शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

महापालिका आयुक्तांच्या घरातून पाणी भरून देण्याची मागणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 02:55 IST

अण्णा भाऊ साठेनगर वसाहतीत १९९४ पासून कष्टकरी, कामगार, मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून, सोळाशेच्या वर लोकसंख्या आहे. मात्र महापालिकेच्या नळकोंडाळ्यातून गेल्या अनेक महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे थेट महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानातून पाणी भरण्याची मुभा मिळावी, असे विनंती करणारे पत्र अपना वतन संघटनेने आयुक्तांना दिले आहे.

वाकड : येथील अण्णा भाऊ साठेनगर वसाहतीत १९९४ पासून कष्टकरी, कामगार, मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून, सोळाशेच्या वर लोकसंख्या आहे. मात्र महापालिकेच्या नळकोंडाळ्यातून गेल्या अनेक महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे थेट महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानातून पाणी भरण्याची मुभा मिळावी, असे विनंती करणारे पत्र अपना वतन संघटनेने आयुक्तांना दिले आहे.येथील महिलांना पूर्वी पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत होती. पाण्याची सोय नसल्याने येथे वादविवाद, भांडण-तंटे होत होती. येथील नागरिकांच्या वतीने अपना वतन संघटनेने वारंवार महापालिकेशी पत्रव्यवहार करून वेळप्रसंगी आंदोलने केली. त्यामुळे २०१४ मध्ये या ठिकाणी पाण्याची लाइन टाकण्यात आली. परंतु ग्रुप कनेक्शन देण्यात आले. पाच जणांमध्ये एक कनेक्शन देण्यात आले. त्यामुळे पाच दिवसातून एका व्यक्तीचा पाण्याचा नंबर येतो. पूर्वी पाण्याचा प्रेशर चांगला असल्याने काही अडचणी आल्या नाहीत. परंतु २०१७च्या निवडणुकीनंतर आजतगायत या अण्णा भाऊ साठेनगर परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणी येऊ लागले. एकतर पाच दिवसांतून नंबर, त्यात प्रेशर नसल्याने नागरिकांना पाणी मिळेनासे झाले. त्यामुळे नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांसह संबंधित पाणीपुरवठा अधिकाºयाकडे तक्रार केली. परंतु त्या अधिकाºयांनी दुर्लक्ष केले आहे.तसेच काही भागांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. विशेषत: वरच्या मजल्यावर पाणी पोहोचत नसल्याचे नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे पाणी टंचाईमुळे नागरिक हवालदील झाल्याचे चित्र दिसत आहे.सध्या येथील नागरिकांना पाण्याअभावी असंख्य अडचणीला सामोरे जावे लागत आहे. घरगुती कामे करण्यासाठी व पिण्याचे पाणी आणण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असलेल्या महापालिकेच्या हद्दीतील नागरिकांना पाण्यासारख्या मूलभूत गरजेपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे अण्णा भाऊ साठेनगर परिसरातील नागरिकांचा पाणीपुरवठा तातडीने मुबलक व सुरळीत करावा. येत्या शुक्रवारपर्यंत येथील पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर सर्व महिला १६ सप्टेंबरला सकाळी हंडा-कळशी घेऊन आयुक्तांच्या निवासस्थानी पाणी भरण्यासाठी येतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

टॅग्स :Puneपुणे