शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

देहूगाव - माळीनगरात अशुद्ध पाणी, प्रशासनाचे दुर्लक्ष  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 01:09 IST

देहूगाव: येथील माळीनगर भागात गेल्या काही दिवसांपासून अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने येथील नागरिक संतप्त भावना व्यक्त करीत आहेत.श्रीक्षेत्र देहूगावला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या देहूगावसाठी नवी पाणीपुरवठा योजना सुमारे नऊ कोटी रुपये खर्च करून तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून केली.ही ...

देहूगाव: येथील माळीनगर भागात गेल्या काही दिवसांपासून अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने येथील नागरिक संतप्त भावना व्यक्त करीत आहेत.श्रीक्षेत्र देहूगावला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या देहूगावसाठी नवी पाणीपुरवठा योजना सुमारे नऊ कोटी रुपये खर्च करून तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून केली.ही योजना तयार असून, ती कार्यान्वित करण्यासाठी तपासणीही झाली. मात्र त्यांनी ती योजना देहूगाव व विठ्ठलनगर भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी केली आहे. मात्र माळीनगरसाठी ही योजना कार्यान्वित केली नव्हती. त्यामुळे जुन्या योजनेतूनच पाणीपुरवठा केला जात आहे. या प्रकल्पातील शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणारी वाळूही खराब झाली होती. त्यामुळे काही भागात खराब व गढूळ आणि हिरवे, शेवाळमिश्रित पाणी येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने उपसरपंच संतोष हगवणे व ग्रामविकास अधिकारी यांनी तातडीने प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली.यापूर्वी माजी सरपंच हेमा मोरे यांनीही भेट देऊन येथील कर्मचाºयांना पाणीपुरवठा शुद्ध व सुरळीत करण्यासंदर्भात काही सूचनाकेल्या. तेव्हा त्यांना क्लोरिनेशनकाम योग्य रीतीने होत नसल्याचे आढळले होते. यात्रा काळात असे काही होणार नसल्याचे येथील असे शाखा अभियंता धनंजय जगधने यांनी सांगितले.याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूषण भारती म्हणाल्या, ‘‘ग्रामपंचायत व महाराष्ट्रजीवन प्राधिकरण विभाग यांना जानेवारी, फेब्रुवारी व मार्चमध्येही लेखी कळविले आहे. मात्रतरीही दखल घेतली नाही. त्यामुळे पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले आहेत.’’माळीनगर भागात तातडीने शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी येथील महिला कार्यकर्त्या वैशाली टिळेकर यांनी केली आहे.साथीचे आजार : दक्षता घेण्याचे आवाहन१गेल्या दोन दिवसांत अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने काविळीचीशक्यता नाकारता येत नाही. काविळीचे जंतू हे आठ दिवससुप्तावस्थेत राहू शकतात. याबाबत आणखी दोन-तीन दिवसांनी निश्चित काय ते समजू येईल. मात्र लोकांनी पाणी उकळून व मेडीक्लोरचा वापर करून शुद्ध करून वापरावे. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.२शाखा अभियंता धनंजय जगधने म्हणाले की, नवीन योजनेची तपासणी सुरू असून, जुन्या योजनेतील वाळू खराब झालेली होती. त्यामुळे काही वेळा गढूळ व हिरव्या पाण्याचा पुरवठा झाला होता. आता मात्र माळीनगरलाही नवीन योजनेतून पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्या दृष्टीने आज चाचणी करून शुद्ध पाणीपुरवठा केला आहे. त्याचे नमुने तपासूनदेखील घेतलेले असल्याने हा प्रश्न सोडविण्यात यश आले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड