शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

आयटीनगरीत असूनही नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित; सत्तेतील कारभा-यांचा विरोध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 05:22 IST

हिंजवडीमध्ये आयटी पार्क सुुरु झाल्यानंतर येथील विकासाला चालना मिळाली. मात्र, केवळ आयटी कंपन्यांच्या परिसराचा विकास झाला, तरी ग्रामस्थ अजूनही रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापन या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.

वाकड : हिंजवडीमध्ये आयटी पार्क सुुरु झाल्यानंतर येथील विकासाला चालना मिळाली. मात्र, केवळ आयटी कंपन्यांच्या परिसराचा विकास झाला, तरी ग्रामस्थ अजूनही रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापन या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. मात्र, महापालिकेची नियमावली, मिळकतकर आकारणी, वाढती पाणीपट्टी या विषयीची भीती ग्रामस्थांना असल्याने समावेशाविषयी त्यांची संभ्रमावस्था आहे.युती सरकारच्या काळात १९९५ ला हिंजवडी परिसरात आयटी पार्क वसविण्याची घोषणा झाली. मात्र या आयटी पार्कला १९९९-२००० मध्ये चालना मिळाली. ही जमेची बाजू आहे; मात्र गाव महापालिकेत समाविष्ट न झाल्यास विकासाला खो बसून बकालपणा अधिक वाढणार आहे. त्यामुळे हिंजवडीचा पालिका हद्दीत समावेश झाल्यास नियोजनबद्ध विकासाला चालना मिळेल, असे मत जाणकारांनी व्यक्त केले.हिंजवडी आणि परिसरात आयटी पार्कचा विस्तार झाल्यानंतर देशाच्या कानाकोपºयातून रोजगारासाठी लाखोंच्या संख्येने लोक येथे दाखल झाले आहेत. ८३३ हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या हिंजवडी गावाची मागील जनगणनेनुसार ११,४५९ लोकसंख्या आहे; प्रत्यक्षात ५० हजारांहून अधिक येथील लोकसंख्या आहे. एका बाजूला भव्य-दिव्य, पंचतारांकित कंपन्यांचा झगमगाट असा आयटी पार्क आणि दुसºया बाजूलासर्वत्र अनधिकृत बांधकामांनी वेढल्याने गावाला आलेले बकालपण या दोन बाजू अशी सद्य:स्थिती हिंजवडीची आहे.गाव महापालिकेत समाविष्ट झाल्यास सुविधा होतील, हे जरी खरे असले, तरी आमची ग्रामपंचायत देखील नागरी सुविधा पुरविण्यास सक्षम आहे. यापूर्वी समाविष्ट केलेल्या गावांचा महापालिकेने विकास साधला नाही. त्यामुळे नागरिकांत नकारात्मकता आहे. महापालिका हद्दीत समावेश करण्याऐवजी हिंजवडी-माण व अन्य गावे मिळून स्वतंत्र नगरपालिकेची स्थापना करावी.- रोहिणी साखरे, माजी सरपंच, हिंजवडीहिंजवडी गावाची लोकसंख्या वाढतच राहणार आहे. त्यामुळे गावाचा महापालिका हद्दीत समावेश होणार ही स्वागतार्ह बाब आहे. गाव समाविष्ट झाल्यास सर्व समस्या सुटून चांगल्या नागरी सुविधा पुरविल्या जातील. सेवा, सुविधाही मिळतील. विकास आराखड्यानुसार गावात सर्व सुखसुविधा मिळतील. त्यामुळे गावाचा महापालिका हद्दीत समावेश गरजेचा आहे.- राहुल जांभूळकर, माजी उपसरपंच, हिंजवडीवस्तुस्थिती नाकारता येत नाही. विकास होण्यासाठी महापालिकेची आवश्यकताच आहे. त्यामुळे महापालिकेने ही गावे समाविष्ट करावीत; मात्र गाव समाविष्ट करून विकास आराखड्याची त्वरित अंमलबजावणी करता येत नसेल, तर पाच गावे मिळून स्वतंत्र नगरपालिकेला मान्यता द्यावी. जेणेकरून स्वतंत्ररित्या राज्य व केंद्र शासनाच्या मदतीने सर्वांगीण विकास साधता येईल. महापालिकेतील समावेशामुळे अनेक समस्या सुटतील आणि विकास होईल. - श्याम हुलावळे,माजी सरपंच, हिंजवडी

टॅग्स :ITमाहिती तंत्रज्ञानpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड