शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

औद्योगिक न्यायालयाचा आदेश असतानाही कामगारांना कामावर घेण्यास सोना’ कंपनीकडून टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 22:17 IST

खंडाळा तालुक्यातील लोणंद एम. आय.डी.सी.तील सोना अलाईज कंपनीतील कामगारांना पुणे येथील औधोगिक न्यायालयाने दि. १७ रोजी कामावर हजर राहण्याचा आदेश कंपनी व्यवस्थापन व सोना अलाईज एम्प्लॉईज युनियनला दिले होते.

लोणंद -  खंडाळा तालुक्यातील लोणंद एम. आय.डी.सी.तील सोना अलाईज कंपनीतील कामगारांना पुणे येथील औधोगिक न्यायालयाने दि. १७ रोजी कामावर हजर राहण्याचा आदेश कंपनी व्यवस्थापन व सोना अलाईज एम्प्लॉईज युनियनला दिला असतानाही कंपनी व्यवस्थापन अडवणूक करून कामगारांना कामावर घेत नसल्याची माहिती सोना अलाईज एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष विश्वास क्षीरसागर यांनी दिली.

लोणंद एम. आय.डी.सी.तील सोना अलाईज कंपनीतील ३५० कामगारांनी पगारवाढ , इन्शुरन्स अन्य मागण्या कंपनी व्यवस्थापनाकडे केली होती. गेल्या वर्षभरापासून कंपनी व्यवस्थापनाकडे सोना अलाईज एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी पाठपुरावा करीत आहे. परंतु कंपनी व्यवस्थापनाने त्याकडे सोईस्कर पणे दुर्लक्ष करून कामगारांना कामापासून दूर ठेवले. कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना कंपनी गेटच्या पासून १ किलोमीटरच्या आत येण्यास मज्जाव करून कामगारांना ११५ दिवस कामगारांना काम करण्यापासून दूर ठेवले आहे. या संदर्भात सोना अलाईज कंपनीने औधोगिक न्यायालयात एम्प्लॉईज युनियनच्या विरोधात तक्रार दाखल होती. त्यावर औधोगिक न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन कामगारांनी प्रथम कामावर हजर होण्याचे आदेश दिला . त्यानुसार शुक्रवारी कामगार कंपनीच्या गेटवर सकाळी ९ वाजता गेले असता कंपनीचे मनुष्यबळ विकास विभागाचे जनरल मनेजर प्रदीप राऊत यांनी कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाला कळवितो त्यानंतर सांगतो असे सांगून कामगारांना कामावर घेण्यास अडवणूक केली असल्याचे युनियनचे अध्यक्ष विश्वास क्षीरसागर यांनी सांगितले.दरम्यान , औधोगिक न्यायालयाचा आदेश असतानाही कंपनी व्यवस्थापनाने न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान न राखल्यामुळे कामगारा मध्ये नाराजी चा सूर ,असंतोष निर्माण झालेला आहे.गेल्या ११५ दिवसापासून कामगार आणि कामगारांचे कुटूंबाचे उपासमार सुरू झालेली आहे. कामगार हवा दिल झाला आहे .कुटूंबाची वाताहात झालेली आहे.याठिकाणी काम करणारे ८०% कामगार स्थानिक, भूमिपुत्र,तसेच लोणंद व लोणंद परिसरातील आहेत. कंपनी व्यवस्थापनाने औधोगिक न्यायालयाचा आदेशानुसार कामगारांना कामावर न घेतल्यास आमरण उपोषण करण्यात येईल.असा इशारा युनियनचे अध्यक्ष विश्वास क्षीरसागर यांनी दिला आहे.तरी संबधीत व्यवस्थापनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCourtन्यायालयEmployeeकर्मचारी