शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2019: शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 02:12 IST

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करणार, दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये अशा घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र शेती जोडधंदा, खत व हमीभाव यावर काहीच नियोजन नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडलेली असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी घोषणांचा वर्षाव अर्थसंकल्पामध्ये करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करणार, दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये अशा घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र शेती जोडधंदा, खत व हमीभाव यावर काहीच नियोजन नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडलेली असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.शेतकऱ्यांच्या दृष्टीने निराशाजनक असा हा अर्थसंकल्प आहे. कारण शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्याचे यामध्ये सांगितले आहे. मात्र संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत एका व्यक्तीला दरमहा सहाशे रुपये दिले जातात. आणि या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी कुटुंबाला दरमहा पाचशे रुपये दिले जाणार. याचा अर्थ ही शेतकऱ्यांची थेट फसवणूक आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पामधूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. निवडणूका डोळ्यासमोर ठेवून जाहीर केलेला हा अर्थसंकल्प आहे.- हरिश मोरे, कार्याध्यक्ष,शेतकरी कामगार संघटनाअर्थसंकल्पातील किसान सन्मान निधीचाही शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल, पण महागाईचा जमान्यात हेक्टरी सहा हजार म्हणजे तुंटपुंजी मदत आहे ती वाढवायला हवी, पशुधन व मस्त्यव्यवसायासाठी शेतकरी घेत असलेल्या कर्जावर दोन टक्के सवलत शेतकऱ्यांना आधार देण्यासारखी आहे, यामुळे तरूण शेतीकडे वळण्याबरोबर जोड धंदा म्हणून हा व्यवसाय करण्याचा विचार करू शकतात. - सुनिल गरुड, शेतकरीशेतकऱ्यांसाठी क्रांतीकारी योजनांची घोषणा केली असली तरी सरकारने शेतकऱ्यांना दरमहा पाचशे रुपये देऊ केलेली रक्कम अतिशय तुटपुंजी आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकरी वर्गाला आकर्षित करण्याचा हा प्रयत्न केला आहे. देऊ केलेली रक्कम गरजू व्यक्तीपर्यंत पोहचणे म्हत्त्वाचे आहे.- संतोष आरोटे, शेतकरीअसंघटीत कामागारांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे. पेन्शनचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. या योजनेमुळे असंघटित कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र संघटित कामगारांचा या वेळीही काहीच विचार केला गेला नाही. कंत्राटी कामगार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यांना पर्मन्ट कसे करता येईल यावर काहीच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे एकूणच कामगारांसाठी संमिश्र असा संकल्प आहे. - यशवंत भोसले, अध्यक्ष, राष्ट्रीय श्रमिक आघाडीहा अर्थसंकल्प कामगार वर्गाचे हित जपणारा असून विशेषत: असंघटीत कामगारांना या अर्थसंकल्पातून मोठा दिलासा मिळालेला आहे. आता कामगारांच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याने त्यांचे जीवनमान सुखकर होण्यास मदत होणार आहे.- संजय चव्हाण, नोकरदारपेन्शनधारकांसाठी हा अर्थसंकल्प खूप चांगला आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे बचत होण्यासाठी मदत होईल. त्याचा फायदा नक्कीच सर्व पेन्शनधारकांना होईल.- गायत्री येवलेकर, नोकरदारज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजातून मिळणाºया चाळीस हजार रुपयांच्या उत्पन्नासाठी टीडीएस भरावा लागणार नाही, ही योजना स्वागतार्ह आहे. ज्येष्ठांचा विचार करून घेतलेला हा निर्णय आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी हा अर्थसंकल्प फायद्याचा आहे.- सूर्यकांत पारखी, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघटना, चिंचवड

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019Farmerशेतकरी