शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

महापालिका आयुक्तांच्या घरातून पाणी भरून देण्याची मागणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 02:55 IST

अण्णा भाऊ साठेनगर वसाहतीत १९९४ पासून कष्टकरी, कामगार, मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून, सोळाशेच्या वर लोकसंख्या आहे. मात्र महापालिकेच्या नळकोंडाळ्यातून गेल्या अनेक महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे थेट महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानातून पाणी भरण्याची मुभा मिळावी, असे विनंती करणारे पत्र अपना वतन संघटनेने आयुक्तांना दिले आहे.

वाकड : येथील अण्णा भाऊ साठेनगर वसाहतीत १९९४ पासून कष्टकरी, कामगार, मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून, सोळाशेच्या वर लोकसंख्या आहे. मात्र महापालिकेच्या नळकोंडाळ्यातून गेल्या अनेक महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे थेट महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानातून पाणी भरण्याची मुभा मिळावी, असे विनंती करणारे पत्र अपना वतन संघटनेने आयुक्तांना दिले आहे.येथील महिलांना पूर्वी पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत होती. पाण्याची सोय नसल्याने येथे वादविवाद, भांडण-तंटे होत होती. येथील नागरिकांच्या वतीने अपना वतन संघटनेने वारंवार महापालिकेशी पत्रव्यवहार करून वेळप्रसंगी आंदोलने केली. त्यामुळे २०१४ मध्ये या ठिकाणी पाण्याची लाइन टाकण्यात आली. परंतु ग्रुप कनेक्शन देण्यात आले. पाच जणांमध्ये एक कनेक्शन देण्यात आले. त्यामुळे पाच दिवसातून एका व्यक्तीचा पाण्याचा नंबर येतो. पूर्वी पाण्याचा प्रेशर चांगला असल्याने काही अडचणी आल्या नाहीत. परंतु २०१७च्या निवडणुकीनंतर आजतगायत या अण्णा भाऊ साठेनगर परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणी येऊ लागले. एकतर पाच दिवसांतून नंबर, त्यात प्रेशर नसल्याने नागरिकांना पाणी मिळेनासे झाले. त्यामुळे नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांसह संबंधित पाणीपुरवठा अधिकाºयाकडे तक्रार केली. परंतु त्या अधिकाºयांनी दुर्लक्ष केले आहे.तसेच काही भागांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. विशेषत: वरच्या मजल्यावर पाणी पोहोचत नसल्याचे नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे पाणी टंचाईमुळे नागरिक हवालदील झाल्याचे चित्र दिसत आहे.सध्या येथील नागरिकांना पाण्याअभावी असंख्य अडचणीला सामोरे जावे लागत आहे. घरगुती कामे करण्यासाठी व पिण्याचे पाणी आणण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असलेल्या महापालिकेच्या हद्दीतील नागरिकांना पाण्यासारख्या मूलभूत गरजेपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे अण्णा भाऊ साठेनगर परिसरातील नागरिकांचा पाणीपुरवठा तातडीने मुबलक व सुरळीत करावा. येत्या शुक्रवारपर्यंत येथील पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर सर्व महिला १६ सप्टेंबरला सकाळी हंडा-कळशी घेऊन आयुक्तांच्या निवासस्थानी पाणी भरण्यासाठी येतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

टॅग्स :Puneपुणे