शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

देहूगाव - माळीनगरात अशुद्ध पाणी, प्रशासनाचे दुर्लक्ष  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 01:09 IST

देहूगाव: येथील माळीनगर भागात गेल्या काही दिवसांपासून अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने येथील नागरिक संतप्त भावना व्यक्त करीत आहेत.श्रीक्षेत्र देहूगावला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या देहूगावसाठी नवी पाणीपुरवठा योजना सुमारे नऊ कोटी रुपये खर्च करून तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून केली.ही ...

देहूगाव: येथील माळीनगर भागात गेल्या काही दिवसांपासून अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने येथील नागरिक संतप्त भावना व्यक्त करीत आहेत.श्रीक्षेत्र देहूगावला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या देहूगावसाठी नवी पाणीपुरवठा योजना सुमारे नऊ कोटी रुपये खर्च करून तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून केली.ही योजना तयार असून, ती कार्यान्वित करण्यासाठी तपासणीही झाली. मात्र त्यांनी ती योजना देहूगाव व विठ्ठलनगर भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी केली आहे. मात्र माळीनगरसाठी ही योजना कार्यान्वित केली नव्हती. त्यामुळे जुन्या योजनेतूनच पाणीपुरवठा केला जात आहे. या प्रकल्पातील शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणारी वाळूही खराब झाली होती. त्यामुळे काही भागात खराब व गढूळ आणि हिरवे, शेवाळमिश्रित पाणी येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने उपसरपंच संतोष हगवणे व ग्रामविकास अधिकारी यांनी तातडीने प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली.यापूर्वी माजी सरपंच हेमा मोरे यांनीही भेट देऊन येथील कर्मचाºयांना पाणीपुरवठा शुद्ध व सुरळीत करण्यासंदर्भात काही सूचनाकेल्या. तेव्हा त्यांना क्लोरिनेशनकाम योग्य रीतीने होत नसल्याचे आढळले होते. यात्रा काळात असे काही होणार नसल्याचे येथील असे शाखा अभियंता धनंजय जगधने यांनी सांगितले.याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूषण भारती म्हणाल्या, ‘‘ग्रामपंचायत व महाराष्ट्रजीवन प्राधिकरण विभाग यांना जानेवारी, फेब्रुवारी व मार्चमध्येही लेखी कळविले आहे. मात्रतरीही दखल घेतली नाही. त्यामुळे पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले आहेत.’’माळीनगर भागात तातडीने शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी येथील महिला कार्यकर्त्या वैशाली टिळेकर यांनी केली आहे.साथीचे आजार : दक्षता घेण्याचे आवाहन१गेल्या दोन दिवसांत अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने काविळीचीशक्यता नाकारता येत नाही. काविळीचे जंतू हे आठ दिवससुप्तावस्थेत राहू शकतात. याबाबत आणखी दोन-तीन दिवसांनी निश्चित काय ते समजू येईल. मात्र लोकांनी पाणी उकळून व मेडीक्लोरचा वापर करून शुद्ध करून वापरावे. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.२शाखा अभियंता धनंजय जगधने म्हणाले की, नवीन योजनेची तपासणी सुरू असून, जुन्या योजनेतील वाळू खराब झालेली होती. त्यामुळे काही वेळा गढूळ व हिरव्या पाण्याचा पुरवठा झाला होता. आता मात्र माळीनगरलाही नवीन योजनेतून पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्या दृष्टीने आज चाचणी करून शुद्ध पाणीपुरवठा केला आहे. त्याचे नमुने तपासूनदेखील घेतलेले असल्याने हा प्रश्न सोडविण्यात यश आले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड