शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

नियोजनशून्यतेमुळे शहराचे नुकसान; विरोधी पक्षनेत्यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 01:42 IST

प्रशासनाच्या निष्क्रियतेचा बसला फटका

पिंपरी : स्वच्छतेबाबत बेस्ट सिटी पुरस्कार राष्ट्रवादीच्या कार्यकाळात मिळाला होता. परंतु भाजपाची दीड वर्षापूर्वी सत्ता आली. स्वच्छतेत शहर महाराष्ट्रात नंबर वन आणि देशात नवव्या क्रमांकावर असणारे शहर स्वच्छतेबाबत ४३ नंबरवर गेले. राहण्यायोग्य शहरांच्या यादीत ६९व्या क्रमांकावर गेले. स्वच्छता अभियानाच्या फक्त जाहिरातीच सुरू आहेत. भाजपाचा कारभार नियोजनशून्य असून, प्रशासनामुळेच अपयश आले आहे. फक्त मलई खाण्यावर लक्ष असून कचऱ्याच्या कामांच्या निविदा निघू शकल्या नाहीत, असा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे.राहण्यायोग्य शहरांचे निकाल जाहीर झाले. त्यात महापालिकेची क्षमता आणि गुणवत्ता असताना प्रशासनाच्या निष्क्रियतेचा फटका शहरास बसला आहे. विरोधी पक्षनेते साने म्हणाले, ‘‘शहरावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष होते. शहराचा विकास हा भविष्यातील ३० वर्षे डोळ्यासमोर ठेवून केला आहे. शहरातील स्वच्छतेवर जास्त लक्ष देऊन शहराचा चेहरा-मोहरा बदलला. त्यामुळे शहराला बेस्ट सिटी पुरस्कार मिळाला. मात्र, भाजपाची सत्ता येऊन दीड वर्ष झाले, अद्याप कचºयावरची निविदा काढता आली नाही. महानगरपालिका कामगार कायद्यानुसार त्यांना वेतन देते. परंतु ठेकेदार कामगाराचे एटीएम कार्ड व पासबुक स्वत:कडे ठेवून महिन्याला सात ते आठ हजारांवर त्यांची बोळवण करते. कामगाराचा भविष्यनिर्वाह निधीही भरला जात नाही. एखादा दिवस कामगार कामावर गेला नाही, तर भरमसाट दंड करून वेतनातून तो कपात केला जातो. त्यांना सुरक्षिततेची साधने, बूट, ग्लोव्हज् हे वेळेवर पुरविले जात नाही, पुरविले तरी त्याचे पैसे वेतनातून कपात केले जातात. महिला कामगार महापालिका भवनासमोर आंदोलन करीत आहेत.राहण्यायोग्य शहर असताना पहिल्या दहा तर सोडाच, सत्तरावा क्रमांक आला. सल्लागार पोसण्याचे काम महापालिका प्रशासन करीत आहेत.’’साने म्हणाले, ‘‘हे सर्व ठेकेदार भाजपाच्या पदाधिकाºयांचेच बगलबच्चे आहेत. त्यामुळे त्यांचे धाडस वाढले आहे. सफाई कामगारांनी आंदोलन केले, तरी ते मोडीत काढले जाते. वेस्ट टू एनर्जी प्रकल्प मंजूर केला आहे. तोही मलई खाण्यासाठी शहरात ठिकठिकाणी कचरा वेळेवर उचलला जात नसल्यामुळे साथीच्या रोगाने नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरात कचºयाच्या समस्येने रौद्ररूप धारण केले आहे. त्यामुळे रोगराईचे संकट डोके वर काढत आहे, तर भाजपाचे पदाधिकारी गुणांकात कमी पडल्यामुळे आपण ४३ नंबरवर असल्याचे सांगत असले, तरी कचºयाची समस्या मोठी आहे. राहण्यायोग्य शहर असताना पहिल्या दहा तर सोडाच, सत्तरावा क्रमांक आला. सल्लागार पोसण्याचे काम महापालिका प्रशासन करीत आहेत.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड