शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

आदिवासी वसतीगृहात मुलभूत सुविधांपासून मुले वंचित, विद्यार्थ्यांवर शिक्षण सोडण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 03:27 IST

येथील न्यायालयाच्या लगत असणाऱ्या शासकीय आदिवासी वसतिगृहाची दुरवस्था झाली आहे़ विद्यार्थ्यांना कोणत्याही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने या वसतिगृहातील विद्यार्थी शिक्षण सोडून पुन्हा आपल्या गावी जाण्याची तयारी करू लागले आहेत.

वडगाव मावळ -  येथील न्यायालयाच्या लगत असणाऱ्या शासकीय आदिवासी वसतिगृहाची दुरवस्था झाली आहे़ विद्यार्थ्यांना कोणत्याही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने या वसतिगृहातील विद्यार्थी शिक्षण सोडून पुन्हा आपल्या गावी जाण्याची तयारी करू लागले आहेत.वडगाव मावळ येथील आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात गेल्या १५ दिवसांपासून उपाहारगृह बंद आहे. विद्यार्थ्यांना उपाशी राहण्याची वेळ आली आहे. वसतिगृहातील विद्यार्थी परीक्षा झाली असल्याने गावी गेले आहेत. तर वसतिगृहातील १६ विद्यार्थी इतर ठिकाणी शिक्षण घेत आहेत. वसतिगृहातच राहत आहेत. फक्त १६ विद्यार्थी असल्याने उपाहारगृह चालवणे परवडत नाही, असे कारण सांगून उपाहारगृह बंद केले आहे. परंतु या १६ विद्यार्थ्यांना दिवसाला प्रत्येकी १०० रुपये देण्याचे उपाहारगृहचालक यांनी ठरवले आहे. या १०० रुपयात विद्यार्थ्यांने २ वेळेचे जेवण व २ वेळेचा नाष्टा करायचा आहे. परंतु सध्या महागाईच्या काळात १०० रुपयात विद्यार्थ्यांचे भागत नसल्याने त्यांनी एक वेळ उपाशी राहून अभ्यास करावा लागत आहे. यामध्येही गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांना १०० रुपये मिळाले नसल्याने दोन दिवसांपासून विद्यार्र्थी उपाशी आहेत.गळताहेत पाण्याच्या टाक्या१मावळ, पालघर, जळगाव, नंदुरबार, नगर या भागातील विद्यार्थी वसतिगृहात राहतात. वसतिगृहाची प्रचंड दुरवस्था झाली असून, भर उन्हाळ्यात वसतिगृहाच्या छतावरून पाण्याच्या टाकीचे पाणी गळत आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाकीची प्रचंड दुरवस्था झाली असून, पिण्याच्या पाण्याचा फिल्टर खराब झाल्याने विद्यार्थ्यांना खराब पाणी या वसतिगृहात प्यावे लागत आहे. परंतु या पाण्यामुळे विद्यार्थी आजारी पडू लागल्याने आता विद्यार्थी पिण्याच्या पाण्यासाठी वडगाव रेल्वे स्थानक किंवा वडगाव पोलीस ठाण्याच्या आवारातून पिण्यासाठी बाटलीतून पाणी भरून ठेवत आहेत.शंभर रुपयांत दोन वेळा जेवा२विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी देण्यात येणारे शंभर रुपयात येथील कर्मचाºयांच्या खात्यावर ती पाठवले जातात. त्यानंतर तो कर्मचारी ते पैसे बँकेतून काडून विद्यार्थ्यांना प्रत्येकी शंभर रुपये वाटतो. परंतु गेल्या तीन दिवसांपासून कर्मचारी वसतिगृहात फिरकला नसल्याने विद्यार्थ्यांना शंभर रुपये मिळाले नाही व परिणामी त्यांना उपाशी राहावे लागत आहे. यापूर्वी वसतिगृहातून विद्यार्थ्यांना मिळणारे जेवण हे प्रचंड निकृष्ट दर्जाचे होते़ परंतु ते वेळेवर मिळत असल्याने विद्यार्थी कोणती तक्रार करत नव्हते. परंतु आता जेवण मिळत नसल्याने वसतिगृहात राहणे विद्यार्थ्यांना कठीण झाले आहे.अंधारातच कराव लागतो अभ्यास३ या वसतिगृहात विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी बेड व्यवस्थित नाही़ वसतिगृहातील शौचालय मोडकळीस झाले असून एकाही बाथरूमला दरवाजा नाही. वसतिगृहात वीजपुरवठा असूनही विद्यार्थ्यांना अंधारात राहावे लागते़ कारण रूममध्ये लावण्यात येणारे बल्ब खराब झाले असून, गेल्या अनेक दिवसांपासून हे बल्ब बदली न केल्याने मुलांना अंधारात रहावे लागत आहे. रात्रीच्या अंधारात वसतिगृहाला सुरक्षारक्षक नसल्यामुळे मुलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. वसतिगृहातील मुलांची संख्या कमी झाल्याने मुलांना बाहेर जेवणासाठी १०० रुपये रोज दिले जात आहेत.गेल्या १५ दिवसांपासून वसतिगृहातील उपाहारगृह बंद करण्यात आले. त्याबदल्यात आम्हाला १०० रुपये दिले जात आहेत़ परंतु तेही वेळेवर मिळत नसल्याने आम्हाला उपाशी रहावे लागत आहे़ त्यामुळे उपाशी राहण्यापेक्षा निकृष्ट का होईना पण जेवण द्या, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.- नितीन भगत, गृहपालवसतिगृहातील मुलांची संख्या कमी झाल्याने मुलांना बाहेर जेवणासाठी १०० रुपये रोज दिले जात आहेत. त्यामुळे मुलांची कोणतीही गैरसोय होत नाही. तसेच हे वसतिगृह भाडेतत्त्वावर असल्याने तेथे कर्मचारी राहत नाही. 

टॅग्स :Studentविद्यार्थीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड