शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

coronavirus : वरसोली टोलनाक्यावरील पोलीस बंदोबस्तात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 19:55 IST

संचारबंदीनंतरही अनेक लाेक प्रवास करत असल्याने पाेलीस बंदाेबस्तात वाढ करण्यात आली आहे.

लोणावळा : कोरोना संसर्ग टाळण्याकरीता जमावबंदी व संचारबंदी लागू करुन देखील नागरिक घराबाहेर पडत असल्याने या नागरीकांना आळा घालण्यासोबत टोलनाक्यावरुन अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवांची वाहतुक वगळता सर्व प्रवासी वाहतूक बंद करण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्तामध्ये वाढ केली आहे. आता राज्य राखीव दलाची तुकडी टोलनाक्यावर तैनात करण्यात आली आहे. तेव्हा विनाकारण फिरणार्‍यांनो सावधान असे म्हणण्याची वेळ आली आहे.

कोरोना संसर्गचा वाढता प्रसार रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देशासह राज्यात संचारबंदी केली असून १४ एप्रिल पर्यंत भारत लाॅकडाऊन असणार आहे. लाॅकडाऊन असताना देखील शहरी भागातील कामगार हे रात्रीच्यावेळी खाजगी वाहनांमधून गावाकडे जात आहेत, काही जण पायीच गावी निघाले आहेत, अनेक स्थानिक युवक विनाकारण गाड्या घेऊन फिरत कायदा मोडत आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर राज्य राखीव दलाचे (सीआरपीएफ) शंभर जवान तैनात करण्यात आले असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक संदिप घोरपडे उपनिरीक्षक निरंजन रनावरे यांनी दिली. 

लोणावळा ग्रामीण हद्दीतील वरसोली टोल नाका, कार्ला फाटा, कुसगाव, औळकाईवाडी मुख्य चौक, पवनानगर चौक, मळवली चौक तसेच विविध गावातील प्रमुख ठिकाणी कोणीही विनापरवाना प्रवास करू नये वा संचारबंदीचे उल्लंघन करू नये ह्याच अनुशंघाने लोणावळा ग्रामीण पोलीस यांच्याकडून हे नियोजन करण्यात आले आहे. जर असे कोणी कायद्याचे उल्लंघन करत असणाऱ्याना दांडूक्याचा प्रसाद देखील दिला जात आहे.

विविध ठिकाणी असणाऱ्या अत्यावश्यक सेवा, किराणा दुकाने, भाजीपाला स्टाँल वर गर्दी होणार नाही याची काळजी देखील पोलिस प्रशासनाच्या वतीने घेतली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये आणि पोलिसांना सुरक्षेविषयी कठोर पाऊल उचलण्यास भाग पाडू नये. ह्यासाठी स्थानिक नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन स्थानिक नागरिकांना लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी  केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याlonavalaलोणावळा