शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

निवडणुकीमधून होतेय समाजाचे विघटन, माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 03:01 IST

कर्नाटकच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून तेथील सरकारने लिंगायत धर्माचा दर्जा दिला. देशात २०१९ पर्यंत अनेक धर्म निर्माण झाल्याचे पाहायला मिळतील. हे प्रकार चांगले नाही; पण अशा प्रकारांमधून देशात किती वाईट प्रकार सुरू आहेत ते तरी कळत आहे. निवडणुकांमधून समाजाचे अधिकाधिक विघटन करण्याचे काम होत आहे, अशी टीका माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी सोमवारी केली.

पुणे : कर्नाटकच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून तेथील सरकारने लिंगायत धर्माचा दर्जा दिला. देशात २०१९ पर्यंत अनेक धर्म निर्माण झाल्याचे पाहायला मिळतील. हे प्रकार चांगले नाही; पण अशा प्रकारांमधून देशात किती वाईट प्रकार सुरू आहेत ते तरी कळत आहे. निवडणुकांमधून समाजाचे अधिकाधिक विघटन करण्याचे काम होत आहे, अशी टीका माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी सोमवारी केली. वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘धर्मनिरपेक्षता- राज्यघटना आणि वास्तव’ या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते.आपल्या निवडणुकांमुळे समाजामध्ये अधिकाधिक विघटन करण्याचे काम होत आहे. अनेक तरुण मुला-मुलींना आपल्या मित्राची जात माहीत नसते. मात्र, निवडणुकांच्या काळामध्ये उमेदवारांच्या जातीचीच सर्वाधिक चर्चा होते. वृत्तपत्रे आणि वाहिन्यांवरील चर्चात्मक कार्यक्रमांमध्येही उमेदवाराच्या जातीसंदर्भात चर्चा होतात त्या होऊ नयेत, अशा स्वरूपाचा कायदा करण्याची वेळ आली आहे. देशातील अनेक आमदार आणि खासदार जेमतेम १० टक्के ते ३० टक्के मतदान घेऊन निवडून आले आहेत. जनतेतून निवडून दिल्या जाणाऱ्या लोकप्रतिनिधीला किमान ५० टक्के अधिक एक मत मिळालेच पाहिजे, या स्वरूपाचा कायदा केला जावा. मात्र, असा कायदा करण्याची राजकीय इच्छाशक्ती आहे की नाही हे महत्त्वाचे आहे.गोडबोले म्हणाले की, धर्मनिरपेक्ष देशामध्ये धर्मनिरपेक्षतेची व्याख्याच नाही. हीच व्याख्या करणे राजकीय पक्षांना अडचणीचे ठरणारे आहे. धर्मनिरपेक्षता कोलमडत असेल, तर त्याविरुद्ध न्यायव्यवस्थेकडे दाद मागणे अवघड आहे. ही गोष्ट सामान्यांच्या आवाक्याबाहेरची आहे. त्यामुळे राज्य घटनेच्या तरतुदीनुसार धर्मनिरपेक्षता आयोग स्थापन केला गेला पाहिजे, अशी मागणी मी गेले काही वर्षे सातत्याने करीत आहे. शासन आणि संबंधित संस्थांचे निर्णय या आयोगाकडे पाठवून त्याचे परीक्षण झाले पाहिजे. हे होऊ शकले तर अनेक गोष्टी आपोआप बंद होतील.तिहेरी तलाकची मागणी समाजातून व्हावी‘तिहेरी तलाक’ विषयी बोलताना ते पुढे म्हणाले, हा प्रश्न मुस्लिम समाजातील अन्याय झालेल्या महिलांनी दाद मागितल्यामुळे सर्वोच्च न्यायालयासमोर आला; मात्र यासंदर्भात केवळ कायदा करून भागणार नाही, तर समाजातून मागणी झाली पाहिजे, सरकारने कायदा केला तर त्याला राजकीय दृष्टिकोन प्राप्त होईल आणि मुस्लिमांची मते मिळावीत म्हणून अनेक राजकीय पक्ष या कायद्याला विरोध करतील. यापूर्वी हिंदूकोड बिलमध्ये सुधारणा करत असतानाही अशा स्वरूपाचा विरोध झाला होता, हा दाखला त्यांनी दिला.

टॅग्स :ElectionनिवडणूकPuneपुणे