शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

धरणग्रस्त व्यावसायिकांना शासकीय यंत्रणांकडून त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 00:18 IST

पवना धरणग्रस्त कृती समिती : आढावा बैठकीत मांडल्या समस्या, आंदोलनाचा दिला इशारा

पवनानगर : पवना धरणग्रस्त तरुणांनी सुरू केलेल्या व्यवसायाला शासकीय यंत्रणांकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. आमच्या उपजिवेकेचे साधन बनलेला व्यवसाय बंद करू देणार नाही़ प्रसंगी कोणतेही पाऊल उचलू, असा इशारा पवना धरणग्रस्त कृती समितीने दिला.

पवनानगर येथे गुरुवारी समितीची आढावा बैठक झाली. या वेळी धरणग्रस्तांनी विविध मागण्या मांडल्या. शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. पवना धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मुकुंदराज काऊर, कार्याध्यक्ष दत्तात्रय ठाकर, सरपंच नारायण बोडके, बबनराव कालेकर, सचिन मोहिते, सुधीर घरदाळे, अनंता घरदाळे, रमेश कालेक यांच्यासह तरुण या वेळी उपस्थित होते. पवना धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने कायम दिशाभूल करून अनेक वर्षे हा प्रश्न रेंगाळत ठेवल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. धरणग्रस्त तरुणांनी सुरू केलेल्या पर्यटन केंद्र बंद करण्याच्या हालचाली शासकीय यंत्रणेकडून होत आहेत. पुनर्वसन होईपर्यंत येथे व्यवसाय सुरूच राहतील, यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. पवना धरणासाठी १९६३ साली जमीन संपादन करण्यात आली. यात १२०३ खातेदार बाधित झाले. यापैकी ३४० खातेदारांना प्रत्येकी ४ एकर जमीन देऊन पुनर्वसन केले. परंतु उर्वरित खातेदारांना अद्याप मोबदला अथवा पुनर्वसन झालेले नाही. यामुळे धरणग्रस्त खातेदारांनी सन २०१३ मध्ये न्यायालयात धाव घेतली. याबाबत याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेवर सुनावणी सुरू आहे, असे असताना तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी यांनी गेल्या आठवड्यात काही कृषी पर्यटन केंद्रात जाऊन पंचनामा केला. या जागेबाबत न्यायालयाने ‘जैसे थे’ परिस्थितीचे आदेश दिले असताना येथे केलेला पंचनामा हा नियमबाह्य असल्याचे तरुणांनी सांगितले.उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदनवडगाव मावळ : पवना धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने पवना धरण परिसरात कृषी पर्यटन केंद्र चालकांनी गुरुवारी मावळचे उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे यांची वडगाव भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. पवना धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मुकुंदराज काऊर, सचिव दत्तात्रय ठाकर, सरपंच नारायण बोडके, माजी सरपंच किसन खैरे, माजी सरपंच अनंता घरदाळे, बबनराव कालेकर, शंकर घरदाळे, सुधीर घरदाळे, उपसरपंच अनंता वर्वे, रवी ठाकर उपस्थित होते. गेल्या ५० वर्षांत झालेल्या अन्यायाच्या व्यथा माजी सरपंच किसन खैरे यांनी प्रांताधिकाºयांपुढे मांडल्या. पुनर्वसन करा, तरुणांना नोकºया द्या, हा आमचा मूलभूत अधिकार आहे़ शासनाने दखल न घेतल्यास आत्मदहन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

टॅग्स :Damधरणdam tourismधरण पर्यटनpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड