शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

भाजपाला देशात हुकूमशाही वातावरण आणायचे का? आदित्य ठाकरे यांचा सवाल

By विश्वास मोरे | Updated: February 26, 2024 00:11 IST

ताथवडे येथे पत्रकारांशी बोलताना उपस्थित केले विविध प्रश्न

विश्वास मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: जालन्यातील लाठीचार्जचे आदेश कोणी दिले, गृहमंत्र्यांनी कि मुख्यमंत्र्यानी हे तपासायला हवे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे होते मग, लाठीचार्ज कशासाठी केला. आता दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरु आहे. शेतकरी सीमेवर आहेत. तर, मनोज जरांगे मुबंईला निघालेत. जे लोक आंदोलन करतात त्यांचे ऐकून तर घ्यायला हवे. भाजपाला देशात हुकूमशाही वातावरण आणण्याचे का? असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ताथवडे येथे पत्रकारांशी बोलताना केला.

 आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी शहरप्रमुख सचिन भोसले, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख तथा आमदार सचिन आहेर, संघटक संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, ज्येष्ठ नेते एकनाथ पवार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे उपस्थित होते. ...  महाराष्ट्राला मागे नेवून मिळवायचे काय? भाजपावर टीका करताना ठाकरे म्हणाले, 'भाजपने जाती- जातीत आणि धर्मा-धर्मात विष पेरण्याचे काम सुरु ठेवले आहे. जाती-जातीत राजकारण केले जात आहे. राजकारणाचा चोथा केला आहे. सर्वाना बरोबर घेऊन जाण्याची गरज आहे. वातावरण दूषित केले जात आहे. मात्र, ते होणार नाही. देशापुढे महागाई, बेरोजगारी असे अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्राला मागे नेवून मिळवायचे काय आहे.' ... चौकशी झाली पाहिजे मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले आहेत, यावर आपले मत काय? यावर ठाकरे म्हणाले, 'मला देखील तुमच्या माध्यमातून कळाले. मी जास्त बोलणार नाही थोड स्पष्ट होऊ द्या. जालन्यातील लाठीचार्जचे आदेश कोणी दिले ? याची चौकशी झाली पाहिजे.' नितेश राणे राणे यांच्या टीकेवर विचारले असता ठाकरे म्हणाले, 'अश्या लोकांवर मी बोलत नाही, अन्यथा माझी लेव्हल खाली जाईल.' ... उमेदवार हे केवळ उद्धव ठाकरे ठरवतीलमावळची उमेदवारी ठरली आहे का? यावर ठाकरे म्हणाले, 'वाघेरे यांनी चांगले नियोजन केले. मावळ लोकसभा उमेदवार कोण असेल, हे केवळ उद्धव ठाकरे ठरवतील.''  ..... मकाऊचा वेगळा अर्थ काढू नकाछोटे पक्ष संपवा, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. त्यावर आपण त्यांचा आणि चायनाचा संबंध आहे, अशी टीका केली?  या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, त्यांचा आणि चायनाच्या जवळचा सबंध आहे. पण, तुम्ही गैरसमज करू नका, मी मकाऊबद्दल बोलत नाही. चायनामध्ये जशी लोकशाही आहे, तशी त्यांना भारतात आणायची आहे. म्हणजे लोकशाही संपवून टाकायची आहे. बाकी तुम्ही मकाऊचा वेगळा अर्थ काढू नका.'

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेBJPभाजपा