शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

आयटीनगरीत असूनही नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित; सत्तेतील कारभा-यांचा विरोध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 05:22 IST

हिंजवडीमध्ये आयटी पार्क सुुरु झाल्यानंतर येथील विकासाला चालना मिळाली. मात्र, केवळ आयटी कंपन्यांच्या परिसराचा विकास झाला, तरी ग्रामस्थ अजूनही रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापन या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.

वाकड : हिंजवडीमध्ये आयटी पार्क सुुरु झाल्यानंतर येथील विकासाला चालना मिळाली. मात्र, केवळ आयटी कंपन्यांच्या परिसराचा विकास झाला, तरी ग्रामस्थ अजूनही रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापन या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. मात्र, महापालिकेची नियमावली, मिळकतकर आकारणी, वाढती पाणीपट्टी या विषयीची भीती ग्रामस्थांना असल्याने समावेशाविषयी त्यांची संभ्रमावस्था आहे.युती सरकारच्या काळात १९९५ ला हिंजवडी परिसरात आयटी पार्क वसविण्याची घोषणा झाली. मात्र या आयटी पार्कला १९९९-२००० मध्ये चालना मिळाली. ही जमेची बाजू आहे; मात्र गाव महापालिकेत समाविष्ट न झाल्यास विकासाला खो बसून बकालपणा अधिक वाढणार आहे. त्यामुळे हिंजवडीचा पालिका हद्दीत समावेश झाल्यास नियोजनबद्ध विकासाला चालना मिळेल, असे मत जाणकारांनी व्यक्त केले.हिंजवडी आणि परिसरात आयटी पार्कचा विस्तार झाल्यानंतर देशाच्या कानाकोपºयातून रोजगारासाठी लाखोंच्या संख्येने लोक येथे दाखल झाले आहेत. ८३३ हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या हिंजवडी गावाची मागील जनगणनेनुसार ११,४५९ लोकसंख्या आहे; प्रत्यक्षात ५० हजारांहून अधिक येथील लोकसंख्या आहे. एका बाजूला भव्य-दिव्य, पंचतारांकित कंपन्यांचा झगमगाट असा आयटी पार्क आणि दुसºया बाजूलासर्वत्र अनधिकृत बांधकामांनी वेढल्याने गावाला आलेले बकालपण या दोन बाजू अशी सद्य:स्थिती हिंजवडीची आहे.गाव महापालिकेत समाविष्ट झाल्यास सुविधा होतील, हे जरी खरे असले, तरी आमची ग्रामपंचायत देखील नागरी सुविधा पुरविण्यास सक्षम आहे. यापूर्वी समाविष्ट केलेल्या गावांचा महापालिकेने विकास साधला नाही. त्यामुळे नागरिकांत नकारात्मकता आहे. महापालिका हद्दीत समावेश करण्याऐवजी हिंजवडी-माण व अन्य गावे मिळून स्वतंत्र नगरपालिकेची स्थापना करावी.- रोहिणी साखरे, माजी सरपंच, हिंजवडीहिंजवडी गावाची लोकसंख्या वाढतच राहणार आहे. त्यामुळे गावाचा महापालिका हद्दीत समावेश होणार ही स्वागतार्ह बाब आहे. गाव समाविष्ट झाल्यास सर्व समस्या सुटून चांगल्या नागरी सुविधा पुरविल्या जातील. सेवा, सुविधाही मिळतील. विकास आराखड्यानुसार गावात सर्व सुखसुविधा मिळतील. त्यामुळे गावाचा महापालिका हद्दीत समावेश गरजेचा आहे.- राहुल जांभूळकर, माजी उपसरपंच, हिंजवडीवस्तुस्थिती नाकारता येत नाही. विकास होण्यासाठी महापालिकेची आवश्यकताच आहे. त्यामुळे महापालिकेने ही गावे समाविष्ट करावीत; मात्र गाव समाविष्ट करून विकास आराखड्याची त्वरित अंमलबजावणी करता येत नसेल, तर पाच गावे मिळून स्वतंत्र नगरपालिकेला मान्यता द्यावी. जेणेकरून स्वतंत्ररित्या राज्य व केंद्र शासनाच्या मदतीने सर्वांगीण विकास साधता येईल. महापालिकेतील समावेशामुळे अनेक समस्या सुटतील आणि विकास होईल. - श्याम हुलावळे,माजी सरपंच, हिंजवडी

टॅग्स :ITमाहिती तंत्रज्ञानpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड