शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

विद्यार्थ्यांच्या पाठी दप्तराचे ओझे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 02:05 IST

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मुलांच्या दप्तराच्या कमाल वजनाची मर्यादा घालून दिली आहे.

- प्रकाश गायकर पिंपरी : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मुलांच्या दप्तराच्या कमाल वजनाची मर्यादा घालून दिली आहे. मात्र पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ‘लोकमत’ प्रतिनिधींनी केलेल्या पाहणीमध्ये मुलांच्या दप्तराच्या वजनाची मोजणी केली असता धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुलांच्या दप्तराविषयी घालून दिलेल्या निर्देशांची पायमल्ली होताना दिसत आहे.शाळकरी अन् चिमुकल्या मुलांना दप्तराचे ओझे जास्त लादू नका, असे निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिले आहेत. असे असतानाही शहरातील विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचे ओझे असल्याचे पाहणीदरम्यान आढळून आले. अनेक लहान बालके भल्यामोठ्या स्कूलबॅग आपल्या खांद्यावर घेऊन जाताना दिसले. जोडीला वॉटरबॅग आणि टिफिनबॅग असल्याने दप्तर सांभाळावे की या बॅग सांभाळाव्यात, अशी अवस्था विद्यार्थ्यांची होताना दिसत आहे. अनेक मुलांचे पालक हे ओझे आपल्या खांद्यावर वाहून मुलांना गाडीजवळ सोडत असल्याचे पाहायला मिळाले. शालेय वयातच मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा सुरू आहेत. पालकही माझाच मुलगा कसा पुढे जाईल, या दृष्टीने मुलांना शाळेत, खासगी शिकवणीमध्ये पाठवतात. शिक्षणाच्या या जीवघेण्यास्पर्धेमध्ये शाळा व इतर खासगी शिकवणीचा भार वाहताना मुले जगणे हरवून बसली आहेत.मुलांच्या दप्तराच्या वजनाबाबत पालकांमधूनही नाराजी व्यक्त होत आहे. पालकांशी याबाबत चर्चा केली असता अनेक पालकांनी याबाबत शाळांना जबाबदार धरले आहे. एका विषयासाठी तीन वह्या, तसेच वर्क बुक यांचीही संख्या जास्त असल्याने दप्तराचे ओझे वाढत असल्याचे पालकांनी सांगितले.>इयत्तेनुसार दप्तराचे ओझेपहिलीतील एका मुलीच्या पाठीवर तब्बल ३ किलो ३२ ग्रॅम वजनाचे दप्तर आढळून आले.तिसरीतील विद्यार्थ्याचे ४ किलो वजनाचे दप्तर होते.पाचवीच्या विद्यार्थ्याच्या पाठीवर ४ किलो २६४ ग्रॅम इतके वजन आढळले.सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्याच्या दप्तराचे वजन केले असता ते ५ किलो भरले.दहावीच्या विद्यार्थ्याच्या दप्तराचे ओझे तब्बल ८ किलो ५५० किलोग्रॅम असल्याचे समोर आले.>विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्यामुळे त्यांना पाठदुखी, खांदेदुखीचा त्रास होत असल्याचे पालकांनी सांगितले. तसेच मुलांचे स्नायूही दुखतात. मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे असेच जास्त प्रमाणात राहिले, तर भविष्यामध्ये मुलांना मोठ्या आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागेल. वजनदार दप्तर घेऊन मुलांना जास्त प्रवास करावा लागत असेल तर, त्यांच्या मणक्यांना त्रास होऊ शकतो. तसेच पाठीला बाक निघण्याची शक्यता असते.- डॉ. के. अनिल रॉय, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका