शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

यंत्रांच्या सुट्या भागांची धोकादायक वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 04:51 IST

तळवडेगावच्या हद्दीत विविध कारखाने असून, येथे कारखानदारीसाठी लागणारे विविध सुटे भाग तयार केले जात असतात.

देहूगाव : देहू-आळंदी रस्त्यावरील तळवडेजवळील देवी इंद्रायणी सोसायटीसमोरील एका कारखान्यात तयार होत असलेल्या यंत्राचे मोठे सुटे भाग कोणत्याही प्रकारची सुरक्षितता न बाळगता राजरोसपणे वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करीत अवजड वाहनांवर चढविले जात आहेत. तसेच त्याची धोकादायकरीत्या वाहतूकही केली जाते. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होण्यासह अपघातालाही निमंत्रण ठरत आहे. अशा वाहनांवर व कारखान्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.तळवडेगावच्या हद्दीत विविध कारखाने असून, येथे कारखानदारीसाठी लागणारे विविध सुटे भाग तयार केले जात असतात. मात्र काही सुटे भाग मोठ्या आकाराचे व अवजडही असतात. सुटे भाग वाहनांवर चढवून इच्छित कारखान्यात पोहोचविण्याचे काम केले जाते. हे काम करताना अवजड वाहने, क्रेन रस्त्याच्या कडेलाच लावून हे सुटे भाग वाहनांवर चढविण्याचे काम केले जात असते. देहू-आळंदी ही दोन्ही तीर्थक्षेत्रे असून, या रस्त्याने वाहनांची वर्दळ असते. शिवाय याच रस्त्याने तळेगाव, चाकण, नवलाख उंबरे या भागात कामगारांची वाहतूक करणाऱ्या बसही मोठ्या प्रमाणात जातात. दरम्यान, भर रस्त्यावर अशा प्रकारे अवजड अशा सुट्या भागांची चढ-उतार करणे हे धोक्याचे असतानाही त्याकडे डोळेझाक केली जात आहे. यासाठी संबंधित यंत्रणेची कोणतीही परवानगी घेतली जात नाही. वाहतूक न थांबविताच हे काम केले जाते यासाठी कोणत्याही प्रकारचा धोका दाखविणारे झेंडे इतर वाहनचालकांना दाखविले जात नाही अथवा सावधानतेचा कोणताही इशारा दिला जात नाही. पोलिसांचे मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :Accidentअपघात