शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

चोऱ्यांमुळे बोपखेलकर त्रस्त, पोलिसांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:23 IST

पोलिसांचे दुर्लक्ष : सामान्यांमध्ये घबराट, भुरट्या चोरट्यांचा वावर

बोपखेल : येथील गणेशनगर भागात अनेक ठिकाणी छोट्या-मोठ्या चोºया होत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेशनगर येथील आतापर्यंत झालेल्या चोºयांमध्ये दुचाकी गाड्यांचे टायर, सायकल दुकानांसमोरील लोखंडी फलक अशा अनेक चोऱ्या झाल्या आहेत. परंतु याबाबत कोणीही तक्रार दिलेली नाही. असे जरी असले, तरी पोलीस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. पोलीस गस्त होत नसल्याने एकप्रकारे चोरट्यांना अभय मिळत आहे. त्यामुळे आता जरी छोट्या चोºया होत असल्या, तरी मोठ्या चोऱ्या होण्याची शक्यता टाळता येत नाही. भुरट्या चोरट्यांचा वावर या परिसरात वाढला आहे.

पिंपरी-चिंचवडला नवीन पोलीस आयुक्तालय झाल्यावर नागरिकांना दिलासा मिळेल, असे वाटत होते; परंतु याउलट अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भय निर्माण होत चालले आहे. एकीकडे दिघी भागात एक पोलीस चौकी व एक पोलीस ठाणे असतानाही दिघी भागात काही दिवसांपूर्वी तक्रार पेट्या बसविण्यात आल्या आहेत. याच पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या बोपखेल येथील गणेशनगर भागात पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. बोपखेलमधील काही भाग भोसरी पोलीस ठाण्यात येतो. मात्र भोसरी पोलीस ठाणे ते बोपखेल अंतर जास्त असल्याने भोसरी पोलीस बोपखेल भागात वेळेत पोहचू शकत नाहीत, असे येथील रहिवाशांनी सांगितले.सायकलही लंपास४गणेशनगर भागात तीस टक्के नागरिक सैन्यदलात कार्यरत आहेत. त्यामुळे कुटुंबाला बोपखेल, गणेशनगर भागात ठेवून जवान देशाचे संरक्षण करण्यासाठी विविध ठिकाणी कर्तव्य बजावत असतात. परंतु याचाच फायदा घेऊन चोर त्यांच्या सायकल व मौल्यवान वस्तू चोरी करीत आहेत. सैन्यदलात नोकरीनिमित्त आलेल्या शिपायाला आपले कुटुंब सुरक्षित ठिकाणी ठेवून आपले कर्तव्य बजवायला जावे लागते. त्यामुळे घरी केवळ महिला व लहान मुले असतात.

रात्रीच्या वेळी एकटी महिला घराबाहेर निघणे अशक्यच आहे. त्यामुळे चोरांचे फावते आहे. वाढत्या चोºया व महिलांच्या सुरक्षेसाठी गणेशनगर व बोपखेल भागात पोलीस गस्त वाढणे गरजेचे आहे, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.गणेशनगर भागात पोलीस गस्त वाढवण्यात येणार आहे. गणेशनगर भागातील सुरक्षेबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. येथील नागरिकांना सुरक्षा पुरविण्यासाठी दिघी पोलीस नेहमीच कार्यरत आहेत.- विवेक लावंड, वरिष्ठ निरीक्षक, दिघी पोलीस ठाणेबाहेरगावाहून येणाºया कामगारांची संख्या वाढत आहे. परिणामी गुन्हेगारी वाढत आहे. गणेशनगर भागात चोºयांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या भागात पोलीस गस्त वाढली पाहिजे.- जगन्नाथ घुले,स्थानिक, गणेशनगर 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडThiefचोरPoliceपोलिस