शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

निवडणुकीमधून होतेय समाजाचे विघटन, माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 03:01 IST

कर्नाटकच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून तेथील सरकारने लिंगायत धर्माचा दर्जा दिला. देशात २०१९ पर्यंत अनेक धर्म निर्माण झाल्याचे पाहायला मिळतील. हे प्रकार चांगले नाही; पण अशा प्रकारांमधून देशात किती वाईट प्रकार सुरू आहेत ते तरी कळत आहे. निवडणुकांमधून समाजाचे अधिकाधिक विघटन करण्याचे काम होत आहे, अशी टीका माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी सोमवारी केली.

पुणे : कर्नाटकच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून तेथील सरकारने लिंगायत धर्माचा दर्जा दिला. देशात २०१९ पर्यंत अनेक धर्म निर्माण झाल्याचे पाहायला मिळतील. हे प्रकार चांगले नाही; पण अशा प्रकारांमधून देशात किती वाईट प्रकार सुरू आहेत ते तरी कळत आहे. निवडणुकांमधून समाजाचे अधिकाधिक विघटन करण्याचे काम होत आहे, अशी टीका माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी सोमवारी केली. वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘धर्मनिरपेक्षता- राज्यघटना आणि वास्तव’ या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते.आपल्या निवडणुकांमुळे समाजामध्ये अधिकाधिक विघटन करण्याचे काम होत आहे. अनेक तरुण मुला-मुलींना आपल्या मित्राची जात माहीत नसते. मात्र, निवडणुकांच्या काळामध्ये उमेदवारांच्या जातीचीच सर्वाधिक चर्चा होते. वृत्तपत्रे आणि वाहिन्यांवरील चर्चात्मक कार्यक्रमांमध्येही उमेदवाराच्या जातीसंदर्भात चर्चा होतात त्या होऊ नयेत, अशा स्वरूपाचा कायदा करण्याची वेळ आली आहे. देशातील अनेक आमदार आणि खासदार जेमतेम १० टक्के ते ३० टक्के मतदान घेऊन निवडून आले आहेत. जनतेतून निवडून दिल्या जाणाऱ्या लोकप्रतिनिधीला किमान ५० टक्के अधिक एक मत मिळालेच पाहिजे, या स्वरूपाचा कायदा केला जावा. मात्र, असा कायदा करण्याची राजकीय इच्छाशक्ती आहे की नाही हे महत्त्वाचे आहे.गोडबोले म्हणाले की, धर्मनिरपेक्ष देशामध्ये धर्मनिरपेक्षतेची व्याख्याच नाही. हीच व्याख्या करणे राजकीय पक्षांना अडचणीचे ठरणारे आहे. धर्मनिरपेक्षता कोलमडत असेल, तर त्याविरुद्ध न्यायव्यवस्थेकडे दाद मागणे अवघड आहे. ही गोष्ट सामान्यांच्या आवाक्याबाहेरची आहे. त्यामुळे राज्य घटनेच्या तरतुदीनुसार धर्मनिरपेक्षता आयोग स्थापन केला गेला पाहिजे, अशी मागणी मी गेले काही वर्षे सातत्याने करीत आहे. शासन आणि संबंधित संस्थांचे निर्णय या आयोगाकडे पाठवून त्याचे परीक्षण झाले पाहिजे. हे होऊ शकले तर अनेक गोष्टी आपोआप बंद होतील.तिहेरी तलाकची मागणी समाजातून व्हावी‘तिहेरी तलाक’ विषयी बोलताना ते पुढे म्हणाले, हा प्रश्न मुस्लिम समाजातील अन्याय झालेल्या महिलांनी दाद मागितल्यामुळे सर्वोच्च न्यायालयासमोर आला; मात्र यासंदर्भात केवळ कायदा करून भागणार नाही, तर समाजातून मागणी झाली पाहिजे, सरकारने कायदा केला तर त्याला राजकीय दृष्टिकोन प्राप्त होईल आणि मुस्लिमांची मते मिळावीत म्हणून अनेक राजकीय पक्ष या कायद्याला विरोध करतील. यापूर्वी हिंदूकोड बिलमध्ये सुधारणा करत असतानाही अशा स्वरूपाचा विरोध झाला होता, हा दाखला त्यांनी दिला.

टॅग्स :ElectionनिवडणूकPuneपुणे