शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

विद्यार्थ्यांच्या पाठी दप्तराचे ओझे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 02:05 IST

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मुलांच्या दप्तराच्या कमाल वजनाची मर्यादा घालून दिली आहे.

- प्रकाश गायकर पिंपरी : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मुलांच्या दप्तराच्या कमाल वजनाची मर्यादा घालून दिली आहे. मात्र पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ‘लोकमत’ प्रतिनिधींनी केलेल्या पाहणीमध्ये मुलांच्या दप्तराच्या वजनाची मोजणी केली असता धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुलांच्या दप्तराविषयी घालून दिलेल्या निर्देशांची पायमल्ली होताना दिसत आहे.शाळकरी अन् चिमुकल्या मुलांना दप्तराचे ओझे जास्त लादू नका, असे निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिले आहेत. असे असतानाही शहरातील विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचे ओझे असल्याचे पाहणीदरम्यान आढळून आले. अनेक लहान बालके भल्यामोठ्या स्कूलबॅग आपल्या खांद्यावर घेऊन जाताना दिसले. जोडीला वॉटरबॅग आणि टिफिनबॅग असल्याने दप्तर सांभाळावे की या बॅग सांभाळाव्यात, अशी अवस्था विद्यार्थ्यांची होताना दिसत आहे. अनेक मुलांचे पालक हे ओझे आपल्या खांद्यावर वाहून मुलांना गाडीजवळ सोडत असल्याचे पाहायला मिळाले. शालेय वयातच मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा सुरू आहेत. पालकही माझाच मुलगा कसा पुढे जाईल, या दृष्टीने मुलांना शाळेत, खासगी शिकवणीमध्ये पाठवतात. शिक्षणाच्या या जीवघेण्यास्पर्धेमध्ये शाळा व इतर खासगी शिकवणीचा भार वाहताना मुले जगणे हरवून बसली आहेत.मुलांच्या दप्तराच्या वजनाबाबत पालकांमधूनही नाराजी व्यक्त होत आहे. पालकांशी याबाबत चर्चा केली असता अनेक पालकांनी याबाबत शाळांना जबाबदार धरले आहे. एका विषयासाठी तीन वह्या, तसेच वर्क बुक यांचीही संख्या जास्त असल्याने दप्तराचे ओझे वाढत असल्याचे पालकांनी सांगितले.>इयत्तेनुसार दप्तराचे ओझेपहिलीतील एका मुलीच्या पाठीवर तब्बल ३ किलो ३२ ग्रॅम वजनाचे दप्तर आढळून आले.तिसरीतील विद्यार्थ्याचे ४ किलो वजनाचे दप्तर होते.पाचवीच्या विद्यार्थ्याच्या पाठीवर ४ किलो २६४ ग्रॅम इतके वजन आढळले.सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्याच्या दप्तराचे वजन केले असता ते ५ किलो भरले.दहावीच्या विद्यार्थ्याच्या दप्तराचे ओझे तब्बल ८ किलो ५५० किलोग्रॅम असल्याचे समोर आले.>विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्यामुळे त्यांना पाठदुखी, खांदेदुखीचा त्रास होत असल्याचे पालकांनी सांगितले. तसेच मुलांचे स्नायूही दुखतात. मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे असेच जास्त प्रमाणात राहिले, तर भविष्यामध्ये मुलांना मोठ्या आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागेल. वजनदार दप्तर घेऊन मुलांना जास्त प्रवास करावा लागत असेल तर, त्यांच्या मणक्यांना त्रास होऊ शकतो. तसेच पाठीला बाक निघण्याची शक्यता असते.- डॉ. के. अनिल रॉय, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका