शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

धरण परिसर असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 05:56 IST

लोणावळा परिसरातील भुशी धरण, लोणावळा व तुंगार्ली या धरणाचा पाणीसाठा संपत आला आहे.

लोणावळा : धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या मावळ तालुक्यातील धरणांमध्ये वारंवार होणारे पर्यटकांचे अपघात ध्यानात घेता या धरण परिसरांची सुरक्षा ही रामभरोसे असल्याचे अधोरेखित होत आहे. मावळ तालुका व लोणावळा परिसरात निसर्ग, अल्हाददायीपणा, धरणे, किल्ले, लेण्या, मंदिरे असा हा समृद्ध परिसर देशभरातील पर्यटकांना साद घालत असतो. मुंबई व पुणे या दोन शहरांच्या मध्यावर हा तालुका असल्याने याठिकाणी पर्यटनाकरिता येणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. महाविद्यालयीन तरुण, तरुणी, आयटीपार्कमधील अभियंते, मुंबई भागातील उच्चभ्रू यांची संख्या तुलनात्मक दृष्ट्या जास्त असते. मावळ परिसरात निसर्गाचा निख्खळ आनंद घेण्याऐवजी जीव धोक्यात घालत धरणाच्या पाण्यात उतरणे, दरीच्या तोंडावर जाऊन सेल्फी काढणे, गड किल्ल्यांवर धोकादायक ठिकाणी जाणे असे प्रकार करतात व मरणाला आमंत्रण देतात. सोमवारी पवनाधरण व लोणावळ्यातील वलवण धरणात बुडून तीन जणांचा मृत्यू झाला. यापैकी दोन जण अल्पवयीन होते. पवना धरणात दोन महिन्यांपूर्वी देखील दोन पर्यटकांना बुडून झाला होता. वारंवार धरण परिसरात या घटना घडत असताना त्यावर नियंत्रण राखण्यात यंत्रणांना अपयश येत आहे. मावळ तालुक्यातील काही धरणे ही पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येतात तर काही टाटा कंपनीची खासगी धरणे आहेत. धरणांचा परिसर हा व्यापक असल्याने पर्यटक सुरक्षा जाळ्या भेदून पाण्यात उतरतात. अनेक वेळा पोहता येत नसताना देखील मित्रांच्या समवेत मौज म्हणून पाण्यात गेलेल्या अनेकांची मावळात प्राणज्योत मावळली आहे. खरं तर धरणाचा परिसर व बॅक वॉटरचा भाग पहाता यासर्व ठिकाणी सुरक्षा यंत्रणा नेमणे हे शक्य नसले तरी किमान सुरक्षा जाळ्या लावणे गरजेचे आहे. पोलीस प्रशासनाने देखील धरण भागात गस्त वाढवायला हवी.लोणावळा परिसरातील भुशी धरण, लोणावळा व तुंगार्ली या धरणाचा पाणीसाठा संपत आला आहे. तरी देखील पाण्यात युवा पर्यटक उतरतात पाण्याचा अंदाज येत नसल्याने चिखलात गुंततात व मृत्यूला कवटाळतात. पवना धरण तसेच वलवण धरणाच्या डोंगराकडील भागातून पर्यटक सुरक्षा यंत्रणेचाडोळा चूकवत पाण्यात उतरतात, जागेची अपुरी माहिती व पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने पर्यटक धरणात बुडण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. 

टॅग्स :Damधरण