शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

मारुंजीत शॉर्टसर्किटमुळे फळबाग भस्मसात; शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 18:25 IST

मारुंजी (मुळशी) येथे महावितरणच्या २२ के व्ही उच्चदाब विजवाहिनीच्या शॉर्टसर्किटमुळं लागलेल्या आगीत फळबाग भस्मसात झाल्या आहेत.

ठळक मुद्देशॉर्टसर्किटमुळे ठिणग्या पडून गेल्या ३ वर्षात परिसरात आगीच्या १० घटनामहावितरणने रीतसर पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी : अंकुश जगताप

पिंपरी-चिंचवड (वाकड) : मारुंजी (मुळशी) येथे महावितरणच्या २२ के व्ही उच्चदाब विजवाहिनीच्या शॉर्टसर्किटमुळं लागलेल्या आगीत फळबाग भस्मसात झाल्या आहेत. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप एका शेतकऱ्याने केला असून महावितरणने मात्र, याबाबत हात झटकले आहेत.अंकुश जगताप असे शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या बागेत आंबा, अंजीर, स्टार फ्रूट (कमळ कैरी) व कागदी लिंबू अशी ४०हून अधिक फळ धारणेसाठी तयार असलेली, मोहरलेली झाडे जळाली आहेत. पहाटे ही बाब जगताप यांच्या निदर्शनास आली. चौकशी करता आजूबाजूलाही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शॉर्टसर्किटमुळं आग लागल्याचे समजले. जगताप यांनी खडकाळ जमिनीत साडेतीन वर्षांपूर्वी लावलेल्या झाडांना फळधारणा सुरु झाली होती. आंबा दोन वर्षांपासून मोहोरला आहे. अंजीर बाग लावली आहे. अशातच लागलेल्या या आगीत ३ ते ४ लाखाहून जास्त नुकसान झाल्याने जगताप हवालदिल झाले आहेत. 

हिंजवडी येथील टाटा प्लास्टिक, टाटा जॉन्सन या कंपन्यांनी १९९५ साली टाकेलेली खासगी विजवाहिनी आहे. तेव्हा एमआयडीसी देखील नव्हती. पण जगताप यांनी सहकार्य करून ही विजवाहिनी स्वत:च्या शेतातून होऊ दिली. यानंतर जुन्या तारा बदलल्याच नाहीत. त्यातून शॉर्टसर्किटमुळे ठिणग्या पडून गेल्या ३ वर्षात परिसरात आगीच्या १० घटना घडल्या. जगताप यांचे मागील वर्षीही १० झाडे जळून असे नुकसान झाले होते. मात्र, उडालेले चिनी मातीचे कंडक्टर बदलून जुजबी दुरुस्ती केली जाते. पण आता आगीमुळे झाडंच होरपळल्याने मोठे नुकसान सहण करण्याची वेळ  त्यांच्यावर आली आहे. त्यामुळं नुकसानीचा पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी अंकुश जगताप यांनी केली आहे. माहिती देऊनही महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी आलेच नाहीत. हिंजवडी विभागाचे अधिकारी कुलकर्णी प्रतिसाद देत नसल्यानं वेळ पडल्यास महावितरण विरोधात दावा दाखल करणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले आहे. मात्र अद्याप या ठिकाणी महावितरणचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी फिरकला नाही या आगीत बाळासाहेब भीमराव बुचडे यांच्या शेतातील लाकडं, ओंडके आणि राजू निवृत्ती बुचडे यांच्या घराजवळील कुरणातील चारा जळून नुकसान झाले आहे.

आग विजवाहिनीमुळे नाहीयाबाबत हिंजवडी विभागाचे सहाय्यक अभियंते डी. व्ही कुलकर्णी यांना विचारणा केली असता ते म्हणाले, हा प्रकार आमच्या विजवाहिनीमुळे होऊच शकत नाही. येथील विज वहिनी ४० वर्षांपूर्वी टाटाने टाकलेली मजबूत उच्च क्षमतेची असल्याने यातून शॉर्टसर्किट होऊ शकत नाही.

या ठिकाणी वारंवार विजगळती होत असते. याबाबत लोक तक्रारी करतात. शॉर्टसर्किट होत असल्याचा व्हिडीओ ही माझ्याकडे आहे मात्र याची तक्रार करताच तात्पुरती दुरुस्ती होते. पण जुन्या तारांमुळे ही समस्या कायम आहे. मागील वर्षीच आमची १० झाडे व विद्युत साहित्य जळून नुकसान झाले होते आणि आताही तोच प्रकार घडला. त्यामुळे महावितरणने रीतसर पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी.

- अंकुश जगताप, शेतकरी

टॅग्स :mahavitaranमहावितरणpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMIDCएमआयडीसीwakadवाकड