शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

चोऱ्यांमुळे बोपखेलकर त्रस्त, पोलिसांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:23 IST

पोलिसांचे दुर्लक्ष : सामान्यांमध्ये घबराट, भुरट्या चोरट्यांचा वावर

बोपखेल : येथील गणेशनगर भागात अनेक ठिकाणी छोट्या-मोठ्या चोºया होत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेशनगर येथील आतापर्यंत झालेल्या चोºयांमध्ये दुचाकी गाड्यांचे टायर, सायकल दुकानांसमोरील लोखंडी फलक अशा अनेक चोऱ्या झाल्या आहेत. परंतु याबाबत कोणीही तक्रार दिलेली नाही. असे जरी असले, तरी पोलीस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. पोलीस गस्त होत नसल्याने एकप्रकारे चोरट्यांना अभय मिळत आहे. त्यामुळे आता जरी छोट्या चोºया होत असल्या, तरी मोठ्या चोऱ्या होण्याची शक्यता टाळता येत नाही. भुरट्या चोरट्यांचा वावर या परिसरात वाढला आहे.

पिंपरी-चिंचवडला नवीन पोलीस आयुक्तालय झाल्यावर नागरिकांना दिलासा मिळेल, असे वाटत होते; परंतु याउलट अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भय निर्माण होत चालले आहे. एकीकडे दिघी भागात एक पोलीस चौकी व एक पोलीस ठाणे असतानाही दिघी भागात काही दिवसांपूर्वी तक्रार पेट्या बसविण्यात आल्या आहेत. याच पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या बोपखेल येथील गणेशनगर भागात पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. बोपखेलमधील काही भाग भोसरी पोलीस ठाण्यात येतो. मात्र भोसरी पोलीस ठाणे ते बोपखेल अंतर जास्त असल्याने भोसरी पोलीस बोपखेल भागात वेळेत पोहचू शकत नाहीत, असे येथील रहिवाशांनी सांगितले.सायकलही लंपास४गणेशनगर भागात तीस टक्के नागरिक सैन्यदलात कार्यरत आहेत. त्यामुळे कुटुंबाला बोपखेल, गणेशनगर भागात ठेवून जवान देशाचे संरक्षण करण्यासाठी विविध ठिकाणी कर्तव्य बजावत असतात. परंतु याचाच फायदा घेऊन चोर त्यांच्या सायकल व मौल्यवान वस्तू चोरी करीत आहेत. सैन्यदलात नोकरीनिमित्त आलेल्या शिपायाला आपले कुटुंब सुरक्षित ठिकाणी ठेवून आपले कर्तव्य बजवायला जावे लागते. त्यामुळे घरी केवळ महिला व लहान मुले असतात.

रात्रीच्या वेळी एकटी महिला घराबाहेर निघणे अशक्यच आहे. त्यामुळे चोरांचे फावते आहे. वाढत्या चोºया व महिलांच्या सुरक्षेसाठी गणेशनगर व बोपखेल भागात पोलीस गस्त वाढणे गरजेचे आहे, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.गणेशनगर भागात पोलीस गस्त वाढवण्यात येणार आहे. गणेशनगर भागातील सुरक्षेबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. येथील नागरिकांना सुरक्षा पुरविण्यासाठी दिघी पोलीस नेहमीच कार्यरत आहेत.- विवेक लावंड, वरिष्ठ निरीक्षक, दिघी पोलीस ठाणेबाहेरगावाहून येणाºया कामगारांची संख्या वाढत आहे. परिणामी गुन्हेगारी वाढत आहे. गणेशनगर भागात चोºयांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या भागात पोलीस गस्त वाढली पाहिजे.- जगन्नाथ घुले,स्थानिक, गणेशनगर 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडThiefचोरPoliceपोलिस