शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगनगरीमध्ये ‘धरण उशाला, कोरड घशाला’; पवना धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा असूनही नागरिकांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:19 IST

यंदाच्या पावसाळ्यात पिंपरी-चिंचवड परिसरासह शहराला पाणीपुरवठा करणा-या पवना धरण क्षेत्रातही भरघोस पाऊस पडला. पवना धरण शंभर टक्के भरल्याने शहरवासीयांच्या पाण्याची चिंता मिटली, असे बोलले जात होते.

- मंगेश पांडेपिंपरी : यंदाच्या पावसाळ्यात पिंपरी-चिंचवड परिसरासह शहराला पाणीपुरवठा करणाºया पवना धरण क्षेत्रातही भरघोस पाऊस पडला. पवना धरण शंभर टक्के भरल्याने शहरवासीयांच्या पाण्याची चिंता मिटली, असे बोलले जात होते. मात्र, महापालिका प्रशासनाच्या नियोजनाअभावी शहरवासीयांवर उन्हाळ्यापूर्वी नोव्हेंबर महिन्यातच पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. यामुळे ‘धरण उशाला, कोरड घशाला’ अशी स्थिती सध्या शहरात आहे.पवना धरणात साडेआठ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. याच धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. पावसाळ्यात हे धरण शंभर टक्के भरल्याने शहरवासीयांनीही समाधान व्यक्त केले. सध्यादेखील या धरणात तब्बल ९६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या फुगेवाडीसारख्या परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून पाण्याचा खडखडाट आहे. याकडे पालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांवर रस्त्यावर उतरून आंदोलनाची वेळ आली.धरणात मुबलक पाणीसाठा असताना तसेच पाणीपुरवठ्याच्या यंत्रणेसाठी लाखो रुपये खर्च केले असतानाही नियोजनाचा अभाव आहे.योग्य नियोजनाचा अभावपाणीपुरवठा ही तातडीक सेवा आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांच्या बजेटसह महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. शहरात लोकसंख्येच्या प्रमाणानुसार रावेत येथील बंधाºयातून दररोज लाखो लिटर पाण्याचा उपसा केला जातो. मात्र, त्याचे वितरण करताना योग्य नियोजन केले जात नसल्याने सुरळीत पाणीपुरवठा होत नाही.कमी दाबाने पाणीपुरवठाशहराच्या काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत आहे. यामुळे साथीच्या आजाराने नागरिक हैराण झाले आहेत. अर्धा तासासाठी पाणी सोडले जाते. पाण्याचा दाब कमी असतो. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचे नागरिक सांगतात.पिंपरी-चिंचवड शहर की दुष्काळी गावफुगेवाडीत पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त नागरिकांकडून ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. धरणातील मुबलक पाणीसाठा व पाणीवितरणाच्या यंत्रणेसाठी कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही वेळेत व पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. त्यामुळे शहरातील काही भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. यामुळे हे पिंपरी-चिंचवड शहर आहे की दुष्काळी गाव असा प्रश्न नागरिकांसमोर आहे.

टॅग्स :Damधरण