शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
6
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
7
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
8
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
9
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
10
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
11
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
12
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
13
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
14
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
15
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
16
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
17
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
18
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
20
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले

नारळ पाणी झाले स्वस्त..!, नागरिकांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 1:30 AM

सध्या बंद बाटलीतील पाणी पिणे हे फ्याड झाल्याचे दिसून येत आहे़ एखादा व्यक्ती घरात नळाचे पाणी पिण्यासाठी वापरतो मात्र घराबाहेर पडले की पहिली पसंती ही बंद बाटलीतील पाण्यालाच दिली जात असल्याचे चित्र सध्यातरी सर्वत्र दिसून येत आहे.

रहाटणी : सध्या बंद बाटलीतील पाणी पिणे हे फ्याड झाल्याचे दिसून येत आहे़ एखादा व्यक्ती घरात नळाचे पाणी पिण्यासाठी वापरतो मात्र घराबाहेर पडले की पहिली पसंती ही बंद बाटलीतील पाण्यालाच दिली जात असल्याचे चित्र सध्यातरी सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळे एका लिटर पाण्याच्या बाटलीची किंमत दिवसेंदिवस वाढतच आहे.या बाटली बंद पाण्यापेक्षा सध्या नारळाचे पाणी स्वस्त झाले आहे़ त्यामुळे शुद्ध पिण्याच्या पाण्याची बाटली विकत घेण्याच्या गरजेला व फॅशनला आता नारळ पाण्याने छेद दिला आहे. शहरात दररोज हजारो नारळपाण्याची विक्री होत असून, पिण्याच्या पाण्याची बाटली खरेदी करण्याऐवजी ग्राहक नारळपाणी घेण्यास पसंती देत आहेत.बाटलीबंद पाणी २० ते २५ रुपयांना विकले जात असताना नारळ पाणी मात्र अगदी १५ रुपयांपासून उपलब्ध झाल्याने नागरिकांचा कल त्याकडे वाढला आहे. सध्या शहरात रस्त्याच्या कडेला नारळाचे ढिगचेढिग दिसून येत आहेत़ २० रुपयाला एक, ५० रुपयाला तीन अशी नारळाची विक्री सुरू असल्याने नागरिकांचा कल थंड पाण्याच्या बाटलीपेक्षा नारळ पाण्याकडे वाढत आहे.राज्या बाहेरून नारळाची आवक मोठ्या प्रमाणात पिंपरी-चिंचवड शहरात होत आहे. दररोज सकाळी काळेवाडी परिसरात एक ते दोन ट्रक येतात. एका ट्रकमध्ये किमान आठ ते दहा हजार नारळ येत असतात व त्यासाठी वाहतूक खर्च तीस ते चाळीस हजार रुपये येत असल्याची माहिती ठोक विक्रेत्यांनी दिली. शहरातील अनेक भागात रस्त्याच्या कडेला दुकाने थाटून या नारळपाण्याची विक्री चालू आहे.तसेच काही हातगाड्यांवरही शहराच्या अंतर्गत भागात फिरून नारळपाण्याची विक्री केली जाते. फक्त पाण्याचे नारळ, पाणी व खोबºयाचा गर असलेले नारळ असे विविध प्रकारची नारळे विक्री होत आहेत. एक ते दोन ग्लास पाणी, मलई युक्त नारळ यातून मिळत असल्यामुळे नागरिक तहान भागविण्यासाठी नारळपाणी घेत आहेत.नारळ पाणी आरोग्यासाठी चांगले असते यामुळे शक्ती वाढते. तसेच उन्हात थंडावा मिळतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.रुग्णाला संजीवनी म्हणून व शारीरिक स्वास्थ्यासाठी नारळ पाण्यास पसंती दिली जाते. परंतु, आता टंचाईच्या काळात महागलेल्या बाटलीबंद पाण्याला पर्याय म्हणून लोक नारळपाण्याकडे पाहत आहेत. प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी, त्याची चव व त्याची गुणवत्ता याचे अनेक अनुभव गाठीशी असणारे ग्राहक शुद्धता, चव आणि नैसर्गिक शक्ती म्हणून नारळपाण्यास पसंती देत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड