शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

मानसिक आजाराबाबत एकत्रित पावले उचलावीत - डॉ. हमीद दाभोलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 03:14 IST

मानसिक आजारी व्यक्तींच्या पालकांनी एकत्रित येऊन पावले उचलण्याची गरज आहे. ‘मीच का?’ ऐवजी ‘मी का नाही?’ असा दृष्टिकोन ठेवल्यास सामाजिक चित्र बदलेल, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केले.

पुणे  - मानसिक आजारी व्यक्तींच्या पालकांनी एकत्रित येऊन पावले उचलण्याची गरज आहे. ‘मीच का?’ ऐवजी ‘मी का नाही?’ असा दृष्टिकोन ठेवल्यास सामाजिक चित्र बदलेल, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केले.स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशनचे (सा) अध्यक्ष अमृतकुमार बक्षीलिखित व कल्याणी गाडगीळ अनुवादित ‘मानसिक आजार : पालकांसाठी मार्गदर्शिका’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके आणि डॉ. विद्याधर वाटवे या वेळी उपस्थित होते. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर अध्यक्षस्थानी होते.मानसिक आजारांविषयी सामाजिक परिस्थिती सांगताना डॉ. दाभोलकर म्हणाले, ‘‘अंधश्रद्धेच्या पगड्यामुळे मानसिक आजारी व्यक्ती उपचारांपासून वंचित राहतात. त्यांना उपचार मिळण्यास उशीर होतो. अंधश्रद्धेची समस्या केवळ भारतातच नाही तर ती जागतिक आहे. त्यामुळेच मानसिक आजारांबाबत सर्वच देश विकसनशील आहेत.’’डॉ. लुकतुके म्हणाले, ‘‘ हे पुस्तक अतिशय समर्पक, संक्षिप्त व विश्वसनीय आहे. प्रत्येक पालकाने जरुर वाचावे.’’ डॉ. वाटवे म्हणाले, की पुस्तकातील सर्व माहिती विश्वसनीय आहे. मी स्वत: प्रत्येक पालकाला हे पुस्तक घेण्यास सांगेन.अध्यक्षीय भाषणात विजय बाविस्कर म्हणाले, ‘‘मानसिक आजाराविषयी जनजागृती होण्याची गरज आहे. यासाठी प्रसारमाध्यमांनी पुढाकार घ्यायला हवा.’’पुस्तकाच्या अनुवादिका कल्याणी गाडगीळ यांनीही या प्रसंगी पालकांच्या भावनिक व व्यावहारिक समस्या व्यक्त केल्या.‘सा’चे उपाध्यक्ष अनिल वर्तक, विश्वस्त व माजी अध्यक्ष यशवंत ओक, सहकारी मिलिंद भालेकर, याच पुस्तकाचा हिंदी अनुवाद करणाऱ्या प्रभा शेटे, मानसशास्त्रज्ञ अर्चना राठोड यांनीही या प्रसंगी पुस्तकाविषयी आपले अनुभव व विचार व्यक्त केले.‘सा’च्या खजिनदारस्मिता गोडसे यांनी स्वागत केले. केंद्रप्रमुख सारिका चांडक यांनी आभार मानले. कादंबरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.एका मुलीचा पालक म्हणून ज्या कठीण परिस्थितीतून गेलो, त्यातून मी खूप काही शिकलो. २५ वर्षांहूनही अधिक वर्षात मला मिळालेले अनुभव व ज्ञान मी ज्या पालकांपर्यंत पोहोचून त्यांच्या बरोबर वाटण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यांच्यापर्यंत या पुस्तकाद्वारे पोचण्याचा माझा प्रयत्न आहे. अज्ञानामुळे मी ज्या चुका केल्या, त्या टाळण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग होईल.- अमृतकुमार बक्षी, लेखक

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या