्मा-धर्मात विष पेरण्याचे काम सुरु ठेवले आहे. जाती-जातीत राजकारण केले जात आहे. राजकारणाचा चोथा केला आहे. सर्वाना बरोबर घेऊन जाण्याची गरज आहे. वातावरण दूषित केले जात आहे. मात्र, ते होणार नाही. देशापुढे महागाई, बेरोजगारी असे अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्राला मागे नेवून मिळवायचे काय आहे.' ... चौकशी झाली पाहिजे मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले आहेत, यावर आपले मत काय? यावर ठाकरे म्हणाले, 'मला देखील तुमच्या माध्यमातून कळाले. मी जास्त बोलणार नाही थोड स्पष्ट होऊ द्या. जालन्यातील लाठीचार्जचे आदेश कोणी दिले ? याची चौकशी झाली पाहिजे.' नितेश राणे राणे यांच्या टीकेवर विचारले असता ठाकरे म्हणाले, 'अश्या लोकांवर मी बोलत नाही, अन्यथा माझी लेव्हल खाली जाईल.' ... उमेदवार हे केवळ उद्धव ठाकरे ठरवतीलमावळची उमेदवारी ठरली आहे का? यावर ठाकरे म्हणाले, 'वाघेरे यांनी चांगले नियोजन केले. मावळ लोकसभा उमेदवार कोण असेल, हे केवळ उद्धव ठाकरे ठरवतील.''  ..... मकाऊचा वेगळा अर्थ काढू नकाछोटे पक्ष संपवा, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. त्यावर आपण त्यांचा आणि चायनाचा संबंध आहे, अशी टीका केली?  या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, त्यांचा आणि चायनाच्या जवळचा सबंध आहे. पण, तुम्ही गैरसमज करू नका, मी मकाऊबद्दल बोलत नाही. चायनामध्ये जशी लोकशाही आहे, तशी त्यांना भारतात आणायची आहे. म्हणजे लोकशाही संपवून टाकायची आहे. बाकी तुम्ही मकाऊचा वेगळा अर्थ काढू नका.'

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेBJPभाजपा