शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

आदिवासी वसतीगृहात मुलभूत सुविधांपासून मुले वंचित, विद्यार्थ्यांवर शिक्षण सोडण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 03:27 IST

येथील न्यायालयाच्या लगत असणाऱ्या शासकीय आदिवासी वसतिगृहाची दुरवस्था झाली आहे़ विद्यार्थ्यांना कोणत्याही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने या वसतिगृहातील विद्यार्थी शिक्षण सोडून पुन्हा आपल्या गावी जाण्याची तयारी करू लागले आहेत.

वडगाव मावळ -  येथील न्यायालयाच्या लगत असणाऱ्या शासकीय आदिवासी वसतिगृहाची दुरवस्था झाली आहे़ विद्यार्थ्यांना कोणत्याही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने या वसतिगृहातील विद्यार्थी शिक्षण सोडून पुन्हा आपल्या गावी जाण्याची तयारी करू लागले आहेत.वडगाव मावळ येथील आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात गेल्या १५ दिवसांपासून उपाहारगृह बंद आहे. विद्यार्थ्यांना उपाशी राहण्याची वेळ आली आहे. वसतिगृहातील विद्यार्थी परीक्षा झाली असल्याने गावी गेले आहेत. तर वसतिगृहातील १६ विद्यार्थी इतर ठिकाणी शिक्षण घेत आहेत. वसतिगृहातच राहत आहेत. फक्त १६ विद्यार्थी असल्याने उपाहारगृह चालवणे परवडत नाही, असे कारण सांगून उपाहारगृह बंद केले आहे. परंतु या १६ विद्यार्थ्यांना दिवसाला प्रत्येकी १०० रुपये देण्याचे उपाहारगृहचालक यांनी ठरवले आहे. या १०० रुपयात विद्यार्थ्यांने २ वेळेचे जेवण व २ वेळेचा नाष्टा करायचा आहे. परंतु सध्या महागाईच्या काळात १०० रुपयात विद्यार्थ्यांचे भागत नसल्याने त्यांनी एक वेळ उपाशी राहून अभ्यास करावा लागत आहे. यामध्येही गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांना १०० रुपये मिळाले नसल्याने दोन दिवसांपासून विद्यार्र्थी उपाशी आहेत.गळताहेत पाण्याच्या टाक्या१मावळ, पालघर, जळगाव, नंदुरबार, नगर या भागातील विद्यार्थी वसतिगृहात राहतात. वसतिगृहाची प्रचंड दुरवस्था झाली असून, भर उन्हाळ्यात वसतिगृहाच्या छतावरून पाण्याच्या टाकीचे पाणी गळत आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाकीची प्रचंड दुरवस्था झाली असून, पिण्याच्या पाण्याचा फिल्टर खराब झाल्याने विद्यार्थ्यांना खराब पाणी या वसतिगृहात प्यावे लागत आहे. परंतु या पाण्यामुळे विद्यार्थी आजारी पडू लागल्याने आता विद्यार्थी पिण्याच्या पाण्यासाठी वडगाव रेल्वे स्थानक किंवा वडगाव पोलीस ठाण्याच्या आवारातून पिण्यासाठी बाटलीतून पाणी भरून ठेवत आहेत.शंभर रुपयांत दोन वेळा जेवा२विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी देण्यात येणारे शंभर रुपयात येथील कर्मचाºयांच्या खात्यावर ती पाठवले जातात. त्यानंतर तो कर्मचारी ते पैसे बँकेतून काडून विद्यार्थ्यांना प्रत्येकी शंभर रुपये वाटतो. परंतु गेल्या तीन दिवसांपासून कर्मचारी वसतिगृहात फिरकला नसल्याने विद्यार्थ्यांना शंभर रुपये मिळाले नाही व परिणामी त्यांना उपाशी राहावे लागत आहे. यापूर्वी वसतिगृहातून विद्यार्थ्यांना मिळणारे जेवण हे प्रचंड निकृष्ट दर्जाचे होते़ परंतु ते वेळेवर मिळत असल्याने विद्यार्थी कोणती तक्रार करत नव्हते. परंतु आता जेवण मिळत नसल्याने वसतिगृहात राहणे विद्यार्थ्यांना कठीण झाले आहे.अंधारातच कराव लागतो अभ्यास३ या वसतिगृहात विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी बेड व्यवस्थित नाही़ वसतिगृहातील शौचालय मोडकळीस झाले असून एकाही बाथरूमला दरवाजा नाही. वसतिगृहात वीजपुरवठा असूनही विद्यार्थ्यांना अंधारात राहावे लागते़ कारण रूममध्ये लावण्यात येणारे बल्ब खराब झाले असून, गेल्या अनेक दिवसांपासून हे बल्ब बदली न केल्याने मुलांना अंधारात रहावे लागत आहे. रात्रीच्या अंधारात वसतिगृहाला सुरक्षारक्षक नसल्यामुळे मुलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. वसतिगृहातील मुलांची संख्या कमी झाल्याने मुलांना बाहेर जेवणासाठी १०० रुपये रोज दिले जात आहेत.गेल्या १५ दिवसांपासून वसतिगृहातील उपाहारगृह बंद करण्यात आले. त्याबदल्यात आम्हाला १०० रुपये दिले जात आहेत़ परंतु तेही वेळेवर मिळत नसल्याने आम्हाला उपाशी रहावे लागत आहे़ त्यामुळे उपाशी राहण्यापेक्षा निकृष्ट का होईना पण जेवण द्या, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.- नितीन भगत, गृहपालवसतिगृहातील मुलांची संख्या कमी झाल्याने मुलांना बाहेर जेवणासाठी १०० रुपये रोज दिले जात आहेत. त्यामुळे मुलांची कोणतीही गैरसोय होत नाही. तसेच हे वसतिगृह भाडेतत्त्वावर असल्याने तेथे कर्मचारी राहत नाही. 

टॅग्स :Studentविद्यार्थीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड