शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अपयश झाकण्यासाठी पोलिसांवर खापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 06:48 IST

कॉँग्रेसची टीका : सरकारच जबाबदार

पुणे : कोरेगाव भीमा प्रकरणात माजी खासदार प्रदीप रावत यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसच्या शहर शाखेने टीका केली आहे. रावत यांनी या प्रकरणात एका संस्थेने केलेल्या अहवालाचे प्रकाशन करताना पोलीसच याला जबाबदार असल्याचे म्हटले होते. काँग्रेसने त्याचा समाचार घेतला असून, सरकारचे अपयश झाकण्यासाठी पोलिसांना जबाबदार धरले जात असल्याचे म्हटले आहे.शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, ‘‘रावत यांचा शोध चुकीचा आहे. कोणत्या तथाकथित सत्यशोधन समितीचा अहवालही सरकारला वाचवण्यासाठीच केलेला आहे. पोलिसांची यात काहीच चूक नाही, हे खरे सत्य आहे. गुप्तचर खात्याने गृह खात्याला सर्व माहिती दिली होती.त्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी काळजी घेणे गरजेचे होते. पोलीस बंदोबस्त लावण्याची जबाबदारी गृह खात्याची होती. ती त्यांनी पाळली नाही. कार्यक्रमाला जमलेल्या आंबेडकरी अनुयायांवर जातीयवादी शक्तींनी हल्ला केला तो सरकारने गुप्तचर खात्याच्या अहवालाकडे डोळेझाक केली म्हणून हे यातील सत्य आहे व नेमके तेच लपवले जात आहे.पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांवर खापर फोडले जात आहे तेही जातीयवादी दृष्टिकोनातूनच, असा आरोप बागवे यांनी केली. अशा प्रकरणांना जातीय रंग देऊन राजकारण साधणे, हा भाजपाचा अजेंडाच आहे. त्यांना सरळ निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यामुळे नेहमीच ते जातीयवाद पसरवून भावनेचे राजकारण करतात. इतकी मोठी घटना घडूनही गृह खाते ताब्यात असलेल्या मुख्यमंत्र्यांना घटनास्थळी भेट द्यावी असे वाटले नाही, नक्की काय झाले याची माहिती घ्यावी वाटली नाही. मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्याची साधी माणुसकीही त्यांना दाखवता आलेली नाही, अशी टीका बागवे यांनी केली.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगाव