शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका आयुक्तांच्या घरातून पाणी भरून देण्याची मागणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 02:55 IST

अण्णा भाऊ साठेनगर वसाहतीत १९९४ पासून कष्टकरी, कामगार, मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून, सोळाशेच्या वर लोकसंख्या आहे. मात्र महापालिकेच्या नळकोंडाळ्यातून गेल्या अनेक महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे थेट महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानातून पाणी भरण्याची मुभा मिळावी, असे विनंती करणारे पत्र अपना वतन संघटनेने आयुक्तांना दिले आहे.

वाकड : येथील अण्णा भाऊ साठेनगर वसाहतीत १९९४ पासून कष्टकरी, कामगार, मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून, सोळाशेच्या वर लोकसंख्या आहे. मात्र महापालिकेच्या नळकोंडाळ्यातून गेल्या अनेक महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे थेट महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानातून पाणी भरण्याची मुभा मिळावी, असे विनंती करणारे पत्र अपना वतन संघटनेने आयुक्तांना दिले आहे.येथील महिलांना पूर्वी पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत होती. पाण्याची सोय नसल्याने येथे वादविवाद, भांडण-तंटे होत होती. येथील नागरिकांच्या वतीने अपना वतन संघटनेने वारंवार महापालिकेशी पत्रव्यवहार करून वेळप्रसंगी आंदोलने केली. त्यामुळे २०१४ मध्ये या ठिकाणी पाण्याची लाइन टाकण्यात आली. परंतु ग्रुप कनेक्शन देण्यात आले. पाच जणांमध्ये एक कनेक्शन देण्यात आले. त्यामुळे पाच दिवसातून एका व्यक्तीचा पाण्याचा नंबर येतो. पूर्वी पाण्याचा प्रेशर चांगला असल्याने काही अडचणी आल्या नाहीत. परंतु २०१७च्या निवडणुकीनंतर आजतगायत या अण्णा भाऊ साठेनगर परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणी येऊ लागले. एकतर पाच दिवसांतून नंबर, त्यात प्रेशर नसल्याने नागरिकांना पाणी मिळेनासे झाले. त्यामुळे नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांसह संबंधित पाणीपुरवठा अधिकाºयाकडे तक्रार केली. परंतु त्या अधिकाºयांनी दुर्लक्ष केले आहे.तसेच काही भागांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. विशेषत: वरच्या मजल्यावर पाणी पोहोचत नसल्याचे नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे पाणी टंचाईमुळे नागरिक हवालदील झाल्याचे चित्र दिसत आहे.सध्या येथील नागरिकांना पाण्याअभावी असंख्य अडचणीला सामोरे जावे लागत आहे. घरगुती कामे करण्यासाठी व पिण्याचे पाणी आणण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असलेल्या महापालिकेच्या हद्दीतील नागरिकांना पाण्यासारख्या मूलभूत गरजेपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे अण्णा भाऊ साठेनगर परिसरातील नागरिकांचा पाणीपुरवठा तातडीने मुबलक व सुरळीत करावा. येत्या शुक्रवारपर्यंत येथील पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर सर्व महिला १६ सप्टेंबरला सकाळी हंडा-कळशी घेऊन आयुक्तांच्या निवासस्थानी पाणी भरण्यासाठी येतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

टॅग्स :Puneपुणे