शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

धरणग्रस्त व्यावसायिकांना शासकीय यंत्रणांकडून त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 00:18 IST

पवना धरणग्रस्त कृती समिती : आढावा बैठकीत मांडल्या समस्या, आंदोलनाचा दिला इशारा

पवनानगर : पवना धरणग्रस्त तरुणांनी सुरू केलेल्या व्यवसायाला शासकीय यंत्रणांकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. आमच्या उपजिवेकेचे साधन बनलेला व्यवसाय बंद करू देणार नाही़ प्रसंगी कोणतेही पाऊल उचलू, असा इशारा पवना धरणग्रस्त कृती समितीने दिला.

पवनानगर येथे गुरुवारी समितीची आढावा बैठक झाली. या वेळी धरणग्रस्तांनी विविध मागण्या मांडल्या. शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. पवना धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मुकुंदराज काऊर, कार्याध्यक्ष दत्तात्रय ठाकर, सरपंच नारायण बोडके, बबनराव कालेकर, सचिन मोहिते, सुधीर घरदाळे, अनंता घरदाळे, रमेश कालेक यांच्यासह तरुण या वेळी उपस्थित होते. पवना धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने कायम दिशाभूल करून अनेक वर्षे हा प्रश्न रेंगाळत ठेवल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. धरणग्रस्त तरुणांनी सुरू केलेल्या पर्यटन केंद्र बंद करण्याच्या हालचाली शासकीय यंत्रणेकडून होत आहेत. पुनर्वसन होईपर्यंत येथे व्यवसाय सुरूच राहतील, यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. पवना धरणासाठी १९६३ साली जमीन संपादन करण्यात आली. यात १२०३ खातेदार बाधित झाले. यापैकी ३४० खातेदारांना प्रत्येकी ४ एकर जमीन देऊन पुनर्वसन केले. परंतु उर्वरित खातेदारांना अद्याप मोबदला अथवा पुनर्वसन झालेले नाही. यामुळे धरणग्रस्त खातेदारांनी सन २०१३ मध्ये न्यायालयात धाव घेतली. याबाबत याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेवर सुनावणी सुरू आहे, असे असताना तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी यांनी गेल्या आठवड्यात काही कृषी पर्यटन केंद्रात जाऊन पंचनामा केला. या जागेबाबत न्यायालयाने ‘जैसे थे’ परिस्थितीचे आदेश दिले असताना येथे केलेला पंचनामा हा नियमबाह्य असल्याचे तरुणांनी सांगितले.उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदनवडगाव मावळ : पवना धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने पवना धरण परिसरात कृषी पर्यटन केंद्र चालकांनी गुरुवारी मावळचे उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे यांची वडगाव भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. पवना धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मुकुंदराज काऊर, सचिव दत्तात्रय ठाकर, सरपंच नारायण बोडके, माजी सरपंच किसन खैरे, माजी सरपंच अनंता घरदाळे, बबनराव कालेकर, शंकर घरदाळे, सुधीर घरदाळे, उपसरपंच अनंता वर्वे, रवी ठाकर उपस्थित होते. गेल्या ५० वर्षांत झालेल्या अन्यायाच्या व्यथा माजी सरपंच किसन खैरे यांनी प्रांताधिकाºयांपुढे मांडल्या. पुनर्वसन करा, तरुणांना नोकºया द्या, हा आमचा मूलभूत अधिकार आहे़ शासनाने दखल न घेतल्यास आत्मदहन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

टॅग्स :Damधरणdam tourismधरण पर्यटनpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड