शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक आजाराबाबत एकत्रित पावले उचलावीत - डॉ. हमीद दाभोलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 03:14 IST

मानसिक आजारी व्यक्तींच्या पालकांनी एकत्रित येऊन पावले उचलण्याची गरज आहे. ‘मीच का?’ ऐवजी ‘मी का नाही?’ असा दृष्टिकोन ठेवल्यास सामाजिक चित्र बदलेल, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केले.

पुणे  - मानसिक आजारी व्यक्तींच्या पालकांनी एकत्रित येऊन पावले उचलण्याची गरज आहे. ‘मीच का?’ ऐवजी ‘मी का नाही?’ असा दृष्टिकोन ठेवल्यास सामाजिक चित्र बदलेल, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केले.स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशनचे (सा) अध्यक्ष अमृतकुमार बक्षीलिखित व कल्याणी गाडगीळ अनुवादित ‘मानसिक आजार : पालकांसाठी मार्गदर्शिका’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके आणि डॉ. विद्याधर वाटवे या वेळी उपस्थित होते. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर अध्यक्षस्थानी होते.मानसिक आजारांविषयी सामाजिक परिस्थिती सांगताना डॉ. दाभोलकर म्हणाले, ‘‘अंधश्रद्धेच्या पगड्यामुळे मानसिक आजारी व्यक्ती उपचारांपासून वंचित राहतात. त्यांना उपचार मिळण्यास उशीर होतो. अंधश्रद्धेची समस्या केवळ भारतातच नाही तर ती जागतिक आहे. त्यामुळेच मानसिक आजारांबाबत सर्वच देश विकसनशील आहेत.’’डॉ. लुकतुके म्हणाले, ‘‘ हे पुस्तक अतिशय समर्पक, संक्षिप्त व विश्वसनीय आहे. प्रत्येक पालकाने जरुर वाचावे.’’ डॉ. वाटवे म्हणाले, की पुस्तकातील सर्व माहिती विश्वसनीय आहे. मी स्वत: प्रत्येक पालकाला हे पुस्तक घेण्यास सांगेन.अध्यक्षीय भाषणात विजय बाविस्कर म्हणाले, ‘‘मानसिक आजाराविषयी जनजागृती होण्याची गरज आहे. यासाठी प्रसारमाध्यमांनी पुढाकार घ्यायला हवा.’’पुस्तकाच्या अनुवादिका कल्याणी गाडगीळ यांनीही या प्रसंगी पालकांच्या भावनिक व व्यावहारिक समस्या व्यक्त केल्या.‘सा’चे उपाध्यक्ष अनिल वर्तक, विश्वस्त व माजी अध्यक्ष यशवंत ओक, सहकारी मिलिंद भालेकर, याच पुस्तकाचा हिंदी अनुवाद करणाऱ्या प्रभा शेटे, मानसशास्त्रज्ञ अर्चना राठोड यांनीही या प्रसंगी पुस्तकाविषयी आपले अनुभव व विचार व्यक्त केले.‘सा’च्या खजिनदारस्मिता गोडसे यांनी स्वागत केले. केंद्रप्रमुख सारिका चांडक यांनी आभार मानले. कादंबरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.एका मुलीचा पालक म्हणून ज्या कठीण परिस्थितीतून गेलो, त्यातून मी खूप काही शिकलो. २५ वर्षांहूनही अधिक वर्षात मला मिळालेले अनुभव व ज्ञान मी ज्या पालकांपर्यंत पोहोचून त्यांच्या बरोबर वाटण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यांच्यापर्यंत या पुस्तकाद्वारे पोचण्याचा माझा प्रयत्न आहे. अज्ञानामुळे मी ज्या चुका केल्या, त्या टाळण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग होईल.- अमृतकुमार बक्षी, लेखक

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या