शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

पालिका अधिकाऱ्यांची बेफिकिरी उघड

By admin | Updated: April 20, 2016 00:37 IST

पवना नदीपात्रात ठेकेदाराने विनापरवाना बांध टाकल्याने संपूर्ण शहरात पाण्याची समस्या निर्माण झाली. या गंभीर घटनेबाबत महापालिकेच्या रावेत येथील जलउपसा

निगडी : पवना नदीपात्रात ठेकेदाराने विनापरवाना बांध टाकल्याने संपूर्ण शहरात पाण्याची समस्या निर्माण झाली. या गंभीर घटनेबाबत महापालिकेच्या रावेत येथील जलउपसा केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी तब्बल दोन दिवस अनभिज्ञ असल्याचे चव्हाट्यावर आले. नदीपात्रातून आवश्यक जलउपसा का होत नाही, याचे कारण शोधण्यासाठी हालचाली केल्या नाहीत. रावेत येथील जलउपसा केंद्रापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर पुनावळेजवळील पवना नदीपात्रात भराव टाकून पूल तयार झाला, याचा थांगपत्ताही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला लागला नाही. नदीपात्र अथवा लगतच्या भागात बांधकाम, बंधारा अशी कामे करायची असल्यास पाटबंधारे विभागाकडून पूर्वपरवानगी घ्यावी लागते. हे तपासणेही पाटबंधारे विभागाचे काम आहे, असे सांगून महापालिकेने नदीपात्रातील भरावाबद्दल आपली जबाबदारी झटकली आहे. परंतु, ज्या रावेत जलउपसा केंद्रावरून संपूर्ण शहराला पाणीपुरवठा केला जातो, त्या केंद्रावरील यंत्रणेत व्यत्यय आला, ही बाब तरी या केंद्रावर काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि तंत्रज्ञ यांच्या तरी लक्षात येणे आवश्यक होते. (वार्ताहर)