शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

खंडणीसाठी विमानाने आले... पोलिसांच्या मोटारीतून कोठडीत गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 01:52 IST

फेसबुकवरून कुटुंबाची माहिती मिळवून, त्याआधारे श्रीमंत कुटुंब असल्याची खात्री झाल्यानंतर ‘‘पाच लाख रुपये द्या, अन्यथा मुलीला पळवून नेऊन बरे वाईट करू ’’असे मुलीच्या आईला धमकावणाऱ्या दोन उच्चशिक्षित आरोपींना वाकड पोलिसांनी अत्यंत कौशल्याने पकडले.

पिंपरी - फेसबुकवरून कुटुंबाची माहिती मिळवून, त्याआधारे श्रीमंत कुटुंब असल्याची खात्री झाल्यानंतर ‘‘पाच लाख रुपये द्या, अन्यथा मुलीला पळवून नेऊन बरे वाईट करू ’’असे मुलीच्या आईला धमकावणाऱ्या दोन उच्चशिक्षित आरोपींना वाकड पोलिसांनी अत्यंत कौशल्याने पकडले. खंडणीची रक्कम नेण्यासाठी दिल्लीहून विमानाने पुण्यात आणि खासगी मोटार भाड्याने घेऊन काळेवाडी भागात आलेले दोन आरोपी पोलिसांनी जेरबंद केले. बीटेकपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या दोन खंडणीबहादरांना पोलिसांनी वेशांतर करून अत्यंत कौशल्याने पकडले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित विनोद यादव (वय २८, रा. दिल्ली) आणि अभिनव सतीश मिश्रा (वय २७, रा. दिल्ली) अशी आरोपींची नावे आहेत. वाकड परिसरात उच्चभ्रू सोसायटीत राहणाºया एका कुटुंबाची माहिती या आरोपींनी फेसबुकवरून मिळवली. या कुटुंबातील २१ वर्षांची मुलगी आयटी कंपनीत नोकरी करते. ती घरातून किती वाजता बाहेर पडते. किती वाजता कामावरून परत घरी येते. याबद्दलची माहिती मिळवली. शिक्षणासाठी काही वर्षे पुण्यात राहिले असल्याने त्या सोसायटीची माहिती त्यांनी मिळवली होती. त्या आधारे आरोपींनी मुलीच्या आईला १९ सप्टेंबरला मोबाइलवरून संपर्क साधला. त्यांच्या मुलीबद्दल सर्व माहिती असल्याचे सांगितले. या मुलीचे अपहरण करून बरे वाईट करू शकतो, अशी भीती दाखवून पाच लाखांच्या खंडणीची मागणी त्यांनी केली. या कुटुंबीयांना पाच लाख रुपये रक्कम मोठी नाही़ ते पोलिसांना कळविणार नाहीत. सहज आपले इप्सित साध्य होईल, असे त्यांना वाटले. उच्चशिक्षित आणि तांत्रिक ज्ञान असल्याने त्यांनी याबाबतचा तांत्रिक पुरावा राहू नये, याची काळजी घेतली होती.मुलीच्या आईशी संपर्क साधताना ते सार्वजनिक दूरध्वनी सेवेचा वापर करीत होते. १९ सप्टेंबरपासून ते २१ सप्टेंबरपर्यंत सातत्याने मुलीच्या आईकडून खंडणीची रक्कम मिळावी, यासाठी प्रयत्नशील होते. संबंधित महिलेने वाकड पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी व्यूहरचना आखली. खंडणीची रक्कम घेऊन येण्यासाठी आरोपी रेल्वे स्थानक अथवा विमानतळ येथे यावे, असा आग्रह धरीत होते. सार्वजनिक ठिकाणी आरोपींना ओळखणे आणि पकडणे कठीण असल्याने पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या माध्यमातून त्यांना काळेवाडी, वाकड परिसरात बोलावले. ते ज्या ठिकाणी येणार त्या ठिकाणी वेशांतर केलेल्या पोलिसांचे पथक तैनात होते.वेशांतर करून रचला सापळाखंडणीची रक्कम नेण्यासाठी येणाºया आरोपींना पकडण्यासाठी सहा अधिकारी आणि ४० पोलिसांचे खास पथक तयार केले होते. ज्या ठिकाणी आरोपी येणार त्या परिसरात हातगाडीजवळ फळविक्रेत्याची वेशभूषा केलेला एक पोलीस, पानटपरीजवळ साध्या वेशात थांबलेले काही पोलीस कर्मचारी, डॉक्टरची वेशभूषा केलेली महिला पोलीस कर्मचारी त्यांच्याबरोबर साध्या वेशातील काही पोलीस असलेली रुग्णवाहिका घेऊन आरोपींच्या प्रतीक्षेत पोलीस पथके तैनात होती. काळेवाडी फाटा येथील एका सोसायटीच्या आवारात खंडणीची रक्कम नेण्यासाठी आरोपी आले. अत्यंत सावधपणे ते तेथे वावरत होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटताच फळविक्रेत्याच्या वेशातील पोलीस कर्मचाºयाने त्यातील एकाला रिक्षात बसत असतानाच पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.फेसबुकवरील वैयक्तिक माहितीचा दुरूपयोगखंडणीची रक्कम नेण्यासाठी दिल्लीहून विमानाने आले असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी त्यांना अटक केली असून, असे आणखी काही प्रकार त्यांनी केले आहेत का? याची चौकशी केली जात असल्याचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. व्हॉटसअ‍ॅप, फेसबुकवर वैयक्तिक माहिती टाकल्यास त्याचा दुरूपयोग होऊ शकतो. सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती टाकण्याबाबतची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, असे आवाहन आयुक्त पद्मनाभन यांनी केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड