शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनशून्यतेमुळे शहराचे नुकसान; विरोधी पक्षनेत्यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 01:42 IST

प्रशासनाच्या निष्क्रियतेचा बसला फटका

पिंपरी : स्वच्छतेबाबत बेस्ट सिटी पुरस्कार राष्ट्रवादीच्या कार्यकाळात मिळाला होता. परंतु भाजपाची दीड वर्षापूर्वी सत्ता आली. स्वच्छतेत शहर महाराष्ट्रात नंबर वन आणि देशात नवव्या क्रमांकावर असणारे शहर स्वच्छतेबाबत ४३ नंबरवर गेले. राहण्यायोग्य शहरांच्या यादीत ६९व्या क्रमांकावर गेले. स्वच्छता अभियानाच्या फक्त जाहिरातीच सुरू आहेत. भाजपाचा कारभार नियोजनशून्य असून, प्रशासनामुळेच अपयश आले आहे. फक्त मलई खाण्यावर लक्ष असून कचऱ्याच्या कामांच्या निविदा निघू शकल्या नाहीत, असा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे.राहण्यायोग्य शहरांचे निकाल जाहीर झाले. त्यात महापालिकेची क्षमता आणि गुणवत्ता असताना प्रशासनाच्या निष्क्रियतेचा फटका शहरास बसला आहे. विरोधी पक्षनेते साने म्हणाले, ‘‘शहरावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष होते. शहराचा विकास हा भविष्यातील ३० वर्षे डोळ्यासमोर ठेवून केला आहे. शहरातील स्वच्छतेवर जास्त लक्ष देऊन शहराचा चेहरा-मोहरा बदलला. त्यामुळे शहराला बेस्ट सिटी पुरस्कार मिळाला. मात्र, भाजपाची सत्ता येऊन दीड वर्ष झाले, अद्याप कचºयावरची निविदा काढता आली नाही. महानगरपालिका कामगार कायद्यानुसार त्यांना वेतन देते. परंतु ठेकेदार कामगाराचे एटीएम कार्ड व पासबुक स्वत:कडे ठेवून महिन्याला सात ते आठ हजारांवर त्यांची बोळवण करते. कामगाराचा भविष्यनिर्वाह निधीही भरला जात नाही. एखादा दिवस कामगार कामावर गेला नाही, तर भरमसाट दंड करून वेतनातून तो कपात केला जातो. त्यांना सुरक्षिततेची साधने, बूट, ग्लोव्हज् हे वेळेवर पुरविले जात नाही, पुरविले तरी त्याचे पैसे वेतनातून कपात केले जातात. महिला कामगार महापालिका भवनासमोर आंदोलन करीत आहेत.राहण्यायोग्य शहर असताना पहिल्या दहा तर सोडाच, सत्तरावा क्रमांक आला. सल्लागार पोसण्याचे काम महापालिका प्रशासन करीत आहेत.’’साने म्हणाले, ‘‘हे सर्व ठेकेदार भाजपाच्या पदाधिकाºयांचेच बगलबच्चे आहेत. त्यामुळे त्यांचे धाडस वाढले आहे. सफाई कामगारांनी आंदोलन केले, तरी ते मोडीत काढले जाते. वेस्ट टू एनर्जी प्रकल्प मंजूर केला आहे. तोही मलई खाण्यासाठी शहरात ठिकठिकाणी कचरा वेळेवर उचलला जात नसल्यामुळे साथीच्या रोगाने नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरात कचºयाच्या समस्येने रौद्ररूप धारण केले आहे. त्यामुळे रोगराईचे संकट डोके वर काढत आहे, तर भाजपाचे पदाधिकारी गुणांकात कमी पडल्यामुळे आपण ४३ नंबरवर असल्याचे सांगत असले, तरी कचºयाची समस्या मोठी आहे. राहण्यायोग्य शहर असताना पहिल्या दहा तर सोडाच, सत्तरावा क्रमांक आला. सल्लागार पोसण्याचे काम महापालिका प्रशासन करीत आहेत.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड