शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

निवडणुकीमधून होतेय समाजाचे विघटन, माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 03:01 IST

कर्नाटकच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून तेथील सरकारने लिंगायत धर्माचा दर्जा दिला. देशात २०१९ पर्यंत अनेक धर्म निर्माण झाल्याचे पाहायला मिळतील. हे प्रकार चांगले नाही; पण अशा प्रकारांमधून देशात किती वाईट प्रकार सुरू आहेत ते तरी कळत आहे. निवडणुकांमधून समाजाचे अधिकाधिक विघटन करण्याचे काम होत आहे, अशी टीका माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी सोमवारी केली.

पुणे : कर्नाटकच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून तेथील सरकारने लिंगायत धर्माचा दर्जा दिला. देशात २०१९ पर्यंत अनेक धर्म निर्माण झाल्याचे पाहायला मिळतील. हे प्रकार चांगले नाही; पण अशा प्रकारांमधून देशात किती वाईट प्रकार सुरू आहेत ते तरी कळत आहे. निवडणुकांमधून समाजाचे अधिकाधिक विघटन करण्याचे काम होत आहे, अशी टीका माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी सोमवारी केली. वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘धर्मनिरपेक्षता- राज्यघटना आणि वास्तव’ या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते.आपल्या निवडणुकांमुळे समाजामध्ये अधिकाधिक विघटन करण्याचे काम होत आहे. अनेक तरुण मुला-मुलींना आपल्या मित्राची जात माहीत नसते. मात्र, निवडणुकांच्या काळामध्ये उमेदवारांच्या जातीचीच सर्वाधिक चर्चा होते. वृत्तपत्रे आणि वाहिन्यांवरील चर्चात्मक कार्यक्रमांमध्येही उमेदवाराच्या जातीसंदर्भात चर्चा होतात त्या होऊ नयेत, अशा स्वरूपाचा कायदा करण्याची वेळ आली आहे. देशातील अनेक आमदार आणि खासदार जेमतेम १० टक्के ते ३० टक्के मतदान घेऊन निवडून आले आहेत. जनतेतून निवडून दिल्या जाणाऱ्या लोकप्रतिनिधीला किमान ५० टक्के अधिक एक मत मिळालेच पाहिजे, या स्वरूपाचा कायदा केला जावा. मात्र, असा कायदा करण्याची राजकीय इच्छाशक्ती आहे की नाही हे महत्त्वाचे आहे.गोडबोले म्हणाले की, धर्मनिरपेक्ष देशामध्ये धर्मनिरपेक्षतेची व्याख्याच नाही. हीच व्याख्या करणे राजकीय पक्षांना अडचणीचे ठरणारे आहे. धर्मनिरपेक्षता कोलमडत असेल, तर त्याविरुद्ध न्यायव्यवस्थेकडे दाद मागणे अवघड आहे. ही गोष्ट सामान्यांच्या आवाक्याबाहेरची आहे. त्यामुळे राज्य घटनेच्या तरतुदीनुसार धर्मनिरपेक्षता आयोग स्थापन केला गेला पाहिजे, अशी मागणी मी गेले काही वर्षे सातत्याने करीत आहे. शासन आणि संबंधित संस्थांचे निर्णय या आयोगाकडे पाठवून त्याचे परीक्षण झाले पाहिजे. हे होऊ शकले तर अनेक गोष्टी आपोआप बंद होतील.तिहेरी तलाकची मागणी समाजातून व्हावी‘तिहेरी तलाक’ विषयी बोलताना ते पुढे म्हणाले, हा प्रश्न मुस्लिम समाजातील अन्याय झालेल्या महिलांनी दाद मागितल्यामुळे सर्वोच्च न्यायालयासमोर आला; मात्र यासंदर्भात केवळ कायदा करून भागणार नाही, तर समाजातून मागणी झाली पाहिजे, सरकारने कायदा केला तर त्याला राजकीय दृष्टिकोन प्राप्त होईल आणि मुस्लिमांची मते मिळावीत म्हणून अनेक राजकीय पक्ष या कायद्याला विरोध करतील. यापूर्वी हिंदूकोड बिलमध्ये सुधारणा करत असतानाही अशा स्वरूपाचा विरोध झाला होता, हा दाखला त्यांनी दिला.

टॅग्स :ElectionनिवडणूकPuneपुणे