शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

नागरिकांना कीव; पण प्रशासन निगरगठ्ठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 02:12 IST

देहू-आळंदी रस्त्यावरील खड्डे ग्रामस्थांनी बुजविले; अधिकाऱ्यांची मात्र डोळेझाक

देहूगाव : अपघातस्थळ आणि मृत्यूचा सापळा बनलेल्या देहू-आळंदी रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम अखेर ग्रामस्थांच्या श्रमदान व आर्थिक सहकार्यातून झाले. मात्र, ग्रामपंचायत प्रशासन व पिंपरी-चिंचवड महापालिकेने डोळेझाक केल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.पालखी प्रस्थानापूर्वी दोन दिवस अगोदर बुजविण्यात आलेले खड्डे पावसामुळे पुन्हा अवघ्या काही दिवसांतच उखडल्याने मृत्यूचा सापळा व अपघातस्थळ बनलेला आहे. या रस्त्याने नियमित येणाºया वाहनचालकांना वाहन जीव मुठीत धरून चालवावे लागत होते. ग्रामपंचायतीने हा रस्ता पिंपरी- चिंचवड महापालिकेकडे वर्ग केला असल्याने या रस्त्यावर त्यांना खर्च करणे प्रशासकीय दृष्ट्या अडचणीने असल्याचे सांगत रस्त्याचे खड्डे बुजविणे टाळले जात आहे. तर पिंपरी-चिंचवड पालिकेने देखील हा रस्ता वारंवार दुरुस्त केला आहे. या रस्त्याची खरी अडचण आहे, ती या राज्य महामार्गाचा दर्जा असलेल्या रस्त्याची दुरुस्ती-देखभाल खर्च किती करायचा, रस्त्यासाठी पालिकेने निधीही मंजूर केला आहे. मात्र, तो खर्च करण्याचे टाळत असल्याचे लक्षात येत आहे. याशिवाय या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न भूसंपादनामुळे भिजत पडलेला आहे. यासाठी सक्षम अधिकारी आवश्यक आहे. येथील शेतकरी रस्ता करण्यास सहकार्य करीत आहेत. मात्र कोणाच्या तरी चुकीच्या मार्गदर्शनाखाली किंवा सांगण्यावरून ते अधिकारी टाळाटाळ करीत असल्याची दबक्या आवाजात गावात चर्चा आहे. तर गावातील पदाधिकारी कामाचे श्रेय घेण्यासाठीच केवळ पत्रव्यवहाराचा खटाटोप करीत असल्याचीही चर्चा आहे.तरुणांनी केले श्रमदानप्रशासनाच्या असहकाराला कंटाळून गावातील काही तरुणांनी एकत्र येऊन सक्षम लोकांच्या सहकार्यातून आपणच रस्त्याचे खड्डे बुजवायचे असा निर्णय झाला. यानुसार सकाळपासून देहूगाव शिवसेनाप्रमुख सुनील हगवणे, श्री संत तुकाराममहाराज संस्थानाचे विश्वस्त अभिजित मोरे, शांताराम हगवणे यांनी वीटभट्टीचे रॅबिट व विटांचा चुरा रस्त्यावर टाकून त्याला समतल करण्याचे काम सुरू करण्यात आले. महेश मोरे, रामकुमार आगरवाल यांच्यासह काही तरुणांनी श्रमदान केले.

टॅग्स :dehuroadदेहूरोडPotholeखड्डेroad transportरस्ते वाहतूक