शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
3
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
4
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
5
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
6
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
7
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
8
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
9
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
10
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
11
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
12
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
13
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
14
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
15
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
16
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
17
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
18
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
19
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
20
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?

गुन्हेगारी कमी होणार - गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:27 AM

चिंचवड पोलीस आयुक्तालय स्वातंत्र्यदिनी कार्यान्वित झाले. नव्या आयुक्तालयाच्या आवारात पहिला ध्वजवंदनाचा कार्यक्रम पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाला.

पिंपरी - चिंचवड पोलीस आयुक्तालय स्वातंत्र्यदिनी कार्यान्वित झाले. नव्या आयुक्तालयाच्या आवारात पहिला ध्वजवंदनाचा कार्यक्रम पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाला. आयुक्तालयामुळे शहरातील गुन्हेगारी कमी होऊन कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे शक्य होईल, असा विश्वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला.चिंचवड येथील आॅटो क्लस्टरच्या आवारात सकाळी ११ वाजता ध्वजवंदन कार्यक़्रम घेण्यात आला. पालकमंत्री बापट पुढे म्हणाले, शहराला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय होणार असा शब्द दिला होता. तो शब्द पाळला आहे. पोलीस आयुक्तालय झाले आहे. मनुष्यबळ उपलब्ध होईल, अन्य सुविधांचीही पूर्तता होईल. आयुक्तालयासाठी मिळालेल्या प्रेमलोक पार्क येथील इमारतीचे नूतनीकरणाचे काम वेगात सुरू आहे. संपूर्ण काम होण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले आहे. आयुक्तालयाचे कामकाज काही दिवस आॅटो क्लस्टर येथून चालणार आहे.लवकरच पुरेसे मनुष्यबळ व आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातील. महापालिकेच्या वतीने योग्य त्या सोयी सुविधा उपलब्धकरून दिल्या जातील. त्यानंतर पूर्ण क्षमतेने पोलीस आयुक्तालयाचे कामकाज सुरू होईल, असे बापट यांनी नमूद केले.पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन म्हणाले, शहरात पोलिसांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांना तत्काळ मदत मिळू शकेल. गुन्हेगारीवर नियंत्रण आणणे शक्य होईल.संपर्क साधताच होणार पोलीस हजर : आयुक्त पद्मनाभन१पिंपरी : पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. त्यामुळे या शहराला आवश्यक तो पोलीस स्टाफ उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी मदतीसाठी पोलिसांपर्यंत जाण्यापेक्षा पोलीसच नागरिकांच्या मदतीला धावून जातील. बटन दाबा, पोलीस हजर अशा पद्धतीने नव्या पोलीस आयुक्तालयामार्फत कामकाज केले जाणार आहे. असा विश्वास पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी व्यक्त केला.२पत्रकारांशी संवाद साधताना, आयुक्त पद्मनाभन बोलत होते. औद्योगिकनगरीचे गुन्हेगारीत रूपांतर झाले असल्याचे बोलले जाते, अशा परिस्थितीत आपण या शहराच्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी नेमके काय करणार? या प्रश्नाला आयुक्त पद्मनाभन यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, स्वतंत्र पोलीस आयुक्त झाल्यामुळे अधिकचा स्टाफ उपलब्ध होणार आहे. स्वतंत्रपणे विविध विभागाचे काम चालणार आहे. पोलीस आयुक्तालयाचे कामकाज लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न राहील. जनता पोलिसांकडे नाही तर पोलीस जनतेकडे जातील, अशा पद्धतीने पोलीस आयुक्तालयाचे कामकाज केले जाणार आहे.३एखादी घटना घडते, त्यानंतर पाच मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी दखल घेतली तर जो परिणाम जाणवतो, तो परिणाम अर्धा तासाने दखल घेतल्यानंतर जाणवत नाही, आणखी काही तासांनी दखल घेतल्यानंतर वेगळाच परिणाम दिसून येतो. घटना एकच परंतु परिणाम वेगवेगळे दिसून येतात. त्यामुळे तत्काळ पोलिसांकडून दखल घेण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. चौका चौकांत पोलीस असतील, कायदा, सुव्यवस्थेच्या दक्षतेसाठी पोलीस कायम सज्ज आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा शहराची कायदा, सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी निश्चितच उपयोग होईल.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडgirish bapatगिरीष बापट