शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

देहूगाव - माळीनगरात अशुद्ध पाणी, प्रशासनाचे दुर्लक्ष  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 01:09 IST

देहूगाव: येथील माळीनगर भागात गेल्या काही दिवसांपासून अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने येथील नागरिक संतप्त भावना व्यक्त करीत आहेत.श्रीक्षेत्र देहूगावला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या देहूगावसाठी नवी पाणीपुरवठा योजना सुमारे नऊ कोटी रुपये खर्च करून तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून केली.ही ...

देहूगाव: येथील माळीनगर भागात गेल्या काही दिवसांपासून अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने येथील नागरिक संतप्त भावना व्यक्त करीत आहेत.श्रीक्षेत्र देहूगावला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या देहूगावसाठी नवी पाणीपुरवठा योजना सुमारे नऊ कोटी रुपये खर्च करून तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून केली.ही योजना तयार असून, ती कार्यान्वित करण्यासाठी तपासणीही झाली. मात्र त्यांनी ती योजना देहूगाव व विठ्ठलनगर भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी केली आहे. मात्र माळीनगरसाठी ही योजना कार्यान्वित केली नव्हती. त्यामुळे जुन्या योजनेतूनच पाणीपुरवठा केला जात आहे. या प्रकल्पातील शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणारी वाळूही खराब झाली होती. त्यामुळे काही भागात खराब व गढूळ आणि हिरवे, शेवाळमिश्रित पाणी येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने उपसरपंच संतोष हगवणे व ग्रामविकास अधिकारी यांनी तातडीने प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली.यापूर्वी माजी सरपंच हेमा मोरे यांनीही भेट देऊन येथील कर्मचाºयांना पाणीपुरवठा शुद्ध व सुरळीत करण्यासंदर्भात काही सूचनाकेल्या. तेव्हा त्यांना क्लोरिनेशनकाम योग्य रीतीने होत नसल्याचे आढळले होते. यात्रा काळात असे काही होणार नसल्याचे येथील असे शाखा अभियंता धनंजय जगधने यांनी सांगितले.याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूषण भारती म्हणाल्या, ‘‘ग्रामपंचायत व महाराष्ट्रजीवन प्राधिकरण विभाग यांना जानेवारी, फेब्रुवारी व मार्चमध्येही लेखी कळविले आहे. मात्रतरीही दखल घेतली नाही. त्यामुळे पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले आहेत.’’माळीनगर भागात तातडीने शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी येथील महिला कार्यकर्त्या वैशाली टिळेकर यांनी केली आहे.साथीचे आजार : दक्षता घेण्याचे आवाहन१गेल्या दोन दिवसांत अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने काविळीचीशक्यता नाकारता येत नाही. काविळीचे जंतू हे आठ दिवससुप्तावस्थेत राहू शकतात. याबाबत आणखी दोन-तीन दिवसांनी निश्चित काय ते समजू येईल. मात्र लोकांनी पाणी उकळून व मेडीक्लोरचा वापर करून शुद्ध करून वापरावे. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.२शाखा अभियंता धनंजय जगधने म्हणाले की, नवीन योजनेची तपासणी सुरू असून, जुन्या योजनेतील वाळू खराब झालेली होती. त्यामुळे काही वेळा गढूळ व हिरव्या पाण्याचा पुरवठा झाला होता. आता मात्र माळीनगरलाही नवीन योजनेतून पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्या दृष्टीने आज चाचणी करून शुद्ध पाणीपुरवठा केला आहे. त्याचे नमुने तपासूनदेखील घेतलेले असल्याने हा प्रश्न सोडविण्यात यश आले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड