शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

उद्योगनगरीमध्ये ‘धरण उशाला, कोरड घशाला’; पवना धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा असूनही नागरिकांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:19 IST

यंदाच्या पावसाळ्यात पिंपरी-चिंचवड परिसरासह शहराला पाणीपुरवठा करणा-या पवना धरण क्षेत्रातही भरघोस पाऊस पडला. पवना धरण शंभर टक्के भरल्याने शहरवासीयांच्या पाण्याची चिंता मिटली, असे बोलले जात होते.

- मंगेश पांडेपिंपरी : यंदाच्या पावसाळ्यात पिंपरी-चिंचवड परिसरासह शहराला पाणीपुरवठा करणाºया पवना धरण क्षेत्रातही भरघोस पाऊस पडला. पवना धरण शंभर टक्के भरल्याने शहरवासीयांच्या पाण्याची चिंता मिटली, असे बोलले जात होते. मात्र, महापालिका प्रशासनाच्या नियोजनाअभावी शहरवासीयांवर उन्हाळ्यापूर्वी नोव्हेंबर महिन्यातच पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. यामुळे ‘धरण उशाला, कोरड घशाला’ अशी स्थिती सध्या शहरात आहे.पवना धरणात साडेआठ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. याच धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. पावसाळ्यात हे धरण शंभर टक्के भरल्याने शहरवासीयांनीही समाधान व्यक्त केले. सध्यादेखील या धरणात तब्बल ९६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या फुगेवाडीसारख्या परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून पाण्याचा खडखडाट आहे. याकडे पालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांवर रस्त्यावर उतरून आंदोलनाची वेळ आली.धरणात मुबलक पाणीसाठा असताना तसेच पाणीपुरवठ्याच्या यंत्रणेसाठी लाखो रुपये खर्च केले असतानाही नियोजनाचा अभाव आहे.योग्य नियोजनाचा अभावपाणीपुरवठा ही तातडीक सेवा आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांच्या बजेटसह महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. शहरात लोकसंख्येच्या प्रमाणानुसार रावेत येथील बंधाºयातून दररोज लाखो लिटर पाण्याचा उपसा केला जातो. मात्र, त्याचे वितरण करताना योग्य नियोजन केले जात नसल्याने सुरळीत पाणीपुरवठा होत नाही.कमी दाबाने पाणीपुरवठाशहराच्या काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत आहे. यामुळे साथीच्या आजाराने नागरिक हैराण झाले आहेत. अर्धा तासासाठी पाणी सोडले जाते. पाण्याचा दाब कमी असतो. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचे नागरिक सांगतात.पिंपरी-चिंचवड शहर की दुष्काळी गावफुगेवाडीत पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त नागरिकांकडून ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. धरणातील मुबलक पाणीसाठा व पाणीवितरणाच्या यंत्रणेसाठी कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही वेळेत व पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. त्यामुळे शहरातील काही भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. यामुळे हे पिंपरी-चिंचवड शहर आहे की दुष्काळी गाव असा प्रश्न नागरिकांसमोर आहे.

टॅग्स :Damधरण